शहरं
Join us  
Trending Stories
1
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
2
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
3
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
4
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
5
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
6
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
7
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
8
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
9
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
10
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
11
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
12
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
13
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
14
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
15
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
16
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
17
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
18
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
19
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
20
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
Daily Top 2Weekly Top 5

मंगीवासीयांच्या समस्या प्राधान्याने सोडवा

By admin | Updated: July 16, 2014 00:06 IST

राजुरा तालुक्यातील मंगी येथील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रशासनाला दिले.

चंद्रपूर : राजुरा तालुक्यातील मंगी येथील समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी प्रशासनाला दिले. मंगी येथे विशेष ग्रामसभा घेवून जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी निर्देश दिले. या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी सोहेल शर्मा, उपवनसंरक्षक हिरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामभेट कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी मंगी गावास भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या विविध समस्या व अडचणी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितल्या.मंगी येथील पाणी पुरवठ्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पाण्याचे टाकीचे काम बंद आहे. शौचालयाचे बांधकाम करण्यात आले आहे. परंतु लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम प्राप्त झाली नाही. या परिसरातील ग्रामस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बससेवा सुरू करण्यात यावी, मंगी-भेंडवी मार्गावरील पूल खचलेला असल्याने पुलाची दुरुस्ती करण्यात यावी, मंगी-रांजीगुंडा मार्गावरील नाल्यावर रपटे बांधण्यात यावेत, मंगी-पांचगाव मार्गाचे डांबरीकरण करण्यात यावे, अपुरा पाऊस झाल्यामुळे दुष्काळ जाहीर करावा, ज्या कुटूंबाकडे शिधापत्रिका नाही त्यांना नवीन शिधापत्रिका देण्यात याव्यात, रांजीगुंडा येथे नवीन बोअरवेल, वाढीव विद्युत पोल आणि वाढीव गावठान मंजूर करावे, आदिवासी बचत गटांना विट भट्ट्यांचे प्रस्ताव मंजूर करावे, प्रलंबित उपसा जलसिंचन योजनेचे काम पूर्ण करून जलसिंचन योजना सुरू करावी व शासकीय जमिनीवर अतिक्रम केलेल्या शेतकऱ्यांना पट्टे देण्यात यावे आदी मागण्या नागरिकांनी ग्रामसभेत केल्या.या समस्या व अडचणी प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. आपल्या समस्या वेळेत सोडविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी ग्रामस्थांना सांगितले. या व्यतिरिक्तही काही अडचणी किंवा समस्या असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे त्यांनी नागरिकांना सांगितले. काही वैयक्तीक कारणास्तव जिल्हाधिकारी यांनी मंगी येथे मुक्काम करू शकले नाही. येत्या आठवड्यात जिल्हाधिकारी मुक्काम करणार आहेत असे सुत्रांनी स्पष्ट केले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: गावातील समस्यांची दखल घेतल्यामुळे नागरिकांना दिललासा मिळाला असून येत्या काही दिवसात समस्या सुटतील, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला. (नगर प्रतिनिधी)