शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेतील सौर योजना ठरली दिवास्वप्न

By admin | Updated: June 25, 2014 23:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु

चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु असून विद्यार्थ्यांचे मात्र यात मोठे नुकसान होत आहे.शाळांमध्ये मुबलक, शुद्ध पाणी मिळावे तसेच विजेची समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना सौर पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, सुरू होण्यापूर्वीच ही योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.शासकीय आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे.यामध्ये सौरदिवे, शिवकालीन पाणी बचाव योजना, गरम पाणी हिटर, सौरकूकर तसेच सौर पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध योजना शासन राबवितात. पाणीसमस्या लक्षात घेऊन काही शाळांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरविण्यात आल्या. मात्र नळयोजना अपयशी ठरल्याने शेकडो शाळांतील टाक्या भंगाराम जमा आहेत. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने नळयोजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तीसुद्धा योजना अपयशी ठरली. त्यामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना कारवा लागत आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना नदी-नाल्यांवर अंघोळीसाठी जावे लागते. नळयोजनेवर खर्च झाल्यानंतरही कित्येक शाळांमध्ये विहीर तसेच हातपंपावरच विद्यार्थ्यांना जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने काही शाळांमध्ये सौर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. शासकीय आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून सौर प्लेट लावण्यात आल्या. परंतु, मोटरपंप कमी पॉवरचा वापरल्याने पाण्याच्या टाकीत पाणीच चढत नसल्याने ही योजनादेखील कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.कित्येक शाळांतील सौर प्लेटची नामधूस करण्यात आली असून, पाण्याच्या टाक्या शोभेची वस्तू ठरल्या आहेत. आश्रमशाळांत पुरेशे पाणी मिळत नसल्याने शौचालयाचा वापर न करता विद्यार्थी जंगलात जातात. यामुळे विचित्र घटनाही घडल्या असून, मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)