शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

आश्रमशाळेतील सौर योजना ठरली दिवास्वप्न

By admin | Updated: June 25, 2014 23:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु

चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु असून विद्यार्थ्यांचे मात्र यात मोठे नुकसान होत आहे.शाळांमध्ये मुबलक, शुद्ध पाणी मिळावे तसेच विजेची समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना सौर पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, सुरू होण्यापूर्वीच ही योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.शासकीय आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे.यामध्ये सौरदिवे, शिवकालीन पाणी बचाव योजना, गरम पाणी हिटर, सौरकूकर तसेच सौर पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध योजना शासन राबवितात. पाणीसमस्या लक्षात घेऊन काही शाळांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरविण्यात आल्या. मात्र नळयोजना अपयशी ठरल्याने शेकडो शाळांतील टाक्या भंगाराम जमा आहेत. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने नळयोजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तीसुद्धा योजना अपयशी ठरली. त्यामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना कारवा लागत आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना नदी-नाल्यांवर अंघोळीसाठी जावे लागते. नळयोजनेवर खर्च झाल्यानंतरही कित्येक शाळांमध्ये विहीर तसेच हातपंपावरच विद्यार्थ्यांना जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने काही शाळांमध्ये सौर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. शासकीय आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून सौर प्लेट लावण्यात आल्या. परंतु, मोटरपंप कमी पॉवरचा वापरल्याने पाण्याच्या टाकीत पाणीच चढत नसल्याने ही योजनादेखील कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.कित्येक शाळांतील सौर प्लेटची नामधूस करण्यात आली असून, पाण्याच्या टाक्या शोभेची वस्तू ठरल्या आहेत. आश्रमशाळांत पुरेशे पाणी मिळत नसल्याने शौचालयाचा वापर न करता विद्यार्थी जंगलात जातात. यामुळे विचित्र घटनाही घडल्या असून, मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)