शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

आश्रमशाळेतील सौर योजना ठरली दिवास्वप्न

By admin | Updated: June 25, 2014 23:42 IST

आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु

चंद्रपूर : आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी शासनाने मोठ्या संख्येने आश्रम शाळा सुरु केल्या आहेत. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दिवसेंदिवस या शाळांतील समस्या वाढत आहे. केवळ कागदोपत्री योजना सुरु असून विद्यार्थ्यांचे मात्र यात मोठे नुकसान होत आहे.शाळांमध्ये मुबलक, शुद्ध पाणी मिळावे तसेच विजेची समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांना सौर पाणीपुरवठा योजना सुरू केली. मात्र, सुरू होण्यापूर्वीच ही योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.शासकीय आश्रमशाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागामार्फत अनेक योजना राबविण्यात आल्या. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे योजना कुचकामी ठरत आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात आहे.यामध्ये सौरदिवे, शिवकालीन पाणी बचाव योजना, गरम पाणी हिटर, सौरकूकर तसेच सौर पाणीपुरवठा योजनांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विविध योजना शासन राबवितात. पाणीसमस्या लक्षात घेऊन काही शाळांमध्ये पाण्याच्या टाक्या पुरविण्यात आल्या. मात्र नळयोजना अपयशी ठरल्याने शेकडो शाळांतील टाक्या भंगाराम जमा आहेत. त्यानंतर प्रशासनाच्या मदतीने नळयोजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, तीसुद्धा योजना अपयशी ठरली. त्यामुळे आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना पाणीटंचाईचा सामना कारवा लागत आहे. अनेक शाळांमध्ये पाण्याच्या समस्येमुळे विद्यार्थ्यांना नदी-नाल्यांवर अंघोळीसाठी जावे लागते. नळयोजनेवर खर्च झाल्यानंतरही कित्येक शाळांमध्ये विहीर तसेच हातपंपावरच विद्यार्थ्यांना जावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन आदिवासी विकास विभागाने काही शाळांमध्ये सौर पाणीपुरवठा योजनेला मंजुरी दिली. शासकीय आश्रमशाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून सौर प्लेट लावण्यात आल्या. परंतु, मोटरपंप कमी पॉवरचा वापरल्याने पाण्याच्या टाकीत पाणीच चढत नसल्याने ही योजनादेखील कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे.कित्येक शाळांतील सौर प्लेटची नामधूस करण्यात आली असून, पाण्याच्या टाक्या शोभेची वस्तू ठरल्या आहेत. आश्रमशाळांत पुरेशे पाणी मिळत नसल्याने शौचालयाचा वापर न करता विद्यार्थी जंगलात जातात. यामुळे विचित्र घटनाही घडल्या असून, मुलांच्या सुरक्षेबाबतही चिंता निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)