शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

जोगापूर जंगलाच्या सर्व बाजूंनी सौर कुंपन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

राजुरा : राजुरा व विरूर रेंजमधील वन्यप्राण्यांपासून नागरिकांच्या जीविताचे, पशुधनाचे व उभ्या पिकांचे संरक्षण होण्याचे दृष्टीने संपूर्ण जोगापूर जंगलाच्या ...

राजुरा : राजुरा व विरूर रेंजमधील वन्यप्राण्यांपासून नागरिकांच्या जीविताचे, पशुधनाचे व उभ्या पिकांचे संरक्षण होण्याचे दृष्टीने संपूर्ण जोगापूर जंगलाच्या चारही बाजूंनी काटेरी तारेचे कुंपण करून त्यात सौर ऊर्जेचा प्रवाह सोडण्यात यावा. शेतकर्‍यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी आणि मानव व वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी हे सौर कुंपण करण्याची मागणी शेतकरी ज्येष्ठ संघटनेचे नेते माजी आमदार ॲड. वामनराव चटप यांच्यासह शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

चंद्रपूर जिल्हयात वन्यप्राणी मोठ्या प्रमाणात मनुष्यहानीसह शेतकर्‍यांचे पीक उद्ध्व‌स्त करीत असतात. अशा परिस्थितीत शेतकरी व जनतेचा वन्यप्राण्यांपासून बचाव व्हावा आणि वन्यप्राण्यांचे संवर्धन व्हावे, यासाठी सौर ऊर्जा कुंपणाचा पर्याय प्रभावी ठरू शकतो. जोगापूर जंगलाचे संपूर्ण भागाला कुंपण करून त्यात सौर ऊर्जेचा प्रवाह सोडल्यास वन्य प्राण्यांनी तारेच्या कुंपणाला स्पर्श केल्यास त्यांना सौम्य झटका बसतो. त्यामुळे वन्यप्राणी मरत नाही आणि ते आल्या पावली कुंपणाचे बाहेर जातात. त्यामुळे मानवी जीवित हानी आणि शेतपिकांची हानी होणार नाही.

व्यापक जनहित लक्षात घेता हे सौर कुंपण तात्काळ करावे, अशी मागणी राज्याचे वनमंत्री, मुख्य वनसंरक्षक ( वन्यजीव), प्रधान मुख्य वनसंरक्षक, मुख्य व उप वनसंरक्षक, चंद्रपूर यांच्याकडे शेतकरी संघटनेचे नेते माजी आमदार वामनराव चटप, शेषराव बोंडे, प्रभाकर ढवस, सिंधू बारसिंगे, चंद्रकला ढवस, अनंता येरणे, रमेश नळे, मधुकर चिंचोलकर, दिलीप देठे, डॉ.गंगाधर बोढे, जिवन आमने, आबाजी ढवस, कवडू पोटे,नारायण गड्डमवार, नरेंद्र काकडे, दिलीप देरकर,भाऊजी कन्नाके, हिंगाणे, पुंडलिक वाढई,मधुकर उरकुडे,भास्कर सिडाम, सरपंच भास्कर देवतळे, नंदू कुबडे, सुधाकर अमृतकर यांनी केली आहे.