शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

सौरऊर्जा पंप भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:01 IST

कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात.

ठळक मुद्देवीजभाराचा खर्च शून्यावर : जिल्ह्यातील ३०८ गावांना शाश्वत पाणी पुरवठा

राजेश मडावी ।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोट्यवधी रूपये खर्चून नजरेला भिडणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि भव्य योजनांच्या उभारणीतच ‘विकास’ दडला, या अभिनिवेशात काही लोकप्रतिनिधी धन्यता मान्यतात. मात्र, निसर्गानुकूल व संतुलित योजनांची अंमलबजावणी करताना आढेवेढे घेतात. २००९-१० मध्ये राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमअंतर्गत जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप लघुनळ पाणी पुरवठा योजना सुरू झाली होती. यातील बहुतेक पंप सुरळीत असून वीज भाराचा खर्चही निरंक आहे. भीषण टंचाईच्या काळात तहान भागविणारे हे सौरऊर्जा पंप शेकडो कुटुंबांना शाश्वत पुरवठा करीत आहे. त्यामुळे अशा पंपांची संख्या का वाढवू नये, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये अनेक ठिकाणी मुबलक पाणी पुरवठा योजना व वीजेची समस्या आहे. त्यामुळे नागरिकांना विजेवर आधारित पंपाद्वारे पिण्याच्या पाण्याची गरज भागविताना अडचणींचा सामना करावा लागतो. जिवती, कोरपना, राजुरा या तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये दरवर्षी पाणी टंचाईने नागरिकांचे हाल होतात. राज्य शासनाच्या विविध योजनांमधून मोठ्या गावांमध्ये पाणी पुरवठा योजना सुरू झाली. बºयाच ग्रामपंचायतींनी स्वत:च्या उत्पन्नातील महत्त्वाचा वाटा या योजनेसाठी खर्ची घालत आहेत. मात्र दीर्घकालीन योजनेचा अभाव व वर्षभर विजेची समस्या असणाºया गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत २००९-१० पासून जिल्हा परिषदच्या यांत्रिकी उपविभागाच्या अखत्यारित सौर दुहेरी पंप लघुनळ पाणीपुरवठा योजना सुरू करण्यात आली. जिल्ह्यात ३०८ सौर दुहेरी पंप सुरू आहेत. यासाठी ५ लाखांची मर्यादा आहे. सौरउर्जा पंपांची देखरेख करण्याची जबाबदारी जि.प. यांत्रिकी उपविभागाकडे देण्यात आली. आर्थिक खर्चाविना ग्रामस्थांना पिण्याचे मुबलक पाणी मिळत असल्याने योजनेची व्याप्ती वाढवावी, अशी अपेक्षा लाभार्थी गावातील सरपंचांनी व्यक्त केली आहे.अशी होते पाणी साठवणसौर ऊर्जा योजनेमध्ये विंधन विहिरींवर हात पंपासोबत सौर पंपाची उभारणी केली जाते. सौर ऊर्जा पंपाचा उपसर्ग साठवण टाकीत साठविल्यानंतर पाईप लाईनद्वारे घरोघरी पाणीपुरवठा केला जातो. हातपंप व सौर पंपाची उभारणी स्वतंत्ररीत्या विंधन विहिरीत करण्यात आली आहे. त्यामुळे हातपंप बिघडल्यास झाल्यास सौरपंप किंवा सौरपंप नादुरूस्त झाल्यास हातपंपाद्वारे नियमितपणे पाणी पुरवठा सुरू राहतो. हा पंप सौरऊर्जेवर चालत असल्याने विद्युतभाराचा खर्च शून्यावर आला आहे. ग्रामस्थांनी या पंपाची काळजीपूर्वक हाताळणी केल्यास जलसंकट दूर होईल.