शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

गटसचिवांअभावी तालुक्यातील सोसायट्या अपंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:20 IST

नागभीड : तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या अनेक सेवा सहकारी व आदिवासी सोसायट्या गटसचिवांअभावी अपंग झाल्या आहेत. शासनाच्या ...

नागभीड : तालुक्यात शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा घटक असलेल्या अनेक सेवा सहकारी व आदिवासी सोसायट्या गटसचिवांअभावी अपंग झाल्या आहेत. शासनाच्या सहकार विभागाने या सोसायट्यांकडे लक्ष घातले नाही, तर यातील काही सोसायट्या भविष्यात इतिहासजमा होतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

नागभीड तालुक्यात यापूर्वी आदिवासी विविध कार्यकारी आणि सेवा सहकारी सोसायट्यांची संख्या ४६ होती. नंतर तालुक्यातील काही सोसायट्यांचे एकीकरण करण्यात आले. एकीकरणानंतर ३१ सोसायट्या आहेत. सद्यस्थितीत विविध कार्यकारी आदिवासी सोसायट्या ११ आणि २० सेवा सहकारी सोसायट्या तालुक्यात कार्यरत आहेत. तालुक्यात ३१ सोसायट्या असल्या, तरी या सोसायट्यांचा कारभार पाहणारे केवळ आठ गटसचिव कार्यरत आहेत. यात पाच कंत्राटी गटसचिवांचा समावेश आहे. विशेष म्हणजे मागील काही वर्षांपासून गटसचिवांच्या नियुक्त्याच बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एखाद्या संस्थेला जर आपली सोसायटी चालवायची असेल, तर त्या संस्थेनेच आपल्या पातळीवर गटसचिवांची नियुक्ती करावी व आपल्या सोसायटीचा कारभार चालवावा, असे संबंधितांकडून काही वर्षांपूर्वीच निर्देश देण्यात आले होते. हे निर्देश मिळाल्यानंतर तालुक्यातील १० सोयायट्यांनी आपला कारभार चालविण्यासाठी गटसचिवांची नियुक्ती केली असल्याची माहिती आहे.

विविध कार्यकारी आदिवासी आणि सेवा सहकारी सोसायट्या शेतकऱ्यांच्यादृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. कर्जवितरणाचे अतिशय जटिल काम या गटसचिवांना करावे लागते. या कर्जवितरणाच्या फाईल जतन करून ठेवण्याची अतिशय मोठी जबाबदारी या गटसचिवांवर आहे. याशिवाय सोसायटीच्या दृष्टीने अनेक कामे या गटसचिवांना करावी लागतात. मात्र फार पूर्वीपासूनच या गटसचिवांना ना न्याय मिळाला आणि कामानुरूप मोबदला.

बॉक्स

एका गटसचिवांकडे चार सोसायट्यांचा कारभार

ज्या सोसायटीची गटसचिव नियुक्ती करून कारभार चालविण्याची क्षमता आहे, त्या संस्थांनी गटसचिव नियुक्त करून आपल्या सोसायटीचा कारभार सुरू ठेवला. मात्र या तालुक्यात आर्थिकदृष्ट्या अनेक सोसायट्या कमकुवत आहेत, या सोसायट्या स्वतंत्र गटसचिव नियुक्त करू शकत नाहीत, अशा सोसायट्यांचा प्रभार नियमित तीन आणि कंत्राटी पद्धतीने घेण्यात आलेल्या पाच अशा आठ गटसचिवांकडे देण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे नियमित आणि कंत्राट पद्धतीवर घेतलेल्या गटसचिवांकडे तीन-तीन, चार-चार सोसायट्यांचा प्रभार सोपविण्यात आला असल्याचीही माहिती आहे.