शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ग्रेज्युएशन डिग्रीशी संबंधित माहितीचा खुलासा होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
4
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
5
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
6
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
7
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
8
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
9
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
10
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
11
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
12
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
13
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
14
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
15
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
16
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
17
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
18
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
19
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
20
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा

मूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: September 2, 2015 00:50 IST

जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक मूल : जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे. बुद्धीमत्ता आपल्या देशात वास करीत असून आजही इतर देशात भारताचे नाव घेतले जाते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बुद्धिमान घडणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने रामलिला भवन मूल येथे आयोजित दहावी व बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ.एन.एम. कोकोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गीते, तहसीलदार राजेश सरवदे, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे आदी मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी मूल शहरातील मुख्य समस्या ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर मांडल्या. यावेळी सामाजिक कार्यासाठी डॉ.रामचंद्र दांडेकर, क्रीडा क्षेत्रासाठी मिथुन महाडोरे, वाहतूक शिपाई नरेंद्र अंडेलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगावच्या पदविधर शिक्षिका जयश्री दिक्षीत तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विनायक रेकलवार यांनी केले. प्रास्ताविक संजय पडोळे तर आभार गुरू गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे रामकृष्ण नखाते, रमेश माहुरपवार, राजू गेडाम, दीपक देशपांडे, भोजराज गोवर्धन, गंगाधर कुनघाडकर, वासुदेव आगडे, युवराज चावरे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. कोकाडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे असते. नियोजनबद्ध आखणी केली व मनात जिद्द, आत्मविश्वास असला तर जीवनात नक्कीच यश मिळते हे आपल्या स्वत:च्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. भारत २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते केवळ बुद्धिमत्तेच्या बळावरच, त्यामुळे प्रत्येकानी उच्चशिक्षित व्हावे असे प्राचार्य कोकाडे म्हणाले.