शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
4
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
5
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
6
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
7
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
8
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
9
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
10
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
11
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
12
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
13
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
14
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
15
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
16
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
17
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
18
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
19
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
20
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा

मूलमध्ये सामाजिक कार्यकर्ते व गुणवंतांचा सत्कार

By admin | Updated: September 2, 2015 00:50 IST

जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे.

सुधीर मुनगंटीवार : ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक मूल : जगात ज्ञानाला तोड नसून ज्ञान हे संपन्न देशाची संपत्ती मानली जाते. यासाठी बुद्धिमान विद्यार्थी घडणे देशासाठी आवश्यक आहे. बुद्धीमत्ता आपल्या देशात वास करीत असून आजही इतर देशात भारताचे नाव घेतले जाते. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर बुद्धिमान घडणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्ञान हे संपन्न देशाचे द्योतक आहे, असे मत राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. मूल येथे आयोजित गुणवंत विद्यार्थी व सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळ्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. मूल तालुका पत्रकार संघाच्या वतीने रामलिला भवन मूल येथे आयोजित दहावी व बारावीतील प्राविण्य प्राप्त विद्यार्थी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नेवजाबाई हितकारणी महाविद्यालय ब्रह्मपुरीचे प्राचार्य डॉ.एन.एम. कोकोडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र गीते, तहसीलदार राजेश सरवदे, पंचायत समिती सदस्य संजय मारकवार, तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे आदी मंचावर उपस्थित होते.प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पडोळे यांनी मूल शहरातील मुख्य समस्या ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर मांडल्या. यावेळी सामाजिक कार्यासाठी डॉ.रामचंद्र दांडेकर, क्रीडा क्षेत्रासाठी मिथुन महाडोरे, वाहतूक शिपाई नरेंद्र अंडेलवार, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चितेगावच्या पदविधर शिक्षिका जयश्री दिक्षीत तसेच दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा ना. सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विनायक रेकलवार यांनी केले. प्रास्ताविक संजय पडोळे तर आभार गुरू गुरुनुले यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संघाचे रामकृष्ण नखाते, रमेश माहुरपवार, राजू गेडाम, दीपक देशपांडे, भोजराज गोवर्धन, गंगाधर कुनघाडकर, वासुदेव आगडे, युवराज चावरे आदिंनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)अध्यक्षस्थानावरुन प्राचार्य डॉ. कोकाडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना उद्देशून जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन महत्त्वाचे असते. नियोजनबद्ध आखणी केली व मनात जिद्द, आत्मविश्वास असला तर जीवनात नक्कीच यश मिळते हे आपल्या स्वत:च्या उदाहरणातून विद्यार्थ्यांना पटवून दिले. भारत २०२० पर्यंत महासत्ता बनण्याचे स्वप्न पाहत आहे. ते केवळ बुद्धिमत्तेच्या बळावरच, त्यामुळे प्रत्येकानी उच्चशिक्षित व्हावे असे प्राचार्य कोकाडे म्हणाले.