शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य विद्यार्थ्यांचा अन्यायाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:24 IST

राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे रोजगार हिरावला : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला. हा आदेश रद्द करावा, या मागणीसाठी गुरुवारी आंदोलन करून उपजिल्हाधिकाºयांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.समाजकार्य महाविद्यालयातून बी.एस.डब्लू आणि एम.एस.डब्लू. चे शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी आता जाचक अटींचा सामना करावा लागणार आहे. शासकिय व निमशासकीय कार्यालय, खासगी कारखान्यांत समुपदेशक, अधीक्षक, समन्वयक, कामगार अधिकारी व जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीची संधी होती. मात्र, नव्या आदेशानुसार या सर्व पदांसाठी समाजकार्य विद्या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना न घेता थेट कोणत्याही शाखेतील पदवीधरांची निवड केली जाणार आहे. खरे तर ही सर्व पदे समाजकार्य अभ्यासक्रमांशी संबंधीत आहे. नव्या आदेशामुळे समाजकार्याचे सर्व पदवीधरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. त्यामुळे समाजकल्याण सेवाप्रवेश नियम कायम ठेवावे, महिला व बालविकास, कामगार विभागातील गट अ आणि ब पदासाठी समाजकार्य पदवीधरांना प्रथम संधी द्यावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात समुपदेशकाची नियुक्ती करावी, शासनाच्या सर्व महामंडळात प्रशिक्षित समाजकार्यकर्त्यांची नियुक्ती करून बेरोजगार उपलब्ध करून द्यावा, बालविकास प्रकल्प, ग्रामीण विकास प्रकल्पात विकास अधिकारी म्हणून समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांना नोकरी द्यावी.विकास सेवेतील वर्ग -१ व वर्ग २ अधिकारी पदे नामनिर्देशनाद्वारे भरतांना उमेदवाराची मुख्य नियमात (१९८४) निर्धारीत केलेली किमान द्वितीय वर्गातील पदवी किंवा स्नानकोत्तर पदवी आणि समाजकार्य किंवा समाजकलयाण प्रशासन कार्य किंवा विकास प्रशासन या विषयातील मान्यताप्राप्त परिसंस्थेची दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता बदलवून त्याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी फ क्त हीच शैक्षणिक अर्हता नविन नियमात (२०१७ च्या) देण्यात आलेली आहे. नविन नियमात मान्यताप्राप्त निद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी यासोबत समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कार्य किंवा आदिवसी विकास प्रशासन या विषयातील दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता दर्शविण्यात आले नाही. यामध्ये मुख्य नियमाप्रमाणे सुधारणा करावी. नविन नियमात समाजकार्य, समाजकल्याण, स्नातकोत्तर पदविका, पदवी वगळण्याची बाब समाजकार्य पदवीधारकांवर अन्याय करणारी आहे. त्यामूळे समाजकार्य पदवीधारकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.प्रत्यक्ष क्षेत्रात करावे लागणारे समाजकार्य प्रात्यक्षिकयाचा विचार करून समाजकार्य पदवीधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण तयार करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देताना संघर्ष समितीच्या रूपाली खोबरागडे, आमेल मेश्राम, विशाल, डुंबेरे, जयंत वांढरे, रविन्द्र दिक्षीत, ज्योती रायपूरे, पूर्णचंद्र ठाकूर, विलास कांबळे, प्रमोद भोयर, युवराज मेश्राम, अरुणा आमटे, संदीप उरकुडे, रवींद्र दीक्षित आदींसह बी.एस.डब्ल्यूू, एम.एस.डब्ल्यू, पदवीधारक उपस्थित होते.