शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

समाजकार्य विद्यार्थ्यांचा अन्यायाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:24 IST

राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे रोजगार हिरावला : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला. हा आदेश रद्द करावा, या मागणीसाठी गुरुवारी आंदोलन करून उपजिल्हाधिकाºयांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.समाजकार्य महाविद्यालयातून बी.एस.डब्लू आणि एम.एस.डब्लू. चे शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी आता जाचक अटींचा सामना करावा लागणार आहे. शासकिय व निमशासकीय कार्यालय, खासगी कारखान्यांत समुपदेशक, अधीक्षक, समन्वयक, कामगार अधिकारी व जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीची संधी होती. मात्र, नव्या आदेशानुसार या सर्व पदांसाठी समाजकार्य विद्या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना न घेता थेट कोणत्याही शाखेतील पदवीधरांची निवड केली जाणार आहे. खरे तर ही सर्व पदे समाजकार्य अभ्यासक्रमांशी संबंधीत आहे. नव्या आदेशामुळे समाजकार्याचे सर्व पदवीधरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. त्यामुळे समाजकल्याण सेवाप्रवेश नियम कायम ठेवावे, महिला व बालविकास, कामगार विभागातील गट अ आणि ब पदासाठी समाजकार्य पदवीधरांना प्रथम संधी द्यावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात समुपदेशकाची नियुक्ती करावी, शासनाच्या सर्व महामंडळात प्रशिक्षित समाजकार्यकर्त्यांची नियुक्ती करून बेरोजगार उपलब्ध करून द्यावा, बालविकास प्रकल्प, ग्रामीण विकास प्रकल्पात विकास अधिकारी म्हणून समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांना नोकरी द्यावी.विकास सेवेतील वर्ग -१ व वर्ग २ अधिकारी पदे नामनिर्देशनाद्वारे भरतांना उमेदवाराची मुख्य नियमात (१९८४) निर्धारीत केलेली किमान द्वितीय वर्गातील पदवी किंवा स्नानकोत्तर पदवी आणि समाजकार्य किंवा समाजकलयाण प्रशासन कार्य किंवा विकास प्रशासन या विषयातील मान्यताप्राप्त परिसंस्थेची दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता बदलवून त्याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी फ क्त हीच शैक्षणिक अर्हता नविन नियमात (२०१७ च्या) देण्यात आलेली आहे. नविन नियमात मान्यताप्राप्त निद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी यासोबत समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कार्य किंवा आदिवसी विकास प्रशासन या विषयातील दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता दर्शविण्यात आले नाही. यामध्ये मुख्य नियमाप्रमाणे सुधारणा करावी. नविन नियमात समाजकार्य, समाजकल्याण, स्नातकोत्तर पदविका, पदवी वगळण्याची बाब समाजकार्य पदवीधारकांवर अन्याय करणारी आहे. त्यामूळे समाजकार्य पदवीधारकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.प्रत्यक्ष क्षेत्रात करावे लागणारे समाजकार्य प्रात्यक्षिकयाचा विचार करून समाजकार्य पदवीधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण तयार करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देताना संघर्ष समितीच्या रूपाली खोबरागडे, आमेल मेश्राम, विशाल, डुंबेरे, जयंत वांढरे, रविन्द्र दिक्षीत, ज्योती रायपूरे, पूर्णचंद्र ठाकूर, विलास कांबळे, प्रमोद भोयर, युवराज मेश्राम, अरुणा आमटे, संदीप उरकुडे, रवींद्र दीक्षित आदींसह बी.एस.डब्ल्यूू, एम.एस.डब्ल्यू, पदवीधारक उपस्थित होते.