शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

समाजकार्य विद्यार्थ्यांचा अन्यायाविरुद्ध एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 23:24 IST

राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला.

ठळक मुद्देजाचक अटींमुळे रोजगार हिरावला : उपजिल्हाधिकाºयांना निवेदन सादर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने समाजकार्याची पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरीपासून वंचित ठेवणारा अध्यादेश जारी केला. हा आदेश रद्द करावा, या मागणीसाठी गुरुवारी आंदोलन करून उपजिल्हाधिकाºयांमार्फ त मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविण्यात आले.समाजकार्य महाविद्यालयातून बी.एस.डब्लू आणि एम.एस.डब्लू. चे शिक्षण पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यासाठी आता जाचक अटींचा सामना करावा लागणार आहे. शासकिय व निमशासकीय कार्यालय, खासगी कारखान्यांत समुपदेशक, अधीक्षक, समन्वयक, कामगार अधिकारी व जनसंपर्क अधिकारी म्हणून नोकरीची संधी होती. मात्र, नव्या आदेशानुसार या सर्व पदांसाठी समाजकार्य विद्या शाखेतील पदवीधर विद्यार्थ्यांना न घेता थेट कोणत्याही शाखेतील पदवीधरांची निवड केली जाणार आहे. खरे तर ही सर्व पदे समाजकार्य अभ्यासक्रमांशी संबंधीत आहे. नव्या आदेशामुळे समाजकार्याचे सर्व पदवीधरांवर बेरोजगारीची कुºहाड कोसळणार आहे. त्यामुळे समाजकल्याण सेवाप्रवेश नियम कायम ठेवावे, महिला व बालविकास, कामगार विभागातील गट अ आणि ब पदासाठी समाजकार्य पदवीधरांना प्रथम संधी द्यावी, प्रत्येक पोलीस ठाण्यात समुपदेशकाची नियुक्ती करावी, शासनाच्या सर्व महामंडळात प्रशिक्षित समाजकार्यकर्त्यांची नियुक्ती करून बेरोजगार उपलब्ध करून द्यावा, बालविकास प्रकल्प, ग्रामीण विकास प्रकल्पात विकास अधिकारी म्हणून समाजकार्य शाखेच्या विद्यार्थ्यांना नोकरी द्यावी.विकास सेवेतील वर्ग -१ व वर्ग २ अधिकारी पदे नामनिर्देशनाद्वारे भरतांना उमेदवाराची मुख्य नियमात (१९८४) निर्धारीत केलेली किमान द्वितीय वर्गातील पदवी किंवा स्नानकोत्तर पदवी आणि समाजकार्य किंवा समाजकलयाण प्रशासन कार्य किंवा विकास प्रशासन या विषयातील मान्यताप्राप्त परिसंस्थेची दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता बदलवून त्याऐवजी मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी फ क्त हीच शैक्षणिक अर्हता नविन नियमात (२०१७ च्या) देण्यात आलेली आहे. नविन नियमात मान्यताप्राप्त निद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी यासोबत समाजकार्य किंवा समाजकल्याण प्रशासन किंवा आदिवासी कार्य किंवा आदिवसी विकास प्रशासन या विषयातील दोन वर्षाची स्नातकोत्तर पदविका किंवा पदवी ही शैक्षणिक अर्हता दर्शविण्यात आले नाही. यामध्ये मुख्य नियमाप्रमाणे सुधारणा करावी. नविन नियमात समाजकार्य, समाजकल्याण, स्नातकोत्तर पदविका, पदवी वगळण्याची बाब समाजकार्य पदवीधारकांवर अन्याय करणारी आहे. त्यामूळे समाजकार्य पदवीधारकांमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.प्रत्यक्ष क्षेत्रात करावे लागणारे समाजकार्य प्रात्यक्षिकयाचा विचार करून समाजकार्य पदवीधारकांना नोकरीत सामावून घेण्याचे धोरण तयार करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. उपजिल्हाधिकाºयांना निवेदन देताना संघर्ष समितीच्या रूपाली खोबरागडे, आमेल मेश्राम, विशाल, डुंबेरे, जयंत वांढरे, रविन्द्र दिक्षीत, ज्योती रायपूरे, पूर्णचंद्र ठाकूर, विलास कांबळे, प्रमोद भोयर, युवराज मेश्राम, अरुणा आमटे, संदीप उरकुडे, रवींद्र दीक्षित आदींसह बी.एस.डब्ल्यूू, एम.एस.डब्ल्यू, पदवीधारक उपस्थित होते.