शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव वीजबिलाविरोधात सामाजिक संघटना एकवटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:00 IST

कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली.

ठळक मुद्देवीज बिल माफ करा : ठिकठिकाणी दिलेल्या निवेदनातून सामाजिक संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे विद्युत बिल माफ करावे, अशी मागणी विविध सामाजिक संघटनेकडून करण्यात येत आहे. अनेक सामाजिक संघटनांनी याबाबतचे निवेदन संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडीचंद्रपूर : महावितरण कंपनीने वितरीत केलेले लॉकडाऊन कालावधीतील तीन महिन्यांचे एकत्रित वीजबिल भरणे जनसामान्यांना अडचणींचे जात आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी धर्मनिरपेक्ष लोकशाही संघटनेतर्फे बाबुपेठ येथील मुख्य अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.यावेळी प्रा. नामदेव कन्नाके, वामन बुटले, मंगेश बदखल, अंकुश वाघमारे, इंदुताई डोंगरे, वर्षा लाटेकर, सुविधा बांबुळे, याकुब पुल्ला, कोमुरय्या चीराप आदी उपस्थित होते.गोंडपिपरीत भाजपचे निवेदनआक्सापूर : लॉकडाऊनमुळे जनसामान्यांना येत असलेल्या अडचणीमुळे थकित वीज बिल माफ करावे, तसेच पुनर्गगठन केलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे अशी मागणी भारतीय जनता पाटीतर्फे करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष बबन निकोडे, माजी नगराध्यक्ष संजय झाडे, निलेश संगमवार उपस्थित होते.चिमुरात उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदनचिमूर : कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाने सुरु केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक, मजूर, किरकोड व्यापारी यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे वीज वितरण विभागाने पाठविलेले वारेमाप बिल भरणे जनसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. त्यामुळे वीज बिल माफ करण्याची मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्याचे मुख्यमंत्री, उर्जामंत्री यांना पाठवलेल्या निवेदनातून नगरसेविका कल्पना इंदुरकर यांनी केली. याप्रंसगी अनिता बोरकर, बिल्कीस शेख, वनिता सहारे, वनमाला सहारे, शोभा भगत आदी उपस्थित होते.अभियंत्याला निवेदनघुग्घुस : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योग, व्यापार व रोजगार बुडाला. परिणामी आर्थिक अडचणीमुळे बिल भरणे शक्य नसल्याने वीज बिल माफ करावे, अशी मागणी येथील सहायक अभियंत्यांना म. रा. सु. रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना व शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिलेल्या निवेदनातून केली आहे. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष किशोर बोबडे, तालुका प्रमुख सुमेश रंगारी, शहर प्रमुख परिवर्तन कुम्मरवार, सहसचिव विठ्ठल अतकरे, हिरालाल शहा, शिवसेना महिला आघाडी संगीता बोबडे, नीता मुक्के, नीता श्रीवास्त, उज्वला मडावी, आशा काळे, शिला धोबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीज