शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मग या प्रशासकीय बदल्यांना अर्थ तो काय ?

By admin | Updated: June 17, 2016 01:08 IST

नागभीड पंचायत समितीमधील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असल्या

घनश्याम नवघडे नागभीडनागभीड पंचायत समितीमधील सात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय बदल्या करण्यात आल्या असल्या आणि त्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्यात यावे, असे निर्देश असले तरी हे अधिकारी आणि कर्मचारी येथेच कार्यरत आहेत. मग या प्रशासकीय बदल्यांना अर्थ काय, असा सवाल या ठिकाणी विचारला जात आहे.ज्यांच्या बदल्या नियमाकूल आहेत, अशांची जिल्हा परिषद पातळीवर यादी बनविण्यात आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीत अशा कर्मचाऱ्यांचा ‘दरबार’ भरतो आणि या दरबारातच नव्या ठिकाणी रूजू होण्याचे निर्देश दिले जातात. यावर्षी ही प्रक्रिया मे महिण्यात राबविण्यात आली आणि या अधिकारी कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्याचे निर्देशसुद्धा देण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे.विश्वसनीय माहितीनुसार यावर्षी नागभीड पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या सात अधिकारी कर्मचाऱ्यांना या बदली प्रक्रियेस सामोरे जावे लागले व त्यांचे नव्या ठिकाणी रूजू होण्याचे आदेशसुद्धा देण्यात आल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, येथील कक्ष अधिकारी विशाल एस. यादव यांचे चंद्रपूर येथे स्थानांतरण झाले आहे. अधीक्षक म्हणून कार्यभार सांभाळत असलेले सुशील सी. बांबोडे यांची बदली ब्रह्मपुरी येथे झाली आहे. विस्तार अधिकारी यशवंत बी. लांडगे यांना चिमूर देण्यात आले आहे. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ऋषभ के. बावणकर यांना पोंभूर्णा येथे पाठविण्यात आले आहे. कनिष्ठ सहाय्यक अमोल एम. चल्लावार यांनाही पोंभूर्णा देण्यात आले आहे तर संजीव ए. चांदेकर आणि राजेश एन. भाजीपाले यांची बदली चिमूर येथे करण्यात आली आहे.या अधिकारी कर्मचाऱ्यांना ३१ मेपर्यंत भारमुक्त करण्याचे निर्देश असले तरी यातील बहुतांश अधिकारी-कर्मचारी अद्यापही भारमुक्त झाले नाही. उलट यातील काही आपली बदली कशी रद्द होईल या खटपटीत असल्याची माहिती आहे. विश्वसनीय सुत्राने सांगितले की यातील एक अधिकारी नव्यानेच अस्तित्वात आलेल्या नागभीड नगर परिषदेत डेप्युटेशन मागत असून यासाठी त्याने चांगलीच फिल्डींग लावली आहे.स्थानांतरणाच्या प्रक्रियेला आता जवळपास दोन महिन्याचा कालावधी होत आहे. तरी हे अधिकारी-कर्मचारी भारमुक्त झाले नाही. यासंदर्भात प्रतिक्रियेसाठी संवर्ग विकास अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता ते संपर्क क्षेत्राच्या बाहेर होते.