शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

जिल्ह्यात धुव्वाधार पाऊस

By admin | Updated: September 17, 2015 00:50 IST

गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून बुधवारीही विजेच्या कडकडासह धुव्वाधार पावसाने हजेरी लावली.

गणेश मंडळांची तारांबळ : शेतकऱ्यांना दिलासा चंद्रपूर : गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पाऊस सुरू असून बुधवारीही विजेच्या कडकडासह धुव्वाधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे गणरायाच्या स्थापनेसाठी सज्ज असणाऱ्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून हा पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला. बुधवारी सायंकाळी ४ वाजता चंद्रपुरात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला. वादळामुळे पावसाचा वेग अधिक होता. त्यामुळे शहरात मूर्ती विक्रीसाठी दुकाने लावणाऱ्या विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर गोंडपिपरी, सावली, मूल, बल्लारपूर, कोरपना, वरोरा, ब्रह्मपुरी, घुग्घुस, नागभीड, चिमूर तालुक्यातही धुव्वाधार पाऊस झाला. भद्रावती येथील आठवडी बाजार असल्याने विक्रेत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यामुळे अनेकांना रस्त्यावरील व्यवसायिक प्रतिष्ठाणमध्ये उभे राहावे लागले. घुग्घुस येथे ४ तास पाऊस झाल्याने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले होते. गोंडपिपरी तालुक्यातील कुडेनांदगाव येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून नाव मात्र कळू शकले नाही. दरम्यान चंद्रपुरात झालेल्या पावसाने अनेक मार्गावर पाणी साचले. ऊर्जानगर मार्गावर तसेच जयंत टॉकीज चौकात एक ते दीड फूट पाणी होते. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करून वाहने काढावी लागली. चंद्रपुरात सुमारे दीड ते दोन तास पाऊस झाला. या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून नागरिकांनीही समाधान व्यक्त केला. (लोकमत चमू)