शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
निवडणुकीत अजितदादांना शह द्यायला पार्थ पवार प्रकरण मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढले?; चर्चांना उधाण
5
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
6
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
7
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
8
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
9
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
10
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
11
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
12
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
13
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
14
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
15
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
16
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
17
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
18
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
19
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
20
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."

उमेदवारांची सोशल मीडियावर धूम

By admin | Updated: April 7, 2017 00:49 IST

महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी आपापल्या मतदार प्रभागात प्रचारही सुरू केला आहे.

चंद्रपूर : महानगरपालिका निवडणुकीचे पडघम आता जोरात वाजू लागले आहेत. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी आपापल्या मतदार प्रभागात प्रचारही सुरू केला आहे. दिवसभर सूर्य आग ओकत असल्याने उमेदवार सकाळीच मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. दुपारी उगाच उन्हाचे चटके आणि मतदारांचे बोलणे ऐकावे लागू नये म्हणून अनेक उमेदवारांनी प्रचारासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. येत्या १९ एप्रिलला मनपा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. प्रचारासाठी उमेदवारांना केवळ आता बाराच दिवस मिळणार असल्याने त्यांची लगबग कमालीची वाढली आहे. मनपा निवडणुकीची आचारसंहिता लागू होताच अनेक राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधले होते. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख येऊन ठेपल्यानंतरच काँग्रेस, भाजप, राकाँ, शिवसेना या प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी घोषित केली. यात काही इच्छुकांना पक्षाच्या तिकिटा मिळाल्या तर काहींना यंदा ‘सबुरीने घेण्याचा’ सल्ला देण्यात आला. मात्र या तिकीट वाटपात नाराज झालेल्या काँग्रेसचे रामू तिवारी, भाजपाचे बलराम डोडानी यांनी अनुक्रमे भाजप व शिवसेनेत प्रवेश घेऊन निवडणुकीचे मैदान गाठले. यासोबतच अनेक इच्छुकांनी पक्षाने तिकीट नाकारल्याने अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी ६६ जागांकरिता १७ प्रभागाची निर्मिती करण्यात आली आहे. मनपा निवडणुकीसाठी १९ एप्रिलला मतदान तर २१ ला मतमोजणी होणार आहे. दरम्यान ५ एप्रिलला नामांकन दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी ५२७ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. भाजपाने सर्व ६६ जागांवर उमेदवार उभे केले. काँगे्रसने बंगाली कॅम्प प्रभागातील महिला गटातील उमेदवार वगळता ६५ जागांवर उमेदवार उतरविले. राष्ट्रवादी काँग्रेसने ३१, शिवसेने ६१ तर मनसेने १७ उमेदवार रिंगणात उतरविले आहेत. या सोबतच विदर्भ माझा पार्टी प्रथमच रिंगणार उतरली असून ८ उमेदवार उभे केले आहेत. ७ एप्रिलला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर रणांगणातले खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या उमेदवारांनी आताच प्रचाराला सुरुवात केली आहे. सध्या सूर्य आग ओकत आहे. पारा ४३ अंशाच्या पार गेला आहे. सकाळी ९ वाजतापासूनच उन्हाचे चटके बसू लागले आहेत. दुपारी १२ वाजतानंतर तर घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. त्यामुळे बहुतांश उमेदवारांनी सकाळी ८ ते १२ हा वेळ प्रचारासाठी निवडला आहे. सध्या तरी याच सकाळच्या वेळेत उमेदवार प्रभागात नागरिकांच्या घरी जाऊन भेटी घेताना दिसून येत आहे. प्रचारासाठी केवळ बारा दिवस शिल्लक आहेत. दुपारच्या कडक उन्हात फिरणे व भरदुपारी नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे बोलणे ऐकणे टाळण्यासाठी उमेदवारांनी सोशल मीडियाचा आधार घेतला आहे. व्हाटॅसअप, फेसबुकच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यमान नगरसेवक तर केलेल्या कामाची यादीच व्हॉटस्अ‍ॅपवरून मतदारांच्या लक्षात आणून देत आहे. याशिवाय काही नगरसेवक बल्क मॅसेजचाही वापर केला जात आहे. याव्यतिरिक्त सर्वांना एकाच वेळी भ्रमणध्वनी करून उमेदवारांच्या प्रचाराची एक विशिष्ट टेप ऐकविली जात आहे. याद्वारे उमेदवार दुपारच्या पाच तासांचा चांगला वापर करीत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, नव्या प्रभाग पुनर्रचनेत प्रभागाच्या सीमा वाढविण्यात आल्याने लोकसंख्याही वाढली आहे. यामुळे जुन्या उमेदवारांचीच दमछाक होत असून नव्या उमेदवारांसमोर कमी दिवसात मतदारांपर्यंत कसे पोहचावे, हेच मोठे आव्हान उभे ठाकले आहे. (शहर प्रतिनिधी)आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवसमनपा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस ५ एप्रिल होता. या दिवशी ६६ जागांसाठी तब्बल ५२७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर विविध कारणांमुळे १२ उमेदवारांचे नअर्ज अपात्र ठरविण्यात आले. आता ६६ जागांसाठी ५१५ उमेदवारी अर्ज दाखल आहेत. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. या दिवशी किती अर्ज मागे घेतले जातात आणि रिंगणात किती उमेदवार कायम असतील हे समजू शकणार आहे. त्यानंतर ८ एप्रिलला उमेदवारांना चिन्ह वाटप केले जाणार आहे. ९ एप्रिलपासून खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.