शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
4
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
5
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
6
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
7
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
8
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
9
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
10
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
11
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
12
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
13
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
14
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
15
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
16
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
17
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
18
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
19
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
20
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री

सेल्फीचा नाद करायचा नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2019 22:39 IST

मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देवाहतूक नियमांचे करा पालन : अपघात टाळण्यासाठी पुढाकाराची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मोबाईल आज सर्वांसाठी आवश्यक गरज झाली आहे. लहान असो की, मोठे सर्वांनाच मोबाईलचे वेड लागले आहे. त्यात आपले वेगवेगळे छायाचित्र काढण्यासाठी तरुण- तरुणींना सेल्फीने वेड लागले आहे. वाटेल तेथे व आहे त्या स्थितीत वेगवेगळे सेल्फी काढण्याचे प्रकार वाढत आहे. वाहन चालवितांनाही सेल्फी काढण्याचे प्रमाण वाढले असून अपघाताच्या घटना घडत आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन सेल्फीचा अतिरेक कमी करणे गरजेचे आहे.कुठलेही भान न ठेवता कोणत्याही क्षणी व अकारण होणारे सेल्फी चित्रण सध्या समस्या ठरत आहे. सार्वजनिक व कौटुंबिक कार्यक्रमात सेल्फीच्या नादात होणाऱ्या बेभान हालचाली संशोधनाचा विषय ठरत आहे.लग्न समारंभासारखे आनंदाचे क्षण असो किंवा दु:खद घटना. त्याचे होणारे चित्रण म्हणजे एक प्रकारची अवहेलना होताना दिसत आहे. यामुळे आपला मोबाईल प्रोफाईल तर छान निघतील पण व्यक्तीगत प्रोफाईल खरब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रत्येकाच्या हातात मोबाईल हा विषय आता काही नवीन नाही, त्याबरोबर नवीन तंत्रज्ञान म्हणजे पर्वणी, मॉडर्न युगात तंत्रज्ञान माणसाला मिळालेले वरदान आहे. याला चांगल्या प्रकारे वापरल्यास त्याचा फायदा होतो. मात्र अतिरेक केला तर त्यापासून नुकसानही होते. प्रत्येकाने आपापल्या परीने असलेल्या साधनांचा वापर करुन पाहिजे त्यावेळी हवे तेवढे फोटो काढणे फॅशन झाली आहे.विशेष म्हणजे, पूर्वी सारखे रोल खराब व्हायची भीती पण नाही. हवे तेवढे काढा आणि पाहिजे तेवढे ठेवून बाकीचे डिलीट करता येतात. यामुळे नुकसान किंवा फायद्याची भीतीची नाही. लग्न समारंभात जाण्याचा योग हल्ली वाढला आहे. वर-वधूचे होणारे छायाचित्रण समजण्यासारखे आहे. पण वर-वधूच्या मंचावर येणारे युवक- युवतीचे सुरु असलेले सेल्फी प्रदर्शन चाळयासारखे वाटतात. एकीकडे होणारी धार्मिक विधी आणि दुसºया बाजूला होणारे सेल्फी चित्र हास्यास्पद तेवढेच लाजिरवाना प्रकार वाटतो.बेभान क्लिकएखाद्या समारंभात पाहूने मंडळीची रेलचेल आणि सेल्फी काढणाऱ्यांची बेभान क्लिक हसू तेवढे राग आणणारे असते. विशेष म्हणजे, या सेल्फीच्या नादात कित्येक अपघात घडले आहेत. वाहन चालविताना किंवा धोकादायक जागेवर उभे राहून सेल्फी काढल्याने जिवावरही बेतले आहे.