शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

By admin | Updated: May 29, 2017 00:27 IST

येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

१० ते १५ वर्षांची झाडे : येरुर ग्रामपंचायतीचा प्रतापलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी वृक्षारोपणाच्या नावाखाली जुनी झाडे मुळासकट उपटून टाकण्याचा हा प्रकार येरुर ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्हा प्रदूषण, तिव्र उष्णतामान यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण मात्र मागील अनेक वर्षांपासून कमी झालेले नाही. आणखी ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारखान्यांमुळे वनसंपदा नष्ट होत असून उष्णतामानातही वाढ होत आहे. उन्हाळ्यात राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे नोंदविले जाते. यावर्षीही चंद्रपूरने आपला हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून शासनाच्या वतीने वृक्षलागवडीचा व्यापक उपक्रम मागील वर्षी राबविण्यात आला. यंदाही याची व्याप्ती आणखी वाढवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.एकीकडे वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे १० ते १५ वर्ष वयाची जिवंत झाडे तोडली जात आहे. येरुर ग्रामपंचायतीने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी येरुर-ताडाळी या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुने २० फूट अंतरावर डौलात उभी असलेली झाडे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी येरुर ग्रामपंचायतीने याला बगल दिली आहे.ग्रामपंचायतीच्या या कृत्याचा येरुर येथील परशुराम नरसू निखाडे व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येरुर ग्रामपंचायतीने मोठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेली ही झाडे तोडल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. रस्त्याच्या बाजुने २० फूट अंतरावरील झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जेसीबीनेच खड्डे खोदण्यात येत आहेत.या संदर्भात निखाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात मोका चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सागवानाची शेकडो झाडे तोडलीजिवती तालुक्यातील येरमीयेसापूर येथील संतोष पेठे व अशोक पेठे यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर असलेली सागवानाची शेकडो झाडे पेठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भुलथापा देऊन तोडल्याचा आरोप येरमीयेसापूर येथील गोविंदराव कुमरे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.