शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

By admin | Updated: May 29, 2017 00:27 IST

येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

१० ते १५ वर्षांची झाडे : येरुर ग्रामपंचायतीचा प्रतापलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी वृक्षारोपणाच्या नावाखाली जुनी झाडे मुळासकट उपटून टाकण्याचा हा प्रकार येरुर ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्हा प्रदूषण, तिव्र उष्णतामान यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण मात्र मागील अनेक वर्षांपासून कमी झालेले नाही. आणखी ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारखान्यांमुळे वनसंपदा नष्ट होत असून उष्णतामानातही वाढ होत आहे. उन्हाळ्यात राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे नोंदविले जाते. यावर्षीही चंद्रपूरने आपला हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून शासनाच्या वतीने वृक्षलागवडीचा व्यापक उपक्रम मागील वर्षी राबविण्यात आला. यंदाही याची व्याप्ती आणखी वाढवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.एकीकडे वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे १० ते १५ वर्ष वयाची जिवंत झाडे तोडली जात आहे. येरुर ग्रामपंचायतीने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी येरुर-ताडाळी या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुने २० फूट अंतरावर डौलात उभी असलेली झाडे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी येरुर ग्रामपंचायतीने याला बगल दिली आहे.ग्रामपंचायतीच्या या कृत्याचा येरुर येथील परशुराम नरसू निखाडे व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येरुर ग्रामपंचायतीने मोठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेली ही झाडे तोडल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. रस्त्याच्या बाजुने २० फूट अंतरावरील झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जेसीबीनेच खड्डे खोदण्यात येत आहेत.या संदर्भात निखाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात मोका चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सागवानाची शेकडो झाडे तोडलीजिवती तालुक्यातील येरमीयेसापूर येथील संतोष पेठे व अशोक पेठे यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर असलेली सागवानाची शेकडो झाडे पेठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भुलथापा देऊन तोडल्याचा आरोप येरमीयेसापूर येथील गोविंदराव कुमरे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.