शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षारोपणासाठी झाडांची कत्तल

By admin | Updated: May 29, 2017 00:27 IST

येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे.

१० ते १५ वर्षांची झाडे : येरुर ग्रामपंचायतीचा प्रतापलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : येरुर ते ताडाळी ग्रामपंचायत हद्दीत येत असलेल्या ताडाळी-येरूर रस्त्यालगतची १० ते १५ वर्ष वयाच्या झाडांची जेसीबी लावून कत्तल करण्यात आल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी वृक्षारोपणाच्या नावाखाली जुनी झाडे मुळासकट उपटून टाकण्याचा हा प्रकार येरुर ग्रामपंचायतीने केला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.चंद्रपूर जिल्हा प्रदूषण, तिव्र उष्णतामान यामुळे राज्यभर प्रसिध्द आहे. औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आलेल्या चंद्रपूरचे प्रदूषण मात्र मागील अनेक वर्षांपासून कमी झालेले नाही. आणखी ते दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. कारखान्यांमुळे वनसंपदा नष्ट होत असून उष्णतामानातही वाढ होत आहे. उन्हाळ्यात राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूरचे नोंदविले जाते. यावर्षीही चंद्रपूरने आपला हा रेकॉर्ड कायम ठेवला आहे. यावर काही प्रमाणात मात करण्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणात लागवड होणे गरजेचे आहे. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून शासनाच्या वतीने वृक्षलागवडीचा व्यापक उपक्रम मागील वर्षी राबविण्यात आला. यंदाही याची व्याप्ती आणखी वाढवून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे.एकीकडे वृक्षलागवडीच्या जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे १० ते १५ वर्ष वयाची जिवंत झाडे तोडली जात आहे. येरुर ग्रामपंचायतीने येणाऱ्या पावसाळ्यात झाडे लावण्यासाठी येरुर-ताडाळी या रस्त्यालगतच्या दोन्ही बाजुने २० फूट अंतरावर डौलात उभी असलेली झाडे जेसीबीच्या साहाय्याने पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली. शासनाचा संकल्प झाडे लावण्याचा असला तरी येरुर ग्रामपंचायतीने याला बगल दिली आहे.ग्रामपंचायतीच्या या कृत्याचा येरुर येथील परशुराम नरसू निखाडे व ग्रामस्थांनी विरोध केला आहे. येरुर ग्रामपंचायतीने मोठी प्रसिध्दी मिळविण्यासाठी आधीच अस्तित्वात असलेली ही झाडे तोडल्याचा आरोप निखाडे यांनी केला आहे. रस्त्याच्या बाजुने २० फूट अंतरावरील झाडे तोडल्यानंतर त्या ठिकाणी नवीन झाडे लावण्यासाठी जेसीबीनेच खड्डे खोदण्यात येत आहेत.या संदर्भात निखाडे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान झाले असून या संदर्भात मोका चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सागवानाची शेकडो झाडे तोडलीजिवती तालुक्यातील येरमीयेसापूर येथील संतोष पेठे व अशोक पेठे यांनी वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण केले आहे. या जागेवर असलेली सागवानाची शेकडो झाडे पेठे यांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना भुलथापा देऊन तोडल्याचा आरोप येरमीयेसापूर येथील गोविंदराव कुमरे यांनी केला असून या संदर्भात त्यांनी वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक यांच्याकडे तक्रार केली आहे. या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.