शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सहा महिन्यात बदलले १० वरिष्ठ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:16 IST

जिल्हा परिषदेत सध्या अधिकाºयांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मागील सहा महिन्यात तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदली करून घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यामागे जि. प. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देमिनी मंत्रालय : पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मागील सहा महिन्यात तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदली करून घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यामागे जि. प. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.गेल्या सहा महिन्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बीड येथून अशोक शिरसे दीड वर्षापुर्वी चंद्रपुरात रूजू झाले. त्यानंतर काही महिन्यातच पदाधिकाºयांच्या तक्रारीमुळे त्यांना दीर्घ रजेवर जावे लागले. रजेवरून परत आल्यानंतरही तक्रारीचे प्रकार सुरूच राहिल्याने त्यांनी आपली औरंगाबाद येथे बदली करवून घेतली. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रभू जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद चंद्रागडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशपांडे, मोहिते, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बुरांडे, समाजकल्याण अधिकारी आत्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, रोहयोचे समन्वयक बोधेले यांनीही पाठोपाठ बदल्या करून घेतल्या. तर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. शिवदास यांचीही कोल्हापूर येथे बदली झाली. विशेष म्हणजे ते तीन महिन्यापूर्वीच चंद्रपुरात रूजू झाले होते.विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आता जेमतेम एका वर्षाचा उरला आहे. त्यामुळेच पदाधिकारी मर्जीतील कामे करण्याचा सपाटा सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात ऐकायला येत आहे. यामध्ये अधिकारी टार्गेट होत असल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषद हे ग्रामविकासाचा आराखडा ठरविणारे मिनी मंत्रालय आहे. येथून ग्रामीण विकासाची दिशा निश्चित केली जाते. राज्य शासनाकडून तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहचावा, यासाठी असंख्य योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम कर्तव्य म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागतात. या यंत्रणेवर पदाधिकाºयांचा वचक असतो.पदाधिकारी आपल्या मर्जीतील कामे व्हावी, असा आग्रह धरतात. मात्र काहींना हे न पटल्यामुळेही बदली करून घेतल्याची चर्चा आहे.