शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
ईशनंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटंबाचा धक्कादायक खुलासा
3
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
4
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
5
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
6
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
7
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
8
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
9
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
10
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
11
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
12
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
13
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
14
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
15
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
16
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
17
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
18
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
19
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
20
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यात बदलले १० वरिष्ठ अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 23:16 IST

जिल्हा परिषदेत सध्या अधिकाºयांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मागील सहा महिन्यात तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदली करून घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यामागे जि. प. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.

ठळक मुद्देमिनी मंत्रालय : पदाधिकाऱ्यांचा दबाव असल्याचा सूर

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा परिषदेत सध्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू आहे. मागील सहा महिन्यात तब्बल दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने एकापाठोपाठ एक वरिष्ठ अधिकारी बदली करून घेत असल्याचे यावरून दिसून येत आहे. यामागे जि. प. पदाधिकाऱ्यांचा हस्तक्षेप कारणीभूत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला दिली.गेल्या सहा महिन्यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बीड येथून अशोक शिरसे दीड वर्षापुर्वी चंद्रपुरात रूजू झाले. त्यानंतर काही महिन्यातच पदाधिकाºयांच्या तक्रारीमुळे त्यांना दीर्घ रजेवर जावे लागले. रजेवरून परत आल्यानंतरही तक्रारीचे प्रकार सुरूच राहिल्याने त्यांनी आपली औरंगाबाद येथे बदली करवून घेतली. त्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) प्रभू जाधव, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता मिलींद चंद्रागडे, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. देशपांडे, मोहिते, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बुरांडे, समाजकल्याण अधिकारी आत्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी श्रीराम गोगुलवार, रोहयोचे समन्वयक बोधेले यांनीही पाठोपाठ बदल्या करून घेतल्या. तर ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. एस. शिवदास यांचीही कोल्हापूर येथे बदली झाली. विशेष म्हणजे ते तीन महिन्यापूर्वीच चंद्रपुरात रूजू झाले होते.विद्यमान जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ आता जेमतेम एका वर्षाचा उरला आहे. त्यामुळेच पदाधिकारी मर्जीतील कामे करण्याचा सपाटा सुरू केल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात ऐकायला येत आहे. यामध्ये अधिकारी टार्गेट होत असल्याचे बोलले जात आहे.जिल्हा परिषद हे ग्रामविकासाचा आराखडा ठरविणारे मिनी मंत्रालय आहे. येथून ग्रामीण विकासाची दिशा निश्चित केली जाते. राज्य शासनाकडून तळागाळातील जनतेपर्यंत विकास पोहचावा, यासाठी असंख्य योजना या मिनी मंत्रालयाच्या माध्यमातून राबविल्या जातात. या योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम कर्तव्य म्हणून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पार पाडावे लागतात. या यंत्रणेवर पदाधिकाºयांचा वचक असतो.पदाधिकारी आपल्या मर्जीतील कामे व्हावी, असा आग्रह धरतात. मात्र काहींना हे न पटल्यामुळेही बदली करून घेतल्याची चर्चा आहे.