शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

शासनाच्या तिजोरीवरील सहा कोटींचा बोजा हलका

By admin | Updated: February 4, 2015 23:10 IST

नक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवरील तब्बल सहा कोटी रुपयांचा बोजा हलका झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात शासकीय

जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचा शासनाला फायदा : कर्मचाऱ्यांत मात्र तीव्र नाराजीमंगेश भांडेकर - चंद्रपूरनक्षलग्रस्त क्षेत्रातून चंद्रपूर जिल्ह्याला वगळण्यात आल्याने शासनाच्या तिजोरीवरील तब्बल सहा कोटी रुपयांचा बोजा हलका झाला आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाविरोधात शासकीय कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला असून शासनाने नक्षलग्रस्त क्षेत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश करुन घ्यावा, यासाठी आंदोलन सुरु केली आहेत. शासन निर्णयानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांना नक्षलग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यापोटी या नक्षलग्रस्त तालुक्यात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना दरमहा दीड हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी दिली जात होती. गेल्या दहा वर्षापासून या नक्षलग्रस्त तालुक्यात कार्यरत हजारो शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासनाच्या भत्त्याचा लाभ मिळत होता. जानेवारी २०१४ मध्ये राज्याच्या पोलीस महासंचालकांकडून नक्षलग्रस्त क्षेत्राचा फेरआढावा घेण्यात आला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सातही तालुक्यांत नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया नसल्याचे आढळून आले. तसा अहवाल १७ आॅक्टोंबर २०१४ ला महासंचालकांनी शासनाला दिला. त्यानंतर राज्य शासनाने २६ डिसेंबर २०१४ ला परिपत्रक काढून चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांना नक्षलग्रस्त क्षेत्रातून वगळले. चंद्रपूर जिल्ह्यात महसूल विभाग, वनविभाग, जिल्हा परिषद, वीज वितरण, महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये ३४ हजार २९१ अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी अंदाजे १५ हजार कर्मचारी चंद्रपूर, गोंडपिंपरी, राजुरा, कोरपना, जिवती, बल्लारशहा, पोंभुर्णा, मूल, आणि सावली या तालुक्यांत सेवा देणारे असे गृहीत धरल्यास या कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता आणि एकस्तर वेतनश्रेणी स्वरुपात कमी-जास्त ४ हजार रुपये मिळत होते.मात्र, नक्षलग्रस्त भागातून जिल्ह्याला वगळल्याने अ, ब दर्जाच्या अधिकाऱ्यांचे वेतन दहा ते १५ हजार रुपयांने तर चर्तुथ श्रेणी कर्मचाऱ्यांचे वेतन दोन ते तीन हजार रुपयांनी कपात झाले आहे. म्हणजेच दर महिन्याला १५ हजार कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व आणि एकस्तर वेतनश्रेणीच्या स्वरुपात दिले जाणारे शासनाचे सहा कोटी रुपये आता बचत होणार आहेत.संघटनांचे आंदोलन४राज्य शासनाने चंद्रपूर जिल्ह्याला नक्षलग्रस्त भागातून वगळल्याने शासकीय कर्मचारी तीव्र संताप व्यक्त करीत आहेत. विविध संघटनांच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले असून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन पाठवून जिल्ह्याचा समावेश नक्षलग्रस्त भागात करण्याची मागणी करीत आहेत. जिल्ह्यात नक्षल कारवाया सुरुच असल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.सर्वच कर्मचारी चिंतेत नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता व एकस्तर वेतन मिळत असल्यामुळे अनेकांना जिल्ह्यात सेवा देण्याचा लाभ मिळत होता. सुरक्षित स्थळी राहून शासनाकडून भत्ता स्वरुपात मिळणारी रक्कम पचवण्याची अनेकांना सवय झाली. मात्र, नक्षलग्रस्त भागातून जिल्ह्याला वगळल्याने कार्यरत कर्मचाऱ्यांचा चांगलाच मनस्ताप वाढला आहे. शासकीय कार्यालयात कामानिमीत्त्य आलेल्या नागरिकांनाही ते आपले गाऱ्हाणे सांगताना दिसतात. अशी आहे कर्मचारी संख्याचंद्रपूर जिल्हा परिषद अंतर्गत वर्ग अ चे १९३, वर्ग ब मध्ये १०५५, वर्ग क मध्ये ७८८८ तर ड वर्गात १०६३ कर्मचारी कार्यरत आहेत. महसूल विभागात १६ हजार ५८७, पोलीस विभागात ३ हजार २३३, नगरपालिका येथे २ हजार ७०९ कर्मचारी कार्यरत आहेत.