शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी चंद्रपूरकरांच्या जीवाचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबाबुपेठला सात दिवसानंतर मिळाले पाणी : इतर वॉर्डातही तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने १ मार्चपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात अनेक वॉर्डाला दोन ते तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. तर गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी बाबुपेठला पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूरकरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहे.इरई धरणाद्वारे चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जाते. मात्र यावर्षी इरई धरण पूर्णत: भरले नाही. सध्यास्थितीत इरई धरणात १५ ते १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. त्यामुळे दररोज शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने १ मार्चपासूनच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने निश्चित केले. मात्र त्यानंतरही अनेक वॉर्डात पाणी पुरवठा करण्यात अनियमितता आहे. काही वॉर्डाला दिवसाआड तर काही वॉर्डाला दोन ते तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. अशातच बाबुपेठ वॉर्डाला गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात आला.ज्यांच्या घरी पाण्यासाठी नळाशिवाय इतर कोणतेही स्त्रोत नाही, त्यांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी पाण्याची धार कमी आणि लवकरच पाणी पुरवठा बंद होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.अशातच काही नागरिकांनी बोअर खोदणे सुरू केले आहे. मात्र ४०० फुटापर्यंतही पाणी लागत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती बघायला मिळत आहे.वीज केंद्राचे पाणी बंद करा : जोरगेवारआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. त्यामुळे सीटीपीएस बंद करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी एक समिती गठित करून समितीद्वारे इरई धरणाच्या पाण्याची पातळी तपासली जाईल. त्यानंतरच सीटीपीएस बंद करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विशाल निंबाळकर, आकाश साखरकर, माया पटले, अब्बासभाई, रुपेश पांडे आदींची उपस्थिती होती.महिनाभराच्या पाण्याचा सीटीपीएसकडून दोन दिवसातच वापरसीटीपीएस मधील सर्व संच दोन दिवसांसाठी बंद केले तर चंद्रपूर शहराला दोन महिने पाणी पुरवठा होऊ शकते. शहरातील जनतेला दररोज ४१ लक्ष (घनमीटर) पाणी वापरण्यासाठी लागते आणि जेवढे पाणी शहरातील जनतेला महिन्याभरासाठी लागते तेवढेच पाणी सीटीपीएस एका दिवसात वीज निर्मिती करण्याकरिता वापरतो. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना बीओटी तत्वावर खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली तेव्हापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.