शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

पाण्याअभावी चंद्रपूरकरांच्या जीवाचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 23:24 IST

गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देबाबुपेठला सात दिवसानंतर मिळाले पाणी : इतर वॉर्डातही तीन ते चार दिवसांनी पाणी पुरवठा

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : गतवर्षीच्या अत्यल्प पावसाने नैसर्गिक जलसाठे पूर्णत: भरले नाहीत. त्यामुळे मार्च महिन्यातच उन्हाची दाहकता वाढत असताना चंद्रपूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. चंद्रपूर शहरासाठी जीवनदायिनी असलेल्या इरई धरणाने तळ गाठल्याने १ मार्चपासून दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने जाहीर केले. मात्र प्रत्यक्षात अनेक वॉर्डाला दोन ते तीन दिवसांनी पाणी पुरवठा केला जात आहे. तर गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी बाबुपेठला पाणी पुरवठा करण्यात आला. त्यामुळे चंद्रपूरकरांचे पाण्यासाठी हाल होताना दिसत आहे.इरई धरणाद्वारे चंद्रपूर शहराला पाणी पुरवठा केला जाते. मात्र यावर्षी इरई धरण पूर्णत: भरले नाही. सध्यास्थितीत इरई धरणात १५ ते १६ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहेत. त्यामुळे दररोज शहराला पाणी पुरवठा करणे शक्य नसल्याने १ मार्चपासूनच दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे मनपाने निश्चित केले. मात्र त्यानंतरही अनेक वॉर्डात पाणी पुरवठा करण्यात अनियमितता आहे. काही वॉर्डाला दिवसाआड तर काही वॉर्डाला दोन ते तीन दिवसानंतर पाणी पुरवठा होत आहे. अशातच बाबुपेठ वॉर्डाला गेल्या सात दिवसानंतर मंगळवारी पाणी पुरवठा करण्यात आला.ज्यांच्या घरी पाण्यासाठी नळाशिवाय इतर कोणतेही स्त्रोत नाही, त्यांना तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत असला तरी पाण्याची धार कमी आणि लवकरच पाणी पुरवठा बंद होत असल्याने रोष व्यक्त केला जात आहे.अशातच काही नागरिकांनी बोअर खोदणे सुरू केले आहे. मात्र ४०० फुटापर्यंतही पाणी लागत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याची स्थिती बघायला मिळत आहे.वीज केंद्राचे पाणी बंद करा : जोरगेवारआॅनलाईन लोकमतचंद्रपूर : शहरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई सुरु आहे. त्यामुळे सीटीपीएस बंद करून चंद्रपूर शहराला नियमित पाणी पुरवठा करावा, अशी मागणी शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. यावेळी जिल्हाधिकारी यांनी एक समिती गठित करून समितीद्वारे इरई धरणाच्या पाण्याची पातळी तपासली जाईल. त्यानंतरच सीटीपीएस बंद करण्याचा निर्णय घेऊ, असे आश्वासन जोरगेवार यांना दिले. यावेळी विशाल निंबाळकर, आकाश साखरकर, माया पटले, अब्बासभाई, रुपेश पांडे आदींची उपस्थिती होती.महिनाभराच्या पाण्याचा सीटीपीएसकडून दोन दिवसातच वापरसीटीपीएस मधील सर्व संच दोन दिवसांसाठी बंद केले तर चंद्रपूर शहराला दोन महिने पाणी पुरवठा होऊ शकते. शहरातील जनतेला दररोज ४१ लक्ष (घनमीटर) पाणी वापरण्यासाठी लागते आणि जेवढे पाणी शहरातील जनतेला महिन्याभरासाठी लागते तेवढेच पाणी सीटीपीएस एका दिवसात वीज निर्मिती करण्याकरिता वापरतो. चंद्रपूर शहरातील पाणी पुरवठा योजना बीओटी तत्वावर खासगी कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली तेव्हापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत होत आहे.