शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

२३३ गावांत सिंगल फेज योजना

By admin | Updated: June 25, 2014 00:24 IST

मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली.

चंद्रपूर : मागील काही वर्षात महावितरणने पायाभूत आराखडा, गावठाण फिडर सेपरेशन, पुनर्रचित गतिमान विद्युत विकास कार्यक्रम असे उपक्रम राबवून वीज क्षेत्रात सुधारणा घडवून आणली. महावितरणने घेतलेल्या दोन महत्वांच्या निर्णयामुळे आता सिंगलफेज आणि कृषीधारकांना लाभ होणार आहे.जिल्ह्यातील २३३ गावांचा सिंगल फेजिंग योजनेत महावितरणने समावेश केला आहे. या सर्वच गावांना वीजवाहिन्याद्वारे विद्युतपुरवठा केला जाणार आहे. पूर्वीप्रमाणे सिंगल फेजवर उपलब्ध होणारी तीन फेज वीज आता दुपारी आठ तास व रात्री दहा तासांऐवजी इतर घरगुती वीजवाहिन्याप्रमाणे होणार आहे. सिंगल फेज व कृषी फिडर्सना याचा लाभ होणार आहे. मात्र, वीज वाणिज्यिक व वितरण हानीचा निकष येथेही लागू होणार आहे. अ, ब, क, व ड गटातील वीज वितरण हानीप्रमाणे कमी असायला हवी अन्यथा येथेही भारनियमन हे जादा वीज वितरण आणि वाणिज्यिक हानीच्या इ, फ, व ग गटाप्रमाणे होणार आहे.यापूर्वी इ, फ व ग गटातील वाहिनीवरील एखाद्या रोहित्रात बिघाड उत्पन्न झाल्यास त्या रोहित्रावरील ८० टक्के वीजबिलांचा भरणा झाल्याशिवाय ते रोहित बदलून देण्यात येत नव्हते. मात्र, ही अट आता शिथिल करण्यात आली असून, शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे.महावितरणने घेतलेल्या या निर्णयास सकारात्मक प्रतिसाद देण्यासाठी कृषी व घरगुती ग्राहकांना वेळेवर वीजबिलांचा भरणा करावा लागणार आहे. दरम्यान जिल्ह्यातील मागील अनेक वर्षापासून डिमांड भरुनही कृषी पंपाना वीज दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहीरी केवळ शोभेच्या वास्तू झाल्या होत्या. मात्र या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल, अशी शक्यता आहे. (नगर प्रतिनिधी)