शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
4
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
5
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
6
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
7
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
8
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
9
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
10
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
11
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
12
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
14
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
15
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
16
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
17
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
18
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
19
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
20
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग

सिंदेवाहीची निवडणूक अखेर रद्द

By admin | Updated: December 9, 2015 01:22 IST

महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले.

संघर्ष समितीला यश : सर्वच उमेदवारांची माघारसिंदेवाही : महाराष्ट्र शासनाने तालुका मुख्यालय असलेल्या सर्व गावांमध्ये नगरपंचायत गठित केली आहे. याला मात्र सिंदेवाही तालुका मुख्यालय अपवाद राहिले. ग्रामपंचायतीसाठी सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला होता. मात्र या निवडणूक प्रक्रियेवर नागरिकांनी बहिष्कार टाकला. त्या चार जणांनी नामांकन दाखल केले होते, त्यांनीही ते परत घेतल्याने ही निवडणूक प्रशासनाला अखेर रद्द करावी लागली आहे.सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीच्या नामांकन भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वपक्षीय नेत्यांनी तातडीची बैठक घेऊन संघर्ष समिती स्थापन केली व निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. मात्र यापूर्वीच चार उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले होते. त्यामुळे हे चारही उमेदवार ग्रा.पं. निवडणुकीचे अर्ज मागे घेणार की नाही, याबाबत शंका होती. मात्र नामांकन परत घेण्याच्या आज शेवटच्या दिवशी चारपैकी एक अर्ज छानणीमध्ये रद्द झाला तर तिघांनी सर्वासमोर गावाच्या विकासासाठी अर्ज मागे घेऊन सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार केला. सिंदेवाही नगरपंचायतीसाठी तालुका संघर्ष समितीच्या वतीने वॉर्डावॉर्डात जनजागृती करण्यात आली. त्यामुळे भाजपा, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षातील ज्येष्ठ पदाधिकारी व सदस्यांनी एकत्रीत येवून गावांच्या विकासासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. आम्हाला ग्रामपंचायत नको, नगरपंनचायत हवी, असा संदेश बहिष्काराच्या माध्यमातून शासनाला दिला. तालुका संघर्ष समितीने हे सर्व होवून शासन जागे न झाल्यास शासनाच्या विरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा मानस व्यक्त केला आहे. सिंदेवाही तालुक्याला हेतूपुरस्सर नगरपंचायतीच्या यादीतून डावलले जात असल्याचेही समितीने म्हटले आहे. त्यामुळे याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिंदेवाहीकरांनी अखेर निवडणुकीवरच बहिष्कार टाकला. आता यामुळे प्रशासनालाही निवडणूक रद्द करावी लागणार आहे.सिंदेवाही ग्रामपंचायत निवडणूक रद्द करण्यास सिंदेवाहीच्या नागरिकांनी तसेच राजकीय पक्षातील पदाधिकारी, सदस्य, व्यापारी मंडळ, तालुका संघर्ष समिती सदस्य, पत्रकारबंधू यांनी सहकार्य केले आहे. (शहर प्रतिनिधी)