शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
4
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
5
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
6
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
7
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
8
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
9
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
10
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
11
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
12
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
13
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
14
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
15
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
16
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
18
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
19
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
20
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले

स्वातंत्र्यपूर्व काळापासून 'ती' गावे पक्क्या रस्त्याविना; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:33 IST

गंगासागर हेटी-लोहारडोंगरी : खडतर वाटेत वन्यप्राण्यांचीही भीती

लोकमत न्यूज नेटवर्क सावरगाव : नागभीड तालुक्यातील जंगलव्याप्त भागात असलेल्या गंगासागर हेटी-लोहारडोंगरी गावाला स्वातंत्र्यपूर्व काळापासून पक्का रस्ताच नाही. परिणामी, नागरिक तळोधी (बा) महामार्गाचा वापर करतात. परंतु, या रस्त्याची अवस्था दयनीय आणि बिकट झाली आहे. तसेच हिंस्त्र पशुंचा नेहमीच वावर राहतो. त्यामुळे या रस्त्याने मार्गक्रमण करणे धोक्याचे झाले आहे. मात्र, याकडे बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. 

लोहारडोंगरी हे छोटेशे आदिवासीबहुल खेडेगाव आहे. या गावाच्या आसपास किटाळी, नवेगाव हे खेडेगाव आहेत. येथील नागरिक मोलमजुरी करून पोटाचा उदरनिर्वाह करतात. येथील लोकांना तळोधी बाजारपेठ अगदी जवळ पडत असल्याने त्यांना लोहारडोंगरी- गंगासागर हेटी या एकमेव मार्गाने यावे लागते. येथील मुले प्राथमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणासाठी गंगासागर हेटी, वाढोणा, तळोधी येथे जातात. परंतु, हा मार्ग कमकुवत व कच्च्या रस्त्याचा आहे. तसेच वाघ व इतर हिस्त्र प्राण्यांची दहशत असते. त्यामुळे या रस्त्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.

झाडे-झुडपांनी वेढला रस्तालोहारडोंगरी - गंगासागर हेटी गावाच्या या रस्त्यावर दुतर्फा झाडे- झुडपे वाढली आहे. तसेच रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे.साधे दुचाकीवरून प्रवास करणे कठीण झाले आहे. जंगलालगत रस्त्यावर हिंस्त्र श्वापदांचा वावर आहे. त्यामुळे बरेचदा दुर्घटना घडल्या असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्ता एकच, गावे वेगवेगळ्या क्षेत्रात गंगासागर हेटी-लोहारडोंगरी हा रस्ता जवळपास चार किमी अंतराचा आहे. मात्र लोहारडोंगरी, किटाळी, नवेगाव ही गावे ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात येतात. तर गंगासागर हेटी हे गाव चिमूर विधानसभा क्षेत्रात येते. वास्तविक पाहता ब्रह्मपुरी क्षेत्रातील मार्ग डांबरीकरणाचा झाला आहे. मात्र, काही अंतराचा मार्ग अत्यंत दयनीय स्थितीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

"गंगासागर हेटी-लोहारडोंगरी रस्त्याची दैनावस्था झाली आहे. या जंगलव्याप्त गावाच्या रस्त्याचे मजबुतीकरण करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनही लोकप्रतिनिधींकडून डोळेझाक होत आहे. रस्त्याच्या या गंभीर समस्येकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष देऊन तत्काळ हा प्रश्न निकाली काढावा." - वासुदेव गायकवाड, माजी सरपंच ग्रा. पं. गंगासागर हेटी

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाchandrapur-acचंद्रपूर