शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

वरोरा व चंद्रपूर हाॅटस्पॉट ठरण्याचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:25 IST

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ११६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ...

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ११६ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार १२८ झाली आहे. सध्या ५८८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत २ लाख २१ हजार ६३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी १ लाख ९४ हजार ७२६ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४०० बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६२, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

शनिवारी बाधित आलेल्या १२० रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील २८, चंद्रपूर तालुक्यातील दोन, बल्लारपूर सात, भद्रावती पाच, ब्रह्मपुरी तीन, नागभीड एक, सिंदेवाही तीन, मुल दोन, राजुरा सहा, वरोरा ६२ व कोरपना येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यांतून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

वरोऱ्यात तीन दिवसांत १५३ रुग्ण

वरोरा तालुक्यात १ मार्च रोजी केवळ १ रुग्ण आढळला. २ मार्च रोजी ४ रुग्ण आढळले. ३ मार्च रोजी एकही रुग्ण आढळला नव्हता. यानंतर ४ मार्च रोजी अचानक २६ रुग्ण आढळले. यानंतर हा आकडा दुप्पटीपेक्षा अधिक म्हणजे ५ मार्च रोजी ५९ वर गेला. ६ मार्च रोजी पुन्हा ६३ रुग्ण आढळले. अचानक वाढत असलेल्या या रुग्णसंख्येमु‌ळे वरोरा तालुका कोराेनाच्या बाबतीत संवेदनशील होत असल्याचे दिसून येत आहे.

चंद्रपूर मनपा क्षेत्रात सहा दिवसांत १४१ रुग्णांची भर

वरोरा तालुक्याच्या पाठोपाठ चंद्रपूर महानगरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. १ मार्च रोजी ९, २ मार्च २९, ३ मार्च २३, ४ मार्च २०, ५ मार्च ३२, ६ मार्च रोजी २८ नव्या रुग्णांची भर पडली आहे. म्हणजे सहा दिवसांत १४१ रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील आढळत असलेल्या नव्या रुग्णांच्या संख्येवर तालुकानिहाय दृष्टी फिरवल्यास सर्वाधिक रुग्ण वरोरा तालुक्यात तर यापाठोपाठ चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्राचा क्रमांक लागतो.

कोरोना कहर करण्याचे संकेत

चंद्रपूर जिल्ह्यात पहिली कोरोनाची लाट उशिराने आली होती. आता दुसरी लाटही उशिराने येत असल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर कोरोनाचा कहर सुरू आहे. आता चंद्रपूर जिल्ह्याचीही या दिशेने वाटचाल सुरू झाल्याचे हे संकेत होऊ शकते.