शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:43 IST

शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेवर परिणाम : उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही, बाहेर जाताना घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.सकाळी ९ वाजतापासूनच सूर्य आग ओकत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाही-लाही होत आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली असून उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत राहणार आहे. दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे कठिण झाले आहे. तापमाणात प्रचंड वाढ झाली आहे.ग्रामीण भागात शेतशिवारात शेतकरी, शेतमजूर दुपारपर्यंत काम करीत असून दुपारी घरी परतत आहे. शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुुकुलित यंत्रासोबत कुलर, पंख्याचा वापर करीत आहेत. परंतु उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नसल्याची स्थिती आहे. एकंदरीत नवतपाची उष्णता अंगाची लाहीलाही करीत आहे.दुपारी घराबाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असून शक्यतो जाणे टाळावे.उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तुंची मागणी वाढलीवाढत्या प्रदूषणापासून तसेच उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्स, टोपी, सनकोेटची मागणी वाढली आहे. तरूणांची आवड ओळखून बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. वातावरणाच्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हामुळे डोळ्यात जळजळ, सुजणे, लालसर होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, डोकेदुखी, बधिरपणा येणे, अशाप्रकारचा त्रास होत आहे.उन्हाळा झाला नकोसाएप्रिल महिन्यापासूनच पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे. त्यात नवतपाला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून म्हणजेच शनिवारपासून तापमानात आणखीच वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे पंखा तसेच कुलरची हवाही गरम येत असल्याने नागरिकांना उन्हाळा नकोसा झाला आहे.हवामान विभागाने नवतपामध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कूलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागत आहे. एसीची क्षमताही कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.