शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
4
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
5
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
8
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
9
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
10
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
11
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
12
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
13
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
14
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
15
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
16
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
17
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
18
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
19
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
20
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:43 IST

शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेवर परिणाम : उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही, बाहेर जाताना घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.सकाळी ९ वाजतापासूनच सूर्य आग ओकत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाही-लाही होत आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली असून उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत राहणार आहे. दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे कठिण झाले आहे. तापमाणात प्रचंड वाढ झाली आहे.ग्रामीण भागात शेतशिवारात शेतकरी, शेतमजूर दुपारपर्यंत काम करीत असून दुपारी घरी परतत आहे. शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुुकुलित यंत्रासोबत कुलर, पंख्याचा वापर करीत आहेत. परंतु उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नसल्याची स्थिती आहे. एकंदरीत नवतपाची उष्णता अंगाची लाहीलाही करीत आहे.दुपारी घराबाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असून शक्यतो जाणे टाळावे.उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तुंची मागणी वाढलीवाढत्या प्रदूषणापासून तसेच उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्स, टोपी, सनकोेटची मागणी वाढली आहे. तरूणांची आवड ओळखून बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. वातावरणाच्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हामुळे डोळ्यात जळजळ, सुजणे, लालसर होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, डोकेदुखी, बधिरपणा येणे, अशाप्रकारचा त्रास होत आहे.उन्हाळा झाला नकोसाएप्रिल महिन्यापासूनच पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे. त्यात नवतपाला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून म्हणजेच शनिवारपासून तापमानात आणखीच वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे पंखा तसेच कुलरची हवाही गरम येत असल्याने नागरिकांना उन्हाळा नकोसा झाला आहे.हवामान विभागाने नवतपामध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कूलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागत आहे. एसीची क्षमताही कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.