शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:43 IST

शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.

ठळक मुद्देबाजारपेठेवर परिणाम : उष्णतेमुळे अंगाची लाही-लाही, बाहेर जाताना घ्या काळजी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शनिवारपासून नवतपा सुरू झाला आहे. सूर्य आग ओकत असून सतत उष्णतेची लाट वाढत आहे. त्यामुळे दुपारच्या वेळी नागरिक घराबाहेर जाणे टाळत असल्याने रस्त्यांवर शुकशुकाट बघायला मिळत आहे. यामुळे नागरिकांचे दैनदिन कामेही प्रभावित होत आहे.सकाळी ९ वाजतापासूनच सूर्य आग ओकत असल्यामुळे उष्णतेच्या लाटेत अंगाची लाही-लाही होत आहे. २५ मेपासून रोहिणी नक्षत्राला सुरुवात झाली असून उष्णतेचा कहर ८ जूनपर्यंत राहणार आहे. दररोज सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या सुमारास रस्त्यावरून जाणे कठिण झाले आहे. तापमाणात प्रचंड वाढ झाली आहे.ग्रामीण भागात शेतशिवारात शेतकरी, शेतमजूर दुपारपर्यंत काम करीत असून दुपारी घरी परतत आहे. शहरातील नागरिक उष्णतेच्या उकाड्यापासून दिलासा मिळावा म्हणून वातानुुकुलित यंत्रासोबत कुलर, पंख्याचा वापर करीत आहेत. परंतु उष्णतेचा उकाडा त्यालाही जुमानत नसल्याची स्थिती आहे. एकंदरीत नवतपाची उष्णता अंगाची लाहीलाही करीत आहे.दुपारी घराबाहेर जाताना नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असून शक्यतो जाणे टाळावे.उन्हापासून बचाव करणाऱ्या वस्तुंची मागणी वाढलीवाढत्या प्रदूषणापासून तसेच उन्हाच्या झळांपासून बचाव करण्यासाठी बाजारात गॉगल्स, टोपी, सनकोेटची मागणी वाढली आहे. तरूणांची आवड ओळखून बाजारात गॉगल्सचे नवनवीन प्रकार आले आहेत. वातावरणाच्या या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. उन्हामुळे डोळ्यात जळजळ, सुजणे, लालसर होणे, डोळ्यांना थकवा जाणवणे, डोकेदुखी, बधिरपणा येणे, अशाप्रकारचा त्रास होत आहे.उन्हाळा झाला नकोसाएप्रिल महिन्यापासूनच पारा ४६ अंशाच्या वर गेला आहे. त्यात नवतपाला सुरुवात होताच पहिल्याच दिवसापासून म्हणजेच शनिवारपासून तापमानात आणखीच वाढ होत आहे. वाढलेल्या तापमानामुळे पंखा तसेच कुलरची हवाही गरम येत असल्याने नागरिकांना उन्हाळा नकोसा झाला आहे.हवामान विभागाने नवतपामध्ये तापमान वाढण्याचा इशारा दिला आहे. महिन्याच्या शेवटी सर्वाधिक तापमान राहील व जेवढे जास्त तापमान वाढेल, तेवढा जास्त पाऊस पडेल असे बोलले जात आहे. वाढलेल्या तापमानामुळे त्यांचा काहीच परिणाम जाणवत नाही. उकाड्यामुळे कूलरमध्ये वारंवार पाणी भरावे लागत आहे. एसीची क्षमताही कमी पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.