शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पाथरी-विहीरगाव मार्गावर झुडपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:21 IST

सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहे. वन ...

सावली : तालुक्यातील पाथरी-विहीरगाव रस्त्यावर अनेक झाडांच्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविताना अडचण येत आहे. वन विभागाने रस्त्यावर आलेली झाडे तोडावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. मोठे वाहन आल्यास रस्त्याच्या बाजूच्या झुडपांमुळे दुचाकी वाहनधारकांना अडचण निर्माण होते.

भटक्या जमातीतील कुटुंबांना भूखंड देण्याची मागणी

चंद्रपूर : जिल्ह्यात कैकाडी व तत्सम भटक्या, विमुक्त जमाती आढळून येतात. या जमातीतील शेकडो नागरिकांचा दारिद्र्यरेषेमध्ये समावेश आहे. त्यामुळे या समाजातील नागरिकांना घरबांधकामासाठी भूखंड व निधी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.

कर्मचाऱ्यांना संगणक प्रशिक्षण द्या

चंद्रपूर : ऑनलाईन वेतन देयक तयार करण्यासाठी नेट कनेक्टिव्हिटीसोबतच संगणकाचे संपूर्ण ज्ञान असणे गरजेचे आहे. मात्र अनेक शाळांमधील शिक्षक तसेच लिपिकांना संगणकाचे परिपूर्ण ज्ञान नाही. शाळा कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.

वाकलेले विद्युत खांब ‘जैसे थे’च

चंद्रपूर : तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक विद्युत खांबे वाकलेले आहेत. त्यामुळे सदर खांबांची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. अनेक दिवसापासून खांब वाकलेल्या अवस्थेत असल्याने अपघात होऊ शकतो. याबाबत वीज वितरण कंपनीकडे अनेकवेळा तक्रार करण्यात आली. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.

थ्री-जी सेवा नावापुरतीच

चंद्रपूर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात बीएसएनएलच्या वतीने थ्री-जी सेवा देण्यात आली आहे. मात्र ही थ्री-जी सेवा केवळ नावापुरतीच असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणी बीएसएनएलची इंटरनेट स्पीड टू-जी सेवेप्रमाणे दिली जात आहे. नागरिकांकडून थ्री-जी सेवेचे पैसे घेतले जात असून, सेवा मात्र टू-जीप्रमाणे दिली जात आहे.

राजुरा-नागपूर बससेवा पूर्ववत करा

गडचांदूर : राजुरा येथून कोरपना, वणीमार्गे नागपूरसाठी लाॅकडाऊनपूर्वी थेट बससेवा होती. मात्र ती अद्यापही पूर्ववत करण्यात आली नाही. त्यामुळे या मार्गावरून नागपूरला प्रवास करणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. हा मार्ग अगदी कमी अंतराचा व सोयीस्कर असल्याने प्रवासी याच मार्गे जाणे पसंत करतात. राजुरा आगार व्यवस्थापकांनी लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

ग्रामीण भागातील रस्त्याची दुरवस्था

कोरपना : तालुक्यातील रूपापेठ फाटा-खडकी, परसोडा-रायपूर, कोठोडा खु.-गोविंदपूर, धोपटाला-शेरज बु. - पिपरी, नारांडा - पिपरी, कोडशी खु. -पिपरी, कातलाबोडी-बोरगाव, कन्हाळगाव-कोरपना-कुसळ, खैरगाव- कोरपना, सावलहिरा-येल्लापूर्, हातलोणी-घाटराई, टांगाला सावलहिरा आदी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

तुळशीनगराची पाण्यासाठी भटकंती

चंद्रपूर : येथील वृंदावन व कृषिनगर वाॅर्डामध्ये अद्यापही नळ योजना आली नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

सिटी बस सुरू नसल्याने प्रवाशांना त्रास

चंद्रपूर : चंद्रपूर शहरांतर्गत महामंडळाच्या वतीने सिटी बस चालविली जाते. मात्र लाॅकडाऊननंतर ती बंद करण्यात आली. तेव्हापासून अद्यापही बस सुरू करण्यात आली नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन सिटी बस सुरु करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

चंद्रपुरातील सिग्नलची उंची वाढवावी

चंद्रपूर : दिवेसेंदिवस चंद्रपूर शहरातील लोकसंख्या वाढत असल्यामुळे वाहनांचीही संख्या वाढली आहे. त्यामुळे जागोजागी वाहतूक कोंडी होत आहे. दरम्यान, महत्त्वाच्या चौकांमध्ये सिग्नल आहेत, मात्र या सिग्नलची उंची कमी असल्यामुळे एखाद्या चौकात मोठे वाहन उभे राहिल्यास मागील वाहनधारकांना सिग्नल सुरु झाले वा बंद हे दिसत नाही. त्यामुळे सिग्नलची उंची वाढवून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करावा

सिंदेवाही : शासनातील विविध विभागामध्ये नोकर भरतीवर बंदी घातली आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे अनेक जण बेरोजगार झाले आहेत. अनेक युवक स्वयंरोजगारासाठी प्रयत्न करीत आहेत़ मात्र, कर्ज मिळत नसल्याने व्यवसाय कसा उभारावा, हा प्रश्न निर्माण झाला़ कोरोनामुळे राज्य सरकारने निधीत मोठी कपात केली. त्यामुळे तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगारांची अडचण मोठी वाढली आहे.

वसतिगृहातून विलगीकरण कक्ष हटवा

चंद्रपूर : विलगीकरण कक्षासाठी चंद्रपूर येथील आदिवासी मुलांचे वसतिगृह ताब्यात घेऊन विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनामुळे लगबगीने वसतिगृह सोडावे लागले. मात्र त्यांची मूळ कागदपत्रे वसतिगृहातच लटकून आहेत. वसतिगृहात विलगीकरण कक्ष असल्याने तिथे जाण्यास बंदी आहे. परिणामी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी अडचण जात आहे.