शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
6
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
7
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
8
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
11
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
12
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
13
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
14
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
15
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
16
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
17
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
18
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
19
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
20
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?

पाणीटंचाई व डासमुक्तीसाठी श्रमदान

By admin | Updated: June 5, 2017 00:23 IST

तालुका वरोरा येथील सातारा गावात मागील कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भर उन्हात पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे.

स्तुत्य उपक्रम : शासकीय अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांचा सहभागलोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : तालुका वरोरा येथील सातारा गावात मागील कित्येक वर्षांपासून उन्हाळ्यात तीव्र पाणी टंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांना भर उन्हात पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे गावातच शोषखड्डे प्रत्येक घरात तयार करून पाणी जमिनीत मुरविण्याकरिता वरोरा तालुक्यातील शासकीय अधिकारी, कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने श्रमदान करणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सातारा गावातील जमिनीच्या पाण्याची पातळी वाढुन गाव पाणी टंचाई व डासमुक्त होईल, असा निर्धार व्यक्त करीत श्रमदानाला प्रारंभ करण्यात आला. अशाप्रकारे श्रमदान हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग असल्याचे मानले जात आहे.वरोरा तालुक्यातील सातारा गावाची लोकसंख्या १४५ असून ४५ कुटुंब आहे. उन्हाळा सुरू होताच सातारा गावात पाणी पाठविण्याकरिता प्रशासनाच्या बैठका सुरू होते. गावात दोन विहिरी आहे. त्या उन्हाळ्यात कोरड्या पडत असल्याने ग्रामस्थांना तीन किमी अंतरावरून पाणी आणावे लागत असते. सातारा छोटस गाव आहे. त्यामुळे हे गाव पाणी टंचाईमुक्त कसे होणारश, याकरिता आ. बाळु धानोरकर यांनी पुढाकार घेतला. शासकीय योजनेतून कुपनलिका, टँकरने विहीरीत पाणी सोडणे या उपाययोजना सुरू आहे. परंतु त्या तात्पुरत्या असल्याने कायमस्वरूपी मात करण्याकरिता आ. धानोरकर यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. सातारा गाव पाणी टंचाईमुक्त करण्याकरिता वरोराचे संवर्ग विकास अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी श्रमदान करण्याचे सूचविले. अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थ प्रत्येक घरी शोषखड्डा तयार करतील. छतावर पडणारे पाणी, भांडी धुण्याचे पाणी अडविण्याकरिता पुढाकार घेतला व पावसाळ्यापूर्वीच शोषखड्डे खोदण्याच्या कामाला आ. बाळु धानोरकर यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी, उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे, तालुका कृषी अधिकारी व्ही.आर. प्रकाश, संवर्ग विकास अधिकारी सुदर्शन तुपे, सहायक संवर्ग विकास अधिकारी बोबडे, सरपंच जयश्री ढोक, उपसरपंच राजकुमार ऐकुडे, बाजार समिती सभापती विशाल बदखल, उपसभापती राजु चिकटे, बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, योगेश खामनकर, बंडु शेळके, देवानंद मोरे, राजु आसुटकर, भलमे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी सातारा गावात प्रत्येक घरासमोर दोन वृक्ष लावून वृक्षारोपणाला प्रारंभही करण्यात आला. गावालगतचा नाला खोलीकरण करून त्या नजीकच्या विहिरीमध्ये पावसाचे पाणी शास्त्रीयदृष्ट्या शुद्धीकरण करून टाकण्यात येणार आहे. शोषखड्डा ४ बाय ४ फुट खोल करण्यात येणार आहे. यामुळे गावातील संपुर्ण पावसाळ्याचे पाणी व भांडी धुणी करणारे पाणी जमिनीत मुरविण्यात येणार आहे.गावकरी खोदणार शेततळे पावसाळ्याचे पाणी जमिनीत झिरपले पाहिजे, त्याचा फायदा रब्बी पिकांनाही होतो व जमिनीतील पाण्याची पातळी वाढते. याकरिता प्रत्येक शेतकऱ्याने शेतात शेततळे खोदण्यासाठी होकार दिला. त्यामुळे सातारा गावात येत्या काही महिन्यात ज्या व्यक्तीच्या नावे शेती आहे. तिथे शेततळे होणार आहे. याची माहिती संकलन करण्याचा सुचना उपविभागीय कृषी अधिकारी एस.बी. राजवाडे यांनी कृषी कर्मचाऱ्यांना दिल्या. त्यामुळे सातारा गाव भविष्यात सुजलाम सुफलाम होईल हे निश्चित मानले जात आहे.पाणी दान करणाऱ्यांचा सत्कारसातारा गावात पाणी टंचाई असल्याने नागरिकांना पाण्याकरिता पायपीट करावी लागत होती. ग्रामस्थांची केवलवाणी धडपड गावातील जीवतोडे नामक शेतकऱ्यास बघविली नाही. जीवतोडे यांनी आपल्या गावालगतच्या विहीरीतून पाईपलाईनने पाणी सोडण्याकरिता होकार दिला. कुठलाही मोबदल्याची अपेक्षा जीवतोडे यांनी ठेवली नाही. त्यामुळे जीवतोडे यांचे पाणीदानाचे कार्य महान असल्याने आ. बाळु धानोरकर व उपविभागीय अधिकारी प्रमोद भुसारी यांनी त्यांचा सत्कार केला.