शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

संपामुळे दोन दिवसांत एक कोटींचा फटका

By admin | Updated: July 28, 2016 01:27 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी....

अडते-व्यापाऱ्यांचा संप : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप बुधवारीही सुरू होता. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली असून माल विकायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान संपामुळे दोन दिवसांत जवळपास १ कोटी रूपयाची उलढाल थांबल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. संपामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी पंचाईत झाली आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले असून ठोक भावात माल विकणारे शेतकरी चिल्लर विक्री करण्यास नकार देत आहेत. परिणामी भाजीपाल्याची नियमीत विक्री करणारे चिल्लर भाजीविक्रेते गल्लोगल्ली फिरून दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप सुरू केला आहे. या संपात बाजार समितीचे ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघू शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) भाजीपाल्याचे भाव दुप्पट व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालाची ठोक विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढले असून दोन दिवसांपुर्वी टमाटर ३० रूपये किलो होते. संपामुळे हातठेलेवाले टमाटर ५० रूपये किलो, मिरची १०० रूपये, पत्ता कोबी ६० रूपये, कारली १२० रूपये, ढेमसे ६० रूपये, वांगे ८० रूपये, बटाटे ५० रूपये, कोहळा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.