शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
3
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
4
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
5
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
6
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
7
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
8
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
9
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
10
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
11
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
12
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
13
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
14
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
15
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
16
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
17
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
18
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
19
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
20
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल

संपामुळे दोन दिवसांत एक कोटींचा फटका

By admin | Updated: July 28, 2016 01:27 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी....

अडते-व्यापाऱ्यांचा संप : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप बुधवारीही सुरू होता. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली असून माल विकायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान संपामुळे दोन दिवसांत जवळपास १ कोटी रूपयाची उलढाल थांबल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. संपामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी पंचाईत झाली आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले असून ठोक भावात माल विकणारे शेतकरी चिल्लर विक्री करण्यास नकार देत आहेत. परिणामी भाजीपाल्याची नियमीत विक्री करणारे चिल्लर भाजीविक्रेते गल्लोगल्ली फिरून दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप सुरू केला आहे. या संपात बाजार समितीचे ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघू शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) भाजीपाल्याचे भाव दुप्पट व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालाची ठोक विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढले असून दोन दिवसांपुर्वी टमाटर ३० रूपये किलो होते. संपामुळे हातठेलेवाले टमाटर ५० रूपये किलो, मिरची १०० रूपये, पत्ता कोबी ६० रूपये, कारली १२० रूपये, ढेमसे ६० रूपये, वांगे ८० रूपये, बटाटे ५० रूपये, कोहळा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.