शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

संपामुळे दोन दिवसांत एक कोटींचा फटका

By admin | Updated: July 28, 2016 01:27 IST

शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी....

अडते-व्यापाऱ्यांचा संप : शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या चंद्रपूर : शेतमाल विक्रीतील अडत थेट व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या निर्णयाच्या विरोधात चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अडते व व्यापाऱ्यांनी मंगळवारपासून संप सुरू केला आहे. हा संप बुधवारीही सुरू होता. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची मोठी गोची झाली असून माल विकायचा कुठे, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. दरम्यान संपामुळे दोन दिवसांत जवळपास १ कोटी रूपयाची उलढाल थांबल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली. संपामुळे चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीसह गंज वॉर्डातील भाजी बाजारात शुकशुकाट पसरला आहे. त्यामुळे ग्राहकांचीही मोठी पंचाईत झाली आहे. भाजीपाल्याचे दर दुप्पटीने वधारले असून ठोक भावात माल विकणारे शेतकरी चिल्लर विक्री करण्यास नकार देत आहेत. परिणामी भाजीपाल्याची नियमीत विक्री करणारे चिल्लर भाजीविक्रेते गल्लोगल्ली फिरून दामदुप्पट दराने भाजीपाल्याची विक्री करीत आहेत. व्यापाऱ्यांकडून अडत कापण्याच्या निर्णयाविरोधात राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापाऱ्यांनीही संप सुरू केला आहे. या संपात बाजार समितीचे ६९ भाजीपाला अडते व फळांचे ३४ अडते असे १०३ तर १२७ व्यापाऱ्यांचा समावेश आहे. सायंकाळी व्यापाऱ्यांची बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघू शकला नाही. (स्थानिक प्रतिनिधी) भाजीपाल्याचे भाव दुप्पट व्यापाऱ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांच्या मालाची ठोक विक्री थांबली आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे भाव दुप्पट वाढले असून दोन दिवसांपुर्वी टमाटर ३० रूपये किलो होते. संपामुळे हातठेलेवाले टमाटर ५० रूपये किलो, मिरची १०० रूपये, पत्ता कोबी ६० रूपये, कारली १२० रूपये, ढेमसे ६० रूपये, वांगे ८० रूपये, बटाटे ५० रूपये, कोहळा ५० रूपये किलो दराने विकला जात आहे. त्यामुळे गृहीणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.