शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

उन्हाळ्याच्या दिवसांत भासणार रक्ताचा तुटवडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST

चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानही सातत्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ४० बॅग ...

चंद्रपूर : सध्या उन्हाळ्याचे दिवस असून तापमानही सातत्याने वाढत आहे. त्यातच शासकीय रक्तसंकलन पेढीतून दररोज ३० ते ४० बॅग रक्तपुरवठा केला जात आहे. त्या तुलनेत रक्तदात्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे भविष्यात रक्त तुटवडा होण्याची शक्यता आहे. सिकलसेल, थैलीसीमीया, रक्तक्षय असलेल्या रुग्णांना रक्ताचा पुरवठा करणे गरजेच आहे. रक्ताची मागणी वाढत आहे. त्या तुलनेत रक्तसंकलन कमी प्रमाणात होत आहे. तसेच गत वर्षभरात कोरोनामुळे रक्तदान शिबिराची संख्याही कमी झाली आहे. कोरोनाची लस घेणाऱ्यांना २८ दिवस रक्तदान करता येत नाही. त्यामुळे येत्या काही दिवसांत अधिकाधिक तरुणांनी पुढे येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे.

मागील वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या दहशतीमुळे सामाजिक संस्था, संघटनांद्वारे रक्तदान शिबिरांचेही आयोजन कमी झाले आहे. परिणामी मागणी जास्त आणि संकलन कमी, अशी काहीशी अवस्था आहे. सध्या कोरोना लसीकरण केले जात आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येत नाही. त्यामुळे भविष्यात रक्ताचा तुडवडा भासण्याची शक्यता आहे. एनबीटीसीच्या नवीन मार्गदर्शक सूचनेनुसार कोरोनाची लस घेणारी व्यक्ती त्यानंतर २८ दिवस रक्तदान करू शकणार नाही. त्यामुळे भविष्यात रक्तपेढीला रक्त पुरवठा कमी होणार आहे. येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्तपेढीतून दररोज ३० ते ४० बॅग रक्तपुरवठा केला जात आहे. आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे रक्तदान करणाऱ्यांची संख्या कमी तर रक्ताची मागणी वाढते, अशावेळी अडचण भासू नये यासाठी तरुणांनी समोर येऊन रक्तदान करणे गरजेचे आहे. विशेषत: कोरोना लस घेण्यापूर्वी प्रथम रक्तदान करून लस घेतल्यास भविष्यात रक्ताचा तुडवडा भासणार नाही.

--

युवकांनी पुढाकार घेणे गरजेचे

रक्तदात्यांमध्ये जिल्ह्यात ४० ते ५० वर्षे वयोगटातील नागरिक मोठ्या प्रमाणात रक्तदान करतात. यातील काहींनी आता कोरोना लस घेतली आहे. त्यामुळे पुढील २८ दिवसांपर्यंत त्यांना रक्तदान करत येणार नाही. आता सामाजिक जबाबदारी समजून लस घेण्यापूर्वी रक्तदान करणे गरजेचे आहे.

बाॅक्स

शासकीय रक्तपेढीत मोजकाच साठा

येथील शासकीय रक्तपेढीत मोजकाच रक्तसाठा उपलब्ध आहे. दररोज ३० ते ४० बॅगची मागणी असते. सद्यस्थितीत ए पाॅझिटिव्ह ६५, बी पाॅझिटिव्ह १००, ओ पाॅझिटिव्ह ९० तसेच अन्य गट रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, हा साठा येत्या काही दिवसांपर्यंतचाच आहे.

बाॅक्स

सध्या शासकीय रक्तपेढीत रक्ताचा साठा उपलब्ध आहे. मात्र, उन्हाळ्याच्या दिवसांत रक्तदात्यांची संख्या कमी होते आणि रक्ताची मागणी वाढते. त्यामुळे सामाजिक संस्था, संघटनांनी या दिवसांत रक्तदान करून सहकार्य करणे गरजेचे आहे.

-डाॅ. अमित प्रेमचंद

ब्लड बँक अधिकारी, मेडिकल काॅलेज चंद्रपूर