शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
3
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
4
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
5
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
6
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
7
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
8
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
9
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
10
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
11
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
12
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
13
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
14
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
15
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
16
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
17
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
18
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
19
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
20
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...

दुकानदारांच्या वजनात घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 21:56 IST

आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.

ठळक मुद्देग्राहकांची लूट : पॅकिंग वस्तू मात्र एमआरपी दरानेच

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : आधीच महागाई गगनाला भिडत आहे. सर्वसामान्य नागरिक या महागाईमुळे भरडले जात आहेत. असे असतानाच आता दुकानदारांकडून ग्राहकांची लूट केली जात आहे. वजनात घोळ केली जात असून अनेक ठिकाणी वजनाच्या नावाखाली दगड, लोखंडाचा वापर केला जात असल्याचे लोकमतच्या पाहणीत आढळून आले. मात्र पॅकिंगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व इतर वस्तू एमआरपी दरानेच विकले जात असल्याचेही लोकमतच्या पाहणीत आढळून आले.चंद्रपुरात एमआरपीपेक्षा जास्त दराने अनेक खाद्य पदार्थ, वस्तू यांची विक्री होते का, याबाबत लोकमतने शनिवारी बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. विविध दुकानात जाऊन पॅकींगमध्ये असलेले खाद्य पदार्थ व साबणाची खरेदी केली. यावेळी दुकानदारांनी एमआरपी किंमतच घेतली.मात्र बाजारपेठेत फिरताना आणखी एक धक्कादायक प्रकार लक्षात आला. तांदूळ, साखर, गहू व इतर किराणा वस्तू मोजून देताना काही दुकानात इलेक्ट्रानिक तराजूचा वापर होताना दिसला. तर काही ठिकाणी वजनमापे ठेवलेल्या साध्या तराजूचा वापर होत असल्याचेही दिसून आले.विशेष म्हणजे, अनेक दुकानातील वजनांचे पासींगच केले नसल्याचे आढळून आले. अनेक दुकानात वर्षानुवर्षापासून तेच ते एक किलो, दोन किलो, पाच किलो, दहा किलोचे वजन वापरले जात आहे. बदाम, काजू, खसखस यासारख्या महागड्या वस्तू ग्रॅमनेच खरेदी केल्या जातात. मात्र काही ठिकाणी ग्रॅमच्या वजनाऐवजी एक रुपया, पाच रुपयांची नाणी वापरली जात आहे. काही दुकानात तर केवळ लोखंडच तराजूमध्ये ठेवले जाते व त्यानेच मोजून वस्तू दिली जाते.भाजी विक्रेत्यांकडूनही लूटप्रस्तुत प्रतिनिधीने भाजीमार्केटमध्ये फेरफटका मारला असता या ठिकाणी तर अंदाजानेच भाजीपाला विकला जात असल्याचे दिसून आले. काही भाजीविक्रेते भाजीपाला मोजून देतात. मात्र अनेकांकडे अधिकृत वजनाऐवजी दगड, लोखंड यांचा वापर केला जात असल्याचे दिसून आले.एका ठिकाणी ३० रुपये किलो याप्रमाणे टमाटर असेल तर तेच टमाटर काही फुटांवर असलेल्या दुसऱ्या भाजीविक्रेत्यांकडे २० रुपये प्रमाणे विकले जाते. तेथीलच भाजीविक्रेत्याला याबाबत विचारले असता वजनात घोळ करून कमी किमतीत टमाटर विकले जात असल्याचे सांगितमले.वजनांची पासिंग नाहीदरवर्षी दुकानदारांकडे असलेल्या वजनांची पासींग होणे अपेक्षित आहे. मात्र संबंधित विभागाकडून दुकानदारांकडील वजनाची पासींगच केली जात नाही. वर्षानुवर्ष एकच वजन दुकानदार वापरत असल्याचे दिसते. त्यामुळे ग्राहक भरडला जात आहे.दरात मोठी तफावततांदूळ, दाळ, गहू, साखर व इतर वस्तूंच्या दराविषयी काही दुकानात माहिती घेतली असता त्यात मोठी तफावत दिसून आली. प्रत्येक वस्तूची किंमत विविध दुकानांमध्ये वेगवेगळी असल्याचे दिसून आले. याबाबत एका किराणा दुकानदाराला विचारले असता त्याने वस्तूच्या क्वालिटीमुळे ही तफावत असल्याचे सांगितले. मात्र वजनातही घोळ असण्याची शक्यता यात आहे.