शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
4
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
5
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
6
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
7
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
8
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
9
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
10
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
11
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
12
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
13
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
14
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
15
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
16
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
17
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
18
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
19
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
20
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं

डिक्की उघडी ठेवून धावली ‘शिवशाही’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 22:42 IST

शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.

ठळक मुद्देप्रवाशांचे साहित्य धोक्यात : सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शिवशाही बसमधील प्रवास सुरक्षीत असल्याचे मानले जाते. त्यामुळे तिकीट दर अधिक असतानाही शिवशाही बसमधून प्रवास करण्याकरिता प्रवाश्यांचा कल वाढला आहे. मात्र शिवशाही बसने मागील डिक्की उघडी ठेवतच चंद्रपूर-नागपूर प्रवास केला. यामध्ये प्रवाशांच्या सामनांबाबत वाहक चालक किती गंभीर असतात, असा प्रश्न प्रवाश्यांना पडत आहे.खासगी बसेसना स्पर्धा करताना एसटी महामंडळ नावीन्यपूर्ण योजना राबवून प्रवाशांना एसटी बसमधून प्रवास करण्याकरिता आकर्षित करीत आहेत. स्पर्धेत आपणही मागे राहू नये याकरिता एसटी महामंडळाने वातानुकलीत शिवशाही बससेवा सुरु केली. शिवशाही बसची तिकीट अधिक असल्यामुळे सुरवातीला प्रवास टाळीत होते. परंतु, लांब पल्ल्याच्या शिवशाही बसला प्रवासी प्राधान्य देताना दिसत आहेत.शिवशाही बस मध्ये जागा कमी असल्याने प्रवाश्यांचे साहित्य ठेवण्याकरिता मागील बाजूने डिक्की दिली आहे. या डिक्कीमध्ये प्रवाशांचे साहित्य व्यवस्थित व सुरक्षीत असते. त्यामुळे प्रवाशी बिनधास्त प्रवास करीत असतात. मात्र चंद्रपूरवरुन नागपूरकडे निघालेली शिवशाही बस मागील डिक्की उघडी ठेवून धावत वरोऱ्यापर्यंत व समोरही डिक्की उघडीच ठेवीत नागपूरकडे निघाली. यामध्ये अनेक प्रवाशांचे साहित्य असुरक्षीत राहिले.