शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:19 IST

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा द्या, खंडित वीज पुरवठ्यामुळेही शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.वरोरा तालुक्यातील खांबाडा व माढेळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करण्यात येतो. आठवड्यातील तीन दिवस रात्री १० ते ४ या काळात कृषिपंपांना थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येतो. सदर पसिरारातील जंगलाला लागून शेती असल्याने रात्री वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात जात नाही. सध्या सोयाबीनचे पीक निघाले असून शेतजमीन तयार करून दुसरे पीक घेण्याकरिता पाण्याची आवश्यकता आहे. असे असल्याने शेतकरी दुबार पीक घेऊ शकत नाही. कृषिपंपांना ज्यावेळी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा दिला जातो, त्यात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो तर कधी विजेचा दाब कमी होवून अनेक शेतकºयांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळाल्या आहेत. त्यामुळे रात्री थ्री फेजचा वीज पुरवठा बंद करून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळावा, या मागणीकरिता वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात शिवसेनेने दोन तास ठिय्या मांडला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती चिकटे, जामखुळाचे सरपंच पुरूषोत्तम पावडे, कामगार सेना वरोरा तालुका प्रमुख मनोज दानव, गजानन धोटे, अंबादास वावरे, संजय बोरकर, संदीप पावडे, अजाब पावडे, विजय पावडे व शेतकरी उपस्थित होते.कृषिपंपांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळण्याबाबत शेतकºयांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत अहवाल तत्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविणार आहे. वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगू.-प्रशांत राठी, कार्यकारी अभियंतायुवासेनेचा उपविभागीय अभियंत्याला घेरावपोंभूर्णा : महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनाही मोटारपंपाने दिवसरात्र पाणी करावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पिके करपली जात आहेत. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालु असून वारंवार खंडीत होणाºया विद्युत पुरवठ्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोंभूर्णा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना सोमवारी घेराव घालत जाब विचारला.युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास युवासेना, शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. महावितरणच्या वतीने कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून महावितरण शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केला आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यातील शेकडो शेतकरी यापासून वंचित आहेत. यावेळी विविध समस्या निराकरणासाठी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार आदी उपस्थित होते.