शहरं
Join us  
Trending Stories
1
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
2
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
3
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
4
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
6
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
7
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
8
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
9
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
10
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
12
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
13
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
14
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
15
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
16
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
17
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
18
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
19
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
20
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ

कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात शिवसेनेचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:19 IST

कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.

ठळक मुद्देशेतकऱ्यांची मागणी : कृषिपंपाला दिवसा वीज पुरवठा द्या, खंडित वीज पुरवठ्यामुळेही शेतकरी त्रस्त

लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : कृषिपंपाला आठवड्यातून तीन दिवस रात्री थ्री फेज पुरवठा देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांना शेतातील पिकांना पाणी देता येत नाही. रात्री ऐवजी दिवसा कृषिपंपांना थ्री फेज पुरवठा देण्याच्या मागणीसाठी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांच्या कक्षात सोमवारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दोन तास ठिय्या दिला.वरोरा तालुक्यातील खांबाडा व माढेळी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमधून वीज पुरवठा करण्यात येतो. आठवड्यातील तीन दिवस रात्री १० ते ४ या काळात कृषिपंपांना थ्री फेज वीज पुरवठा देण्यात येतो. सदर पसिरारातील जंगलाला लागून शेती असल्याने रात्री वन्यप्राण्यांच्या भीतीने शेतकरी पिकांना पाणी देण्याकरिता शेतात जात नाही. सध्या सोयाबीनचे पीक निघाले असून शेतजमीन तयार करून दुसरे पीक घेण्याकरिता पाण्याची आवश्यकता आहे. असे असल्याने शेतकरी दुबार पीक घेऊ शकत नाही. कृषिपंपांना ज्यावेळी दिवसा थ्री फेज वीज पुरवठा दिला जातो, त्यात अनेकदा वीज पुरवठा खंडीत होत असतो तर कधी विजेचा दाब कमी होवून अनेक शेतकºयांच्या कृषीपंपाच्या मोटारी जळाल्या आहेत. त्यामुळे रात्री थ्री फेजचा वीज पुरवठा बंद करून सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळावा, या मागणीकरिता वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता यांच्या कक्षात शिवसेनेने दोन तास ठिय्या मांडला. यावेळी बाजार समितीचे उपसभापती चिकटे, जामखुळाचे सरपंच पुरूषोत्तम पावडे, कामगार सेना वरोरा तालुका प्रमुख मनोज दानव, गजानन धोटे, अंबादास वावरे, संजय बोरकर, संदीप पावडे, अजाब पावडे, विजय पावडे व शेतकरी उपस्थित होते.कृषिपंपांना सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत थ्री फेज वीज पुरवठा मिळण्याबाबत शेतकºयांचे निवेदन प्राप्त झाले आहे. याबाबत अहवाल तत्काळ वरिष्ठ कार्यालयात पाठविणार आहे. वरिष्ठांचा अहवाल आल्यानंतर शेतकऱ्यांना सांगू.-प्रशांत राठी, कार्यकारी अभियंतायुवासेनेचा उपविभागीय अभियंत्याला घेरावपोंभूर्णा : महावितरणचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकरी, व्यावसायिक व शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मोठा असंतोष पसरला आहे. परतीच्या पावसाने दगा दिल्याने शेतकºयांनाही मोटारपंपाने दिवसरात्र पाणी करावे लागत आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळे पिके करपली जात आहेत. सध्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालु असून वारंवार खंडीत होणाºया विद्युत पुरवठ्याने विद्यार्थीही त्रस्त झाले आहे. त्यामुळे युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी पोंभूर्णा येथील महावितरणच्या उपविभागीय अभियंत्यांना सोमवारी घेराव घालत जाब विचारला.युवासेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे व उपजिल्हा प्रमुख आशिष कावटवार यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. वीज पुरवठा सुरळीत न केल्यास युवासेना, शिवसेनेच्या वतीने महावितरणच्या कार्यालयाला कुलूप ठोकण्याचा इशाराही देण्यात आला. महावितरणच्या वतीने कृषीपंपधारक शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र हे आश्वासन हवेतच विरले असून महावितरण शेतकऱ्यांची पिळवणूक करीत असल्याचा आरोप युवा सेनेचे जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांनी केला आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांना २४ तास विद्युत पुरवठा हे शासनाचे धोरण आहे. मात्र तालुक्यातील शेकडो शेतकरी यापासून वंचित आहेत. यावेळी विविध समस्या निराकरणासाठी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी युवासेनेचे जिल्हा प्रमुख सचिन भोयर, उप जिल्हा प्रमुख आशिष कावटवार, शिवसेना शहर प्रमुख गणेश वासलवार आदी उपस्थित होते.