शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

शिवभोजन केंद्रसंचालकाचे अनुदान रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:19 IST

चंद्रपूर : गरजू तसेच गरिबांना ताजे जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन सुरू केले. लाॅकडाऊनच्या काळामध्ये ...

चंद्रपूर : गरजू तसेच गरिबांना ताजे जेवण मिळावे यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यात शिवभोजन सुरू केले. लाॅकडाऊनच्या काळामध्ये लाखो गरिबांना आधार मिळाला, मात्र शिवभोजन केंद्र संचालकांचे मागील तीन महिन्यांपासूनचे अनुदान रखडल्यामुळे त्यांना स्वत: उपाशी राहण्याची वेळ आली आहे.

गरिबांसाठी सुरू केलेल्या या योजनेमुळे लाॅकडाऊनच्या काळात मोठा आधार मिळाला. लाॅकडाऊनपूर्वी दहा रुपये त्यानंतर प्रथम पाच रुपयात आणि आता तर पूर्णपणे शिवभोजन थाळी मोफत देण्याचा उपक्रम राज्य शासनाने सुरू केला आहे. शिवभोजन केंद्र संचालकांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात थेट जमा केले जात होते. मात्र मागील तीन महिन्यांपासून अनुदान जमाच झाले नाही. त्यामुळे शिवभोजन केंद्र कसे चालवावे, असा प्रश्न या केंद्र संचालकांना पडला आहे. दररोज शेकडो थाळी पुरवाव्या लागत आहे. यासाठी किराणा, गॅस तसेच केंद्रामध्ये काम करणाऱ्यांचे पगार द्यावे लागत आहे.

मात्र राज्य शासनाकडून अनुदान मिळाले नसल्याने अनेकांवर आता केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने शिवभोजन केंद्र संचालकांचे अनुदान त्वरित देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

बाॅक्स

जिल्ह्यातील शिवभोजन केंद्र -२६

दररोज किती जण घेतात लाभ -३७००

बाॅक्स

केंद्र संचालक म्हणतात....

शिवभोजन केंद्रामुळे गोरगरिबांची उपासमार टळली. मात्र आमच्या बिलांना मोठा विलंब होतोय. आर्थिक अडचणींवर मात करून आम्ही शिवभोजन केंद्र चालवतोय. राज्य सरकारने अनुदान दिल्यास केंद्र चालवणे सोयीचे होईल,

-शिवभोजन संचालक

कोट

राज्य सरकारने शिवभोजन केंद्र सुरू केल्यामुळे गरिबांना आधार मिळाला आहे. आम्हालाही रोजगार मिळाला आहे. मात्र घरून पैसे खर्च करून केंद्र चालवणे आता कठीण जात आहे. दररोज शंभर थाळी द्यावी लागते. अनुदान मिळत नसल्याने मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

केंद्र संचालक चंद्रपूर

बाॅक्स

असे मिळतात अनुदान

राज्य सरकारने गरिबांना मोफत शिवभोजन थाळी वितरण सुरू केले आहे. यामध्ये शहरी भागासाठी ४५ रुपये प्रती थाळी तर ग्रामीण भागामध्ये ३५ रुपये प्रतिथाळीप्रमाणे शासन अनुदान देतात. किमान शंभर थाळीचे एका केंद्रातून वितरण केले जाते.

बाॅक्स

काय मिळतात थाळीमध्ये

शिवभोजन थाळीमध्ये दोन पोळी, एक वाटी भात, एक वाटी वरण, भाजी दिल्या जाते. लाॅकडाऊनच्या काळामध्ये पाॅर्सल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे केंद्रामध्ये बसून जेवण न करता लाभार्थ्यांना घरी जाऊन जेवण करता येत होते.

कोट

शिवभोजन केंद्राचे अनुदान देण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे. काही केंद्रचालकांच्या त्रुटी असेल त्या केंद्रसंचालकांचे अनुदान रखडले असेल. त्या त्रुटी दूर करून अनुदान देण्यात येईल.

-शालिकराव भराडी

जिल्हा पुरवठा अधिकारी, चंद्रपूर