शहरं
Join us  
Trending Stories
1
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
2
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
3
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
4
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
5
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
6
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
7
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
8
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
9
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
10
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
11
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
12
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
13
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
14
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
15
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
16
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
17
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
18
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS
19
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
20
बाबो! क्रिती सनॉनने मुंबईत खरेदी केलं पेंटहाऊस, किंमत ऐकून पायाखालची जमीनच सरकेल

शिवाजी महाराजांचे स्वराज्य राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक

By admin | Updated: February 20, 2017 00:26 IST

शिवाजी महाराजांच्या पदरी विविध जाती-धर्माचे सरदार व सैनिक होते. त्यांनी हिंदू धर्मगुरूंप्रमाणे मुस्लीम संतांचाही सन्मान केला आहे.

ताहेर भाई : ३८७ व्या छत्रपती शिवाजी महाराज जयतींचा सोहळा चंद्र्रपूर : शिवाजी महाराजांच्या पदरी विविध जाती-धर्माचे सरदार व सैनिक होते. त्यांनी हिंदू धर्मगुरूंप्रमाणे मुस्लीम संतांचाही सन्मान केला आहे. त्यांच्या एकही मुस्लीम सरदार किंवा सैनिकाने त्यांच्याशी कधी गद्दारी केली नाही. छत्रपतींचे स्वराज्य हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक होते, असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध विचारवंत ताहेर भाई यांनी रविवारी येथे केले.मराठा सेवा संघातर्फे तुकूम येथील संघाच्या नवीन वास्तूमधील सभागृहात शिवाजी महाराजांच्या ३८७ व्या जयतींचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ताहेर भाई बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव होते. तर कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुधाकर अडबाले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर ऋषीजी कोंडेकर, डॉ. सचिन भेदे, संजय आल्लूरवार, डॉ. अनुप वासाडे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा लता होरे यांची प्रमुख उपस्थिती होती.ताहेर भाई म्हणाले की, औरंगजेबाने शिवाजी महाराजांशी नऊ वर्षे लढा दिला. परंतु या काळात शिवाजींच्या स्वराज्याचा आकार वाढतच गेला. औरंगजेबाने ९ मार्च १६६८ रोजी शिवाजीचे राजापद मान्य केले. महाराजांचे अंगरक्षक रुस्तम-ए-जमाल व सिद्दी इब्राहिम होते. छत्रपती शिवाजींच्या सैन्यात मदारी मेहतर, हिरोजी फर्जद, सिद्दी जोहर, शिवा काशिद, इब्राहिम खान असे विविध मुस्लीम सरदार व सैनिकांचा भरणा होता. त्यांचे वकील काजी हैदर होते. नूरखान बेग यांच्यासारखे सेनापती होते. रायगडाचे बांधकाम पाहण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते. तेथे हिंदू धर्मियांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. त्यावेळी त्यांनी सुक्ष्म निरीक्षण करून मुस्लीम रयतेसाठीही व्यवस्था करण्याचा आदेश दिला.त्यांचे राष्ट्रीय एकात्मतेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण एकमेकांच्या धर्माचा, एकमेकांच्या परंपरांचा आदर केला पाहिजे. कोणी म्हणत असेल की, हिंदू धर्म श्रेष्ठ आहे तर कोणी म्हणत असेल की, मुस्लीम धर्म श्रेष्ठ आहे. पण ते तितकेसे खरे नाही. खरा श्रेष्ठ धर्म मानवता धर्म आहे. मानव धर्माचे आपण पालन केले पाहिजे. शिवाजी महाराजांना समानतेची शिकवण राजे शहाजी व माँसाहेब जिजाऊ यांनी दिली होती. त्यांच्याच वारसा शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी यांनी चालविला. संभाजी राजांनी तीन भाषांमध्ये ग्रंथ रचना केली. बुद्धभूषण हा ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिला. हा त्यांनी मनुस्मृतीचा गुन्हा केला. त्यामुळे त्यांचा बहादूरगडावर खून करण्यात आला, असा दावाही ताहेर भाई यांनी केला. याप्रसंगी आरोही फुलझेले या विद्यार्थिनीने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत दिलेले इंग्रजी भाषेतील भाषण म्हणून दाखविले. प्रास्ताविक दीपक जेऊरकर यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रशांत गोखरे यांनी आणि आभार प्रदर्शन अलका टोंगे यांनी केले. कार्यक्रमाला सुरेश अडवे, गिरीधर काटवले, सुरेश माळवे, प्रभाकर ढवस, अतुल टोंगे, डॉ. सचिन बोधाने आदींसह अनेकजण उपस्ति होते. (प्रतिनिधी)शिवरायांच्या विचारांवर धर्मनिरपेक्ष राज्यघटनायावेळी ताहेर भाई यांनी सांगितले की, शिवरायांनी धर्मनिरपेक्षतेचे तत्त्व स्वत:च्या जीवनात पाळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिवरायांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धर्मनिरपेक्ष राज्यघटना देशाला दिली. त्या दोघांच्याही आजोबांचे नाव मालोजी होते. बदलापूर व बेळगाव येथील शिवजयंती कार्यक्रमात डॉ. आंबेडकरांनी व्याख्यान दिले. शिवाजी महाराज अधिक काळ जगले असते तर त्यांची शिवधर्माची संकल्पना समाजात रुजली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.