शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

तिने दोनदा प्राप्त केला ध्वजारोहणाचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:33 IST

नागभीड : गावात ध्वजारोहणाचा मान प्रत्येकालाच मिळत नाही. मात्र तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीने हा मान दुसऱ्यांदा प्राप्त केला ...

नागभीड : गावात ध्वजारोहणाचा मान प्रत्येकालाच मिळत नाही. मात्र तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीने हा मान दुसऱ्यांदा प्राप्त केला आहे. तिच्या या सन्मानाचे गावात चांगलेच कौतुक होत आहे.

काही गावांचे वेगळे वैशिष्ट्य असते. या वैशिष्ट्यामुळे त्या गावाची कधी कधी चर्चाही होत असते. असेच एक वेगळे वैशिष्ट्य नवखळा या गावाने जोपासले आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत जो विद्यार्थी गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय येईल. त्याचे हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरले आणि गेल्या सहा वर्षांपासून नवखळा हे गाव हे वैशिष्ट्य जपत आहे. नवखळा हे गाव नागभीडचे एक उपनगरच आहे. नागभीड येथे नगर परिषद स्थापन करण्यात आली तेव्हा या गावाला नगर परिषदेत समाविष्ट करून घेण्यात आले. ग्रामपंचायत होती तेव्हा गावाच्या प्रमुख चौकातील ध्वजारोहण गावचे उपसरपंच करायचे. गाव नगर परिषदेत समाविष्ट झाल्याने हे ध्वजारोहण कोण करेल हा प्रश्न गावकऱ्यांसमोर निर्माण झाला. यावर विचारविनिमय सुरू असताना जे विद्यार्थी दहावी व बारावी परीक्षेत सर्वाधिक गुण प्राप्त करतील त्या विद्यार्थ्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिनाचे ध्वजारोहण करावे असे कोणीतरी सुचविले. ही कल्पना सर्वांच्याच पसंतीला उतरली आणि तेव्हापासून नवखळा येथे गावातून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहणाची ही परंपरा सुरू आहे. यावर्षी स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहणाचा मान बारावीत गावातून प्रथम आलेल्या तनया गजेंद्र खापरे या विद्यार्थिनीला मिळाला आहे. उल्लेखनीय, तनया दहावीच्या परीक्षेतही गावातून प्रथम आली होती आणि गणराज्य दिनाचे ध्वजारोहण केले होते.

160821\img-20210813-wa0031.jpg

तनया गजेंद्र खापरे