शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

मातृत्वाच्या ओढीने तिला भेटला बछडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 22:39 IST

येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला.

ठळक मुद्दे२४ तासात भेटली आई : विहिरीत पडलेला बछडा सुखरूप

अमोद गौरकार ।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला. अखेर तरूण पर्यावरणवादी मंडळ तसेच वनविभागाने योजना आखून त्या बछड्याला त्याच्या आईपर्यंत पोहचविण्यास मदत केली.ग्रामस्थांनी बछड्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिराऱ्यांनी त्याची तपासणी केली असता, तो ठणठणीत असल्याचे अहवाल दिला. आता मात्र वनविभाग आणि ग्रामस्थांना बछड्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न सतावत होता. त्याला इतरत्र सोडले तर तो उपासमारीने तसेच इतर प्राणी त्याला मारेल ही भीती होती. यानंतर तरुण पर्यावरणवादी मंडळ आणि वनविभागाने व्युहरचना आखली. ज्या ठिकाणी बछडा विहिरीत पडता होता. त्याच ठिकाणी त्याची आई येईल, असा अंदाज व्यक्त करून त्या विहिरीजवळ त्याला ठेवणे हा एकमेव पर्याय निवडण्यात आला. बछडा केवळ तीन ते चार महिन्याचाच असल्याने अनेक धोके होते. त्यामुळे त्याला भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आणि तो कॅरेट विहिरीजवळ रात्री आठ वाजताच्या दरम्यान ठेवण्यात आला. त्यानंतर वनविभाग तसेच पर्यावरणवादी मंडळाचे चमू लक्ष ठेवून होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी ती आली आणि तब्बल अर्धा तास निरीक्षण केल्यानंतर कॅरेटमधील बछड्याला अलगद उचलून जंगलात निघून गेली.वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल रूपेश केदार, वनरक्षक भैसारे, नवघडे, वनकर्मचारी प्रदिप ढोणे, जगू लांजेवार, सुनिल लांजेवार, रघू शेंडे, निलेश मुंगणे यांच्यासह तरूण पर्यारणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, विजय गजभे, मोरेश्वर पांगुळ तसेच मांगलगाव येथील नागरिकांनी यासाठी सहकार्य केले.मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. यामुळे मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. या प्राण्यांना पाणी तसेच अन्न मिळविण्यासाठी अन्नसाखळीतील इतर प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा हा संघर्ष आणखी वाढून तो जीवावर बेतणारा ठरू शकतो, तेव्हा सर्वांनीच जागृत होणे गरजेचे आहे 

टॅग्स :leopardबिबट्या