शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
5
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
8
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
9
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
10
Ahmedabad Plane Crash :या अपघाताला जबाबदार कोण? बोइंग विमानातील त्रुटी की...?
11
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
12
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
13
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
14
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
15
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
16
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
17
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
18
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण
19
ग्रुप बुकिंग केल्यास एसटीने थेट पंढरपूरला जाता येणार, ‘आषाढी’साठी ५ हजार विशेष बसेस : सरनाईक
20
राज ठाकरेंनी घेतला 'ड्रीमलाईनर'वर आक्षेप; एवढ्या तक्रारी असूनसुद्धा का वापरतोय? डीजीसीएला सवाल 

मातृत्वाच्या ओढीने तिला भेटला बछडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2019 22:39 IST

येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला.

ठळक मुद्दे२४ तासात भेटली आई : विहिरीत पडलेला बछडा सुखरूप

अमोद गौरकार ।लोकमत न्यूज नेटवर्कशंकरपूर : येथून ९ किमीवरील मांगलगाव येथील अरविंद घानोडे यांच्या शेतातील विहिरीत तीन महिन्यांचा बछडा पडला. ग्रामस्थांनी त्याला सुखरूप बाहेर काढून वनविभागाच्या स्वाधीन केले. त्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न पडला. अखेर तरूण पर्यावरणवादी मंडळ तसेच वनविभागाने योजना आखून त्या बछड्याला त्याच्या आईपर्यंत पोहचविण्यास मदत केली.ग्रामस्थांनी बछड्याला विहिरीतून बाहेर काढल्यानंतर वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले. पशुवैद्यकीय अधिराऱ्यांनी त्याची तपासणी केली असता, तो ठणठणीत असल्याचे अहवाल दिला. आता मात्र वनविभाग आणि ग्रामस्थांना बछड्याला कुठे सोडायचे, हा प्रश्न सतावत होता. त्याला इतरत्र सोडले तर तो उपासमारीने तसेच इतर प्राणी त्याला मारेल ही भीती होती. यानंतर तरुण पर्यावरणवादी मंडळ आणि वनविभागाने व्युहरचना आखली. ज्या ठिकाणी बछडा विहिरीत पडता होता. त्याच ठिकाणी त्याची आई येईल, असा अंदाज व्यक्त करून त्या विहिरीजवळ त्याला ठेवणे हा एकमेव पर्याय निवडण्यात आला. बछडा केवळ तीन ते चार महिन्याचाच असल्याने अनेक धोके होते. त्यामुळे त्याला भाजीपाल्याच्या कॅरेटमध्ये ठेवण्यात आले आणि तो कॅरेट विहिरीजवळ रात्री आठ वाजताच्या दरम्यान ठेवण्यात आला. त्यानंतर वनविभाग तसेच पर्यावरणवादी मंडळाचे चमू लक्ष ठेवून होते. रात्री ११ वाजताच्या सुमारास त्या ठिकाणी ती आली आणि तब्बल अर्धा तास निरीक्षण केल्यानंतर कॅरेटमधील बछड्याला अलगद उचलून जंगलात निघून गेली.वनपरिक्षेत्र अधिकारी भाविक चिवंडे यांच्या मार्गदर्शनात वनपाल रूपेश केदार, वनरक्षक भैसारे, नवघडे, वनकर्मचारी प्रदिप ढोणे, जगू लांजेवार, सुनिल लांजेवार, रघू शेंडे, निलेश मुंगणे यांच्यासह तरूण पर्यारणवादी मंडळाचे सदस्य अमोद गौरकर, विरेंद्र हिंगे, विजय गजभे, मोरेश्वर पांगुळ तसेच मांगलगाव येथील नागरिकांनी यासाठी सहकार्य केले.मागील काही दिवसांपासून वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गावाकडे धाव घेत आहे. यामुळे मानव आणि वन्यप्राण्यांमधील संघर्ष टोकाला गेला आहे. या प्राण्यांना पाणी तसेच अन्न मिळविण्यासाठी अन्नसाखळीतील इतर प्राण्यांची संख्या वाढविण्यासाठी आता प्रयत्न करणे आवश्यक आहे, अन्यथा हा संघर्ष आणखी वाढून तो जीवावर बेतणारा ठरू शकतो, तेव्हा सर्वांनीच जागृत होणे गरजेचे आहे 

टॅग्स :leopardबिबट्या