शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
3
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
4
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
5
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
6
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
7
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
8
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
9
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
10
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
11
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
12
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
13
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
14
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
15
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
16
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
17
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
18
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
19
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
20
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?

‘ती’ आयएसओ जि.प. शाळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 23:24 IST

एकीकडे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जातात.

ठळक मुद्देपालकांचा एल्गार : ४०० च्यावर शिक्षकांनी भेट दिलेली नामवंत शाळा

आशिष देरकर ।आॅनलाईन लोकमतकोरपना : एकीकडे एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहू नये, यासाठी शासनाकडून कसोशीने प्रयत्न केला जातात. दुसरीकडे मात्र शासनाने अस्तित्वात असणाºया शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने पालकांनी विद्यार्थ्यांसह गेडामगुडा येथील शाळेसमोर निदर्शने केली. इतर शाळेत विद्यार्थ्यांना पाठवण्यास पालकांनी बहिष्कार टाकला आहे.कोरपना तालुक्यातील गोविंदपूर, गेडामगुडा, कोठोडा (खुर्द), चेन्नई (खुर्द) व भोईगुडा अशा पाच जि.प. शाळा १० पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे बंद करण्यात आल्या आहे. बिबी गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या गेडामगुडा येथील जि. प. शाळेमध्ये एकूण आठ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेला आयएसओ दर्जा प्राप्त झाला असून आजपर्यंत जवळपास चारशे शिक्षकांनी भेटी दिल्या आहेत. ही उपक्रमशील शाळा म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहे. शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या शाळेतील आठही विद्यार्थी इंग्रजी विषयात तरबेज आहेत. नुकत्यात झालेल्या बीटस्तरीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत या आठही विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. गावातील लोकांनी लोकसहभागातून या शाळेला घडविले असल्यामुळे शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे गावकºयांना धक्का बसला आहे.२०१२-१३ सत्रापासून प्रगत शाळा म्हणून या शाळेने नावलौकिक मिळवला असून शाळेने गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. असे असताना शासनाच्या दहा विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयात या शाळेचा समावेश आहे.मात्र गावातील पालक आपल्या पाल्याला दुसºया कोणत्याही शाळेत पाठविण्यास तयार नाही. गेडामगुडा येथील आयएसओ शाळा सुरू न केल्यास शिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आम्ही गावकरी आमरण उपोषण करू, असा इशारा सरपंच मंगलदास गेडाम यांनी दिला आहे.हा तर आदिवासींवर अन्याय- सुभाष धोटे'गाव तेथे शाळा' हे शासनाचे ब्रीद वाक्य होते. ठिकठिकाणी आदिवासींनी छोटे-छोटे पाडे व गुडे तयार करून आपल्या वस्त्या निर्माण केल्या. शहरी, ग्रामीण, आदिवासी व नक्षलग्रस्त असे वेगवेगळे निकष ठेवून शासनाने निर्णय घ्यायला पाहिजे. मात्र तसे न करता सरसकट दहा पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. या निर्णयाविरोधात आपण आवाज उठवू असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा माजी आमदार सुभाष धोटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.स्वच्छ, सुंदर व उपक्रमशील शाळा असून गावकऱ्यांच्या साथीने या शाळेचा विकास झाला आहे. गावकऱ्यांनी शाळेसाठी मेहनत घेतली आहे. शाळेतील शैक्षणिक व भौतिक वातावरण प्रसन्न आहे. अशा शाळेला बंद करणे विद्यार्थी हिताचे नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ आहे.- मंगलदास गेडामसरपंच, ग्रामपंचायत बिबीआम्ही श्रमदानातून शाळा घडवलेली आहे. शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवून ठेवलेली आहेत. एका शंभर टक्के आदिवासी पाड्यावरील शाळा बंद करण्याचा शासनाचा निर्णय घातक आहे. आम्ही इतर शाळेत विद्यार्थी न पाठवता आमच्याच शाळेत विद्यार्थी पाठवू. अन्यथा आम्ही विद्यार्थ्यांना घरी ठेवू.- किशोर गेडाम, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती