शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांपासून राजगड येथे अविरत श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:35 IST

केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी श्रमदान न करता गेल्या १७ वर्षांपासून अविरत श्रमदान करून गावातील जनतेला ....

दोनदा प्रथम पुरस्कार : प्रशासनाने प्रोत्साहन दिल्यास देशात ‘आदर्श गाव’राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्कमूल : केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी श्रमदान न करता गेल्या १७ वर्षांपासून अविरत श्रमदान करून गावातील जनतेला श्रमदानाचे महत्त्व सातत्याने मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावात बघायला मिळत आहे. २००० मध्ये सुरू झालेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत भाग घेऊन २००२-०३मध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस खेचृून आणून महाराष्ट्राच्या पटलावर आपली अमीट उमटवली होती. नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथील चंदू पाटील मारकवार यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या सहभागामुळे यावर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ पुरस्काराचा पहिला क्रमांक पुनश्च: राजगडला मिळाला. राजगड गावाचे नियोजन भौगोलिक रचनेनुसार आहे. गावातील युवकांना रोजगार, सिंचनाची शेती व विविध उपक्रमातून गावाचा विकास साधण्याचा मानस असताना मात्र जिल्हा प्रशासन असो की, लोकप्रतिनिधी प्रोत्साहन देण्यास अपयशी ठरत आहे. गावाला प्रोत्साहित केल्यास ‘राजगड’ गाव देशात ‘आदर्श गाव’ म्हणून आपली अमीट छाप उमटविण्यात यश येईल, असा विश्वास चंदू पाटील मारकवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावाची लोकसंख्या १ हजार ५९६ असून ८०८ पुरुष व ७८० महिलांचा समावेश आहे. २००० मध्ये मारकवार यांनी गावातील युवकांना एकत्र करून नव्याने सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ अभियानात उडी घेतली. त्यावेळी कुठलाही अनुभव नसताना गावासाठी श्रमदान करायचे, एवढाच उद्देश ठेऊन युवकांनी श्रमदानास सुरूवात केली. त्यानंतर श्रमदान केल्यास व अभियानात सहभाग घेतल्यास पुरस्कार मिळतो, असे कळल्यानंतर ग्रामस्थांनी अभियानात जीव ओतला. त्याचेच फलित म्हणजे २००२-०३ मध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बक्षीस मिळाल्यानंतरही मारकवार यांनी गावाच्या विकासासाठी झटण्याचा प्रयत्न सातत्याने केला. गावातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगर निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाचा पाहिजे, त्या प्रमाणात सहभाग मिळाला नाही. दुग्ध व्यवसायासाठी शीतगृह असणे आवश्यक असताना तालुक्यात ही व्यवस्था नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले नाही. राजगड गावात शाश्वत विकास करण्याचा मानस असला तरी प्रोत्साहनाचा अभाव आहे. राज्यात प्रथम आलेले राजगड गाव ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघात असताना मात्र त्या गावाच्या विकासात्मक कार्यात प्रोत्साहनाची थाप पडावी, असे कधीही घडले नाही.२००२-०३ मध्ये राजगडला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळाल्यापासून पुरस्कारांची मालिका सुरूच आहे. २००६-०७ मध्ये निर्मलग्राम पुरस्कार, २०११ मध्ये पर्यावरणरत्न पुरस्कार, २०१५-१६ मध्ये दीनदयाल उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार, तसेच २०१६-१७ मध्ये पुनश्च: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातत्याने पुरस्काराची व गाव विकासाची मालिका जपणाऱ्या ‘राजगड’ला प्रोत्साहनाची गरज आहे.राज्यात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरवे बाजार असो की राळेगणसिध्दी असो. याच गावाच्या तोडीस तोड आदर्श गाव निर्माण करण्याचा आत्मविश्वास चंदू पाटील मारकवार व इतर ग्रामस्थांना आहे.