शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
3
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
4
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
5
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
6
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
7
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
8
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
9
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
10
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
11
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
12
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
13
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
14
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
15
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
16
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
18
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
19
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
20
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांपासून राजगड येथे अविरत श्रमदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2017 00:35 IST

केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी श्रमदान न करता गेल्या १७ वर्षांपासून अविरत श्रमदान करून गावातील जनतेला ....

दोनदा प्रथम पुरस्कार : प्रशासनाने प्रोत्साहन दिल्यास देशात ‘आदर्श गाव’राजू गेडाम । लोकमत न्यूज नेटवर्कमूल : केवळ पुरस्कार मिळविण्यासाठी श्रमदान न करता गेल्या १७ वर्षांपासून अविरत श्रमदान करून गावातील जनतेला श्रमदानाचे महत्त्व सातत्याने मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावात बघायला मिळत आहे. २००० मध्ये सुरू झालेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत भाग घेऊन २००२-०३मध्ये राज्यात प्रथम क्रमांकाचे बक्षीस खेचृून आणून महाराष्ट्राच्या पटलावर आपली अमीट उमटवली होती. नागरिकांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी येथील चंदू पाटील मारकवार यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. या सहभागामुळे यावर्षीचा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्राम स्वच्छ पुरस्काराचा पहिला क्रमांक पुनश्च: राजगडला मिळाला. राजगड गावाचे नियोजन भौगोलिक रचनेनुसार आहे. गावातील युवकांना रोजगार, सिंचनाची शेती व विविध उपक्रमातून गावाचा विकास साधण्याचा मानस असताना मात्र जिल्हा प्रशासन असो की, लोकप्रतिनिधी प्रोत्साहन देण्यास अपयशी ठरत आहे. गावाला प्रोत्साहित केल्यास ‘राजगड’ गाव देशात ‘आदर्श गाव’ म्हणून आपली अमीट छाप उमटविण्यात यश येईल, असा विश्वास चंदू पाटील मारकवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.मूल तालुक्यातील ‘राजगड’ या गावाची लोकसंख्या १ हजार ५९६ असून ८०८ पुरुष व ७८० महिलांचा समावेश आहे. २००० मध्ये मारकवार यांनी गावातील युवकांना एकत्र करून नव्याने सुरू झालेली संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छ अभियानात उडी घेतली. त्यावेळी कुठलाही अनुभव नसताना गावासाठी श्रमदान करायचे, एवढाच उद्देश ठेऊन युवकांनी श्रमदानास सुरूवात केली. त्यानंतर श्रमदान केल्यास व अभियानात सहभाग घेतल्यास पुरस्कार मिळतो, असे कळल्यानंतर ग्रामस्थांनी अभियानात जीव ओतला. त्याचेच फलित म्हणजे २००२-०३ मध्ये राज्यातून प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. बक्षीस मिळाल्यानंतरही मारकवार यांनी गावाच्या विकासासाठी झटण्याचा प्रयत्न सातत्याने केला. गावातील युवकांना रोजगार मिळावा यासाठी रोजगर निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाचा पाहिजे, त्या प्रमाणात सहभाग मिळाला नाही. दुग्ध व्यवसायासाठी शीतगृह असणे आवश्यक असताना तालुक्यात ही व्यवस्था नाही. त्यामुळे दुग्ध व्यवसाय करण्यास प्रोत्साहन मिळाले नाही. राजगड गावात शाश्वत विकास करण्याचा मानस असला तरी प्रोत्साहनाचा अभाव आहे. राज्यात प्रथम आलेले राजगड गाव ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदार संघात असताना मात्र त्या गावाच्या विकासात्मक कार्यात प्रोत्साहनाची थाप पडावी, असे कधीही घडले नाही.२००२-०३ मध्ये राजगडला स्वच्छतेचा प्रथम क्रमांक मिळाल्यापासून पुरस्कारांची मालिका सुरूच आहे. २००६-०७ मध्ये निर्मलग्राम पुरस्कार, २०११ मध्ये पर्यावरणरत्न पुरस्कार, २०१५-१६ मध्ये दीनदयाल उपाध्याय पंचायत सक्षमीकरण पुरस्कार, तसेच २०१६-१७ मध्ये पुनश्च: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामस्वच्छता जिल्हा स्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. सातत्याने पुरस्काराची व गाव विकासाची मालिका जपणाऱ्या ‘राजगड’ला प्रोत्साहनाची गरज आहे.राज्यात आदर्श गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरवे बाजार असो की राळेगणसिध्दी असो. याच गावाच्या तोडीस तोड आदर्श गाव निर्माण करण्याचा आत्मविश्वास चंदू पाटील मारकवार व इतर ग्रामस्थांना आहे.