शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

लाईक, शेअर, फॉरवर्ड जरा जपून, खावी लागू शकते जेलची हवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:32 IST

फेसबुक, व्हॉट्सॲप आदी सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. या आधुनिक साधनांपासून माहिती व ज्ञान घेण्याऐवजी ...

फेसबुक, व्हॉट्सॲप आदी सोशल नेटवर्किंग साईटवर अनेकजण दिवसातला बराच वेळ खर्ची घालतात. या आधुनिक साधनांपासून माहिती व ज्ञान घेण्याऐवजी केवळ उथळ मनोरंजनासाठी वापर करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मेसेज पाठविणे, लाईक करणे, व्हिडिओ शेअर करणे, फोटो अपलोड करणे असे प्रकार सुरू असतात. सोशल नेटवर्किंग साईटवरून कुठलाही विषय कमी वेळात पोहोचू शकतो. मात्र, अनेकदा याचा दुरुपयोग होण्याची शक्यता असते. या माध्यमांवर टाकलेला आक्षेपार्ह मजकूर टाकून दोन गटांत तणाव निर्माण करू शकतो. अनेकजण काहीही न वाचता, समजून घेता आंधळेपणाने शेअर व लाईक करतात. यातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत.

बाॅक्स

अशी घ्या काळजी

फोटो, व्हिडिओ क्लिप व आक्षेपार्ह मजकूर पोस्ट टाकणे, लाईक, शेअर, कॉमेंट, फॉरवर्ड करणे टाळावे. सोशल मीडियाचा वापर करताना कोणताही समाज, जात, धर्म व पंथाचा अपमान होणार नाही. व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी युझर्सनी घ्यावी.

बाॅक्स

अशी आहे शिक्षेची तरतूद

सोशल मीडियावर चुकीचे कृत्य करणाऱ्यांवर भारतीय दंड विधान कलम २९५ (धार्मिक भावना दुखावणे) तसेच माहिती व तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६६ व ६७ नुसार गुन्हा दाखल होतो. कायद्यानुसार त्याला तीन वर्षांची शिक्षा होऊ शकते.

बाॅक्स

फेसबुक, व्हॉट्सॲपचा अतिरेक घातक

फेसबुक, व्हॉट्सॲपचा वापर करताना अतिरेक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. विज्ञानाने दिलेल्या या साधनांचा आयुष्याच्या प्रगतीसाठी व सुसंवाद, विचारांच्या आदान-प्रदानासाठी वापरण्याची शिस्त आत्मसात करण्याचे आवाहन जिल्हा पोलीस सायबर विभागाने केले.

मुलींनो डीपी सांभाळा

सोशल मीडियाचा तरुणवर्ग प्रचंड वापर करत आहे. तंत्रज्ञान वाढत चालले आहे तसे पूर्णत: गुंतत चाललो. सर्वात जास्त गैरवापर फेसबुकचा केला जात आहे. युवकांसोबत पालकांनाही स्वत:मध्ये बदल घडवावा. आपला मुलगा, मुलगी काय करतो त्याकडे पालकांचे लक्ष हवे. मुलींनी तर आपल्या डीपीपासून काळजी घ्यावी.

चंद्रपूर जिल्ह्यात सायबर गुन्हे वाढले

भामट्यांकडून ई-मेल व मोबाईलवर मेसेज पाठवून गंडा घालण्याच्या घटना जिल्ह्यात वाढत आहेत. वस्तू खरेदी-विक्रीच्या ऑनलाइन व्यवहारांची आधी खात्री करावी, असा सल्ला पोलीस प्रशासनाने दिला.

कोट

समाजकंटक सोशल मीडियाचा गैरवापर करतात. त्यामुळे कोणतीही पोस्ट ही शहानिशा करूनच फारवर्ड करावी, अन्यथा आपणही गुन्ह्याच्या कचाट्यात अडकू शकतो. सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी जनतेने पोलिसांना सहकार्य करावे. पोलीस प्रशासनाने जागृतीची व्याप्तीही वाढविली आहे. अनेक सायबर गुन्ह्यांचा भंडाफोड केला.

- कमलेश जयस्वाल, पोलीस निरीक्षक सायबर विभाग, चंद्रपूर