शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

शकीलच्या घरी वाहतेयं दुधाची गंगा

By admin | Updated: August 12, 2016 01:18 IST

घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे.

बेरोजगारीवर मात : शेतकऱ्यांसाठीही एक आदर्श घनश्याम नवघडे नागभीड घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. पण आता तोच त्याचा व्यवसाय झाला आहे. आता एक नाही तर तब्बल ४५ म्हशी, सात गायी, २५ बकऱ्या त्यांच्या घरी असून तो आता नागभीड तालुक्यातील एक प्रमुख दुध उत्पादक म्हणून गणला जात आहे. शेतीला पुरक जोडधंदा करणाऱ्यांसाठी त्याने एक आदर्श निर्माण केला आहे. शकील शौकत शेख असे या दुध उत्पादकाचे नाव असून तो नागभीड येथील रहिवासी आहे. घरी दुधाची गरज म्हणून त्याने एक गाय विकत घेतली. ती गाय दररोज आठ लीटर दूध द्यायची. घरी एवढ्या दुधाची गरज नाही म्हणून तो उर्वरीत दुध विकू लागला. त्यातून घरखर्च निघू लागला. त्याने विचार केला आपण हाच व्यवसाय केला तर? त्याने मनाशी ठाणले. आणि एक एक म्हैस, गाय ता ेविकत घेवू लागला. या सहा वर्षात शकीलने अनेक गायी, म्हशी विकत घेतल्या. शकीलकडे आज ४५ मुर्श, कोचर जातीच्या म्हशी, होस्टन, जर्सी जातीच्या सात गायी आणि अजमेरी, जमनापरी जातीच्या २५ बकऱ्या आहेत. या गायी-म्हशी पासून शकील रोज २७० ते २८० लीटर दुधाचे उत्पादन करतो. उत्पादीत झालेले दुध तो येथील सर्व मोठ्या हॉटेल्सना पुरवितो. दुधात गुणवत्ता असल्याने त्याने उत्पादीत केलेल्या दुधाला ४० ते ५० रुपये लीटर भावही मिळत आहे. या गायी म्हशीच्या देखभालीसाठी त्याने नियमित सात व्यक्ती ठेवल्या आहेत आणि प्रत्येकाला कामही नेमून दिले आहे. साधारण आपल्या भागातील दुध उत्पादक वैरणासाठी तणसाचा वापर करतात. पण शकील तणसाचा वापर फार कमी प्रमाणात करतो. तो कुटार आणि गव्हाडा वापरतो. या व्यवसायातून शकीलने चांगलीच आर्थिक प्रगती साधली आहे. मजूर खाद्य आणि औषधी यांचा खर्च वजा जाता महिन्याकाठी त्याला लाख रुपयाचा फायदा होत आहे. शकीलला आता पशुधनाचा बराच अभ्यास झाला आहे. या पशुधनावर हलके-फुलके आजार उद्भवल्यास तो स्वत:च त्यांच्यावर उपचार करतो. मात्र गंभीर आजार दिसून आल्यास येथील डॉक्टरांकडे घेवून जातो. खरे तर दुध उत्पादनासाठी नागभीड तालुका संपूर्ण जिल्ह्यात अग्रेसर आहे. पण ही ओळख हळूहळू कमी होत आहे. नैसर्गिक पार्श्वभूमी उपलब्ध असूनही केवळ निरुरस्साहामुळे या तालुक्यातील पशुधन दिवसेंदिवस कमी होत आहे. शकीलचा आदर्श समोर ठेवून या तालुक्यातील तरुणांची पशुधनास व्यवसाय म्हणून स्विकारले तर बेरोजगारीवर मात करता येईल.