शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

देवाडा खुर्दमध्ये अनेक वर्षापासून पाण्याची भीषण टंचाई

By admin | Updated: May 2, 2017 00:59 IST

तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईची धग सुरू आहे.

पाणी पुरवठा योजनेला ग्रहण : नागरिक दहा वर्षापासून नळाच्या प्रतीक्षेतपोंभूर्णा : तालुक्यातील देवाडा खुर्द येथे गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईची धग सुरू आहे. यासाठी गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित केली. मात्र आजमितीला आठ वर्षाचा कालावधी लोटूनसुद्धा सदर टाकीमध्ये पाणीच साठविण्यात न आल्याने ही टाकी स्वत:च पाण्यासाठी व्याकुळ झाली असल्याचे भीषण वास्तव येथील नागरिकांना अनुभवायला मिळत आहे.दुसरीकडे मात्र संबंधित विभागाचे अधिकारी या प्रकरणाची चौकशी करण्यास दिरंगाई करीत असून गावकरी व सरपंचांनी दिलेल्या तक्रार अर्जास कचऱ्याची टोपली दाखविली असल्याचा प्रकार सुरू असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येते. गावात दरवर्षी पाणी टंचाई भासत असून प्रशासनाकडून कुठलीच पर्यायी योजना केली जात नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. देवाडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेले रामपूर दीक्षित टोला नं. १ व २ येथील नागरिक गेल्या दहा वर्षापासून नळाच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत.पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द मागील १५ वर्षापासून ७२ हजार लीटर क्षमतेची ग्रामीण पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे. दरवर्षीच्या लोकसंख्या वाढीमुळे नळजोडणी धारकांच्या संख्येतही भर पडत आहे. सदर योजनेच्या पाईप लाईनचे काम अत्यंत सदोष पद्धतीने झाल्याने अनेक ठिकाणी लिकेजमधून पाणी जात असते तर कधी कधी लिकेज दुरुस्त करण्यास दोन ते तीन दिवसाचा कालावधी लागत असल्याने स्थानिक नागरिकांना अल्प व अनियमीत पाणी मिळत असते. या गावातील पाण्याचे स्तोत्र फार खोलवर असल्याने एप्रिल-मे महिन्यातच पाण्याची टंचाई सुरू असते. त्यामुळे अनेक नागरिक उन्हाळ्यामध्ये तलाव व शेतातील विहिरीचे पाणी बैल बंडीने आणून आपली पाणी विषयक समस्या सोडवित असतात. या नेहमीच्या पाणी टंचाईला कंटाळून गावकऱ्यांनी लोकसहभागातून भारत निर्माण पाणी पुरवठा योजनेची निर्मिती केली. यावर देखरेखीसाठी पाणी पुरवठा समितीची स्थापनासुद्धा करण्यात आली आणि एका कंत्राटदाराकडे सदर योजनेचे बांधकाम सोपविण्यात आले. मात्र या कामावर पाणी पुरवठा समिती तसेच ग्रामपंचायत व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याचे कुठलेच नियंत्रण नसल्याने सदर योजनेला आठ वर्षाचा प्रदीर्घ कालावधी लोटून सुद्धा ही योजना अजूनही तहानलेलीच आहे. या ठिकाणी पाण्याच्या भुगर्भाची पातळी अतिशय खोल गेल्याने मार्च-एप्रिल महिन्यामध्येच अनेक विहिरी कोरड्या होत असतात तर हॅन्ड पंपांना फार अल्प पाणी असते. गावात अनेक वर्षापासून ही परिस्थिती भेडसावत आहे. एवढी गंभीर समस्या या ठिकाणी उद्भवत असताना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कुठलीच पर्यायी योजना केली जात नसल्याचे चित्र दिसत आहे.येथील अंधारी नदीच्या पात्रातून ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत नागरिकांना पाणी दिले जाते. परंतु उन्हाची दाहकता प्रचंड वाढत असल्याने अंधारी नदीच्या पात्रातसुद्धा पाच ते दहा दिवस पाणी पुरणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे अंधारी नदीचे पात्रसुद्धा येत्या काही दिवसात कोरडे होणार आहे. त्यामुळे ग्रामीण पाणी पुवठा योजनेच्या टाकीत पाणी येणार नाही. मग पाणी आणायचे कुठून, असा गंभीर प्रश्न स्थानिक नागरिकांसमोर उभा ठाकला आहे. मात्र पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी व अभियंते याबाबत उदासीन असून त्यांचेसुद्धा यावर नियंत्रण नसल्याने गावात पाण्याच्या दोन टाकी असून सुद्धा गावातील नागरिक तहाणलेलेच आहे. कोरड्या असलेल्या भारत पाणी पुरवठा योजनेमध्ये फार मोठे गोडबंगाल झाले असल्याचे स्थानिक नागरिकांकडून बोलल्या जात आहे. संबंधित प्रकरणाची वरिष्ठांमार्फत चौकशी केल्यास फार मोठे घबाड उघडकीस येणार असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित टाकीचे पाणी कुठे मुरत आहे, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आहे. (वार्ताहर)पालकमंत्र्यांनी लक्ष घालावेपोंभूर्णा तालुक्यामध्ये देवाडा खुर्द हे गाव सर्वात मोठे असून सदर क्षेत्र पालकमंत्री मुनगंटीवार यांचे आहे. पोंभूर्णा तालुक्याला महाराष्ट्रात अग्रेसर करू असे पालकमंत्री व त्यांचे कार्यकर्ते नेहमी निवडणुकामध्ये सांगत असतात. मग अनेक वर्षापासून या गावात पाणी टंचाई असल्याने पालकमंत्र्यांनी या ठिकाणी पर्यायी योजना निर्माण करून देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.