शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
2
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
3
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
4
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव
5
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
6
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
7
एक दिवस CM बनवलं तर काय कराल? अमृता फडणवीस म्हणाल्या- "मी देवेंद्रजींना..."
8
१२ वर्षांनी शतांक गजकेसरी योग: ८ राशींना लॉटरी, इच्छापूर्ती; नवीन नोकरी, अकल्पनीय पैसा-लाभ!
9
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
10
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
11
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
12
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
13
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
14
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
15
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
16
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
17
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
18
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
19
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
20
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज

पळसगाव-तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअनेक घरांचे होणार नुकसान

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पळसगाव - तोरगाव या नवनिर्मित राज्यमहामार्गानेमहामार्गात येणारी नागभीड तालुक्यातील सात गावे प्रभावित होणार आहेत. यातील अतिप्रभावित गावांसाठी बायपास मार्ग अतिशय आवश्यक आहे. नाही तर मार्गात येणाºया या गावातील घरे तुटणार आहेत. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील जीवनापूर, उश्राळमेंढा, बागलमेंढा, मिंथूर, पारडी (ठवरे), किरमिटी आणि पान्होळी या गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला आहे.हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील या सात गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असलेली घरे पडणार असल्याची भीती गावकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. गावाच्या बाहेरील रस्ता डांबराचा राहणार असून गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा राहणार आहे. रस्त्याची रूंदी  सात मीटर राहणार असल्याची माहिती आहे. जुना रस्ता पाऊणे चार मीटर रूंदीचा असल्याने गावातील अधिकाधिक घरे तुटण्याची शक्यता आहे.गावरस्ता लक्षात घेऊन उभारली घरेगावकºयांनी अतिशय मेहनतीने आणि पै पैसा जमा करून आपली घरे उभारली आहेत. घर हे त्यांचे स्वप्न आहे. उल्लेखनीय बाब ही की गावकºयांनी ही घरे त्यावेळी गावातील गावरस्ता लक्षात घेऊन उभारली आहेत. येथून कधी राज्य महामार्ग जाईल, अशी कल्पनाही कधी गावकºयांनी केली नव्हती. त्यांना राज्य महामार्गाची कल्पना असती तर कदाचित रस्त्याच्या बाजूने जागा सोडून घराची उभारणी केली असती. गावातील घरांना नुकसान पोचू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकतर बायपास रस्त्याची मागणी रेटून धरावी नाही तर रस्त्याची रूंदी ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गावकºयांची मागणी आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग