शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

पळसगाव-तोरगाव राज्य महामार्गाने सात गावे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 05:00 IST

सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे.

ठळक मुद्देअनेक घरांचे होणार नुकसान

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कनागभीड : पळसगाव - तोरगाव या नवनिर्मित राज्यमहामार्गानेमहामार्गात येणारी नागभीड तालुक्यातील सात गावे प्रभावित होणार आहेत. यातील अतिप्रभावित गावांसाठी बायपास मार्ग अतिशय आवश्यक आहे. नाही तर मार्गात येणाºया या गावातील घरे तुटणार आहेत. सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव येथून या राज्य महामार्गाची सुरूवात होते आणि ब्रम्हपुरी तालुक्यात तोरगावपर्यंत हा राज्य महामार्ग जातो. यानंतर भंडारा जिल्ह्याची सीमा येथून जवळच आहे. ५२ किलोमीटर लांबीच्या या राज्य महामार्गास दोन वर्षापूर्वीच मान्यता मिळाली होती. मागील वर्षीपासून या राज्य महामार्गाचे कामही सुरू झाले आहे. सद्यस्थितीत गावातील काम वगळून या राज्य महामार्गाचे काम सुरू आहे. हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील जीवनापूर, उश्राळमेंढा, बागलमेंढा, मिंथूर, पारडी (ठवरे), किरमिटी आणि पान्होळी या गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला आहे.हा राज्य महामार्ग नागभीड तालुक्यातील या सात गावांच्या ऐन मध्यवर्ती भागातून गेला असल्याने महामार्गाच्या दुतर्फा असलेली घरे पडणार असल्याची भीती गावकºयांच्या मनात निर्माण झाली आहे. गावाच्या बाहेरील रस्ता डांबराचा राहणार असून गावातील रस्ता सिमेंट काँक्रिटचा राहणार आहे. रस्त्याची रूंदी  सात मीटर राहणार असल्याची माहिती आहे. जुना रस्ता पाऊणे चार मीटर रूंदीचा असल्याने गावातील अधिकाधिक घरे तुटण्याची शक्यता आहे.गावरस्ता लक्षात घेऊन उभारली घरेगावकºयांनी अतिशय मेहनतीने आणि पै पैसा जमा करून आपली घरे उभारली आहेत. घर हे त्यांचे स्वप्न आहे. उल्लेखनीय बाब ही की गावकºयांनी ही घरे त्यावेळी गावातील गावरस्ता लक्षात घेऊन उभारली आहेत. येथून कधी राज्य महामार्ग जाईल, अशी कल्पनाही कधी गावकºयांनी केली नव्हती. त्यांना राज्य महामार्गाची कल्पना असती तर कदाचित रस्त्याच्या बाजूने जागा सोडून घराची उभारणी केली असती. गावातील घरांना नुकसान पोचू नये यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन एकतर बायपास रस्त्याची मागणी रेटून धरावी नाही तर रस्त्याची रूंदी ‘जैसे थे’ ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी गावकºयांची मागणी आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग