शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

सात लाखांचा रस्ता सात दिवसात उखडला

By admin | Updated: April 1, 2015 01:19 IST

जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिवती : जिल्हा परिषद विभागाच्या बेबंदशाही कारभारामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिलाची उचल करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तालुक्यातील आसापूर-पेदाआसापूर येथील घाटावर सात लाख रुपये खर्च करून रस्ता खडीकरणाचे काम करण्यात आले. मात्र खडीकरणाचा रस्ता सातच दिवसात उखडला असून जिल्हा परिषद विभाग रस्त्याच्या कामाबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.पेदाआसापूर गावातील नागरिकांना दळणवळण करण्यासाठी रस्ता सुरळीत व्हावा, यासाठी जिल्हा परिषद विभागाकडून अनेक दिवसांच्या मागणीनंतर ६०० मीटर कामासाठी सात लाखाचा निधी मंजूर केला होता. मात्र संबंधीत कंत्राटदाराने आपली पोळी शेकून घेण्यासाठी थातुरमातूर कामे केल्याने अल्पावधीत रस्त्याच्या चिंधड्या उडाल्या आहेत. अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यात समस्यांच गुंता कमी होण्यापेक्षा दिवसेंदिवस वाढतच आहे. रोज एक ना एक नव्या समस्येत भर पडत आहे. तालुक्यातील गावे तालुक्याशी जोडली जावी यासाठी कुठे सार्वजनिक विभागाची कामे तर कुठे जिल्हा परिषद विभागाची कामे सुरू आहेत. मात्र त्या कामावर नियंत्रण ठेवून काम चंगले करून घेण्याची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदारासोबत आपले चांगभलं करून रस्त्याची वाट लावली जात आहे. आधीच या परिसरात विकासात्मक कामे लवकर मंजूर होत नाही. अनेक दिवसांच्या मागणीनंतर काम कसे तरी मंजूर होतात. मात्र संबंधित विभागाच्या दुर्लक्षितपणामुळे निकृष्ट दर्जाचे काम करून बिले काढून कंत्राटदार मोकळे होतात. हा सगळा प्रकार त्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांना माहीत असतो, तरी पण कामाची बिले काढतात कसे, कामाची गुणवत्ता तपासली का जात नाही, तपासली जात असेल तर उखडलेला रस्ता परत दुरुस्त करून घेणार का, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे. (तालुका प्रतिनिधी)