शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

सात धरणे ‘ओव्हरफ्लो’

By admin | Updated: September 27, 2016 00:44 IST

मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून...

जनजीवन विस्कळीत : परतीचा पाऊस थांबता थांबेना चंद्रपूर : मागील सहा दिवसांपासून जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून काही नद्यांना पूर आला आहे. याशिवाय शेतकऱ्यांचे आधार असलेल्या व उन्हाळ्यात ड्राय झालेल्या जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प आता ओव्हरफ्लो झाले आहेत. इरई धरणाचे सातही दरवाजे रविवारी उघडण्यात आले असून घोडाझरी, डोंगरगाव हे दोन सिंचन प्रकल्प शंभरी गाठण्यावर आले आहेत. गेल्या बुधवारपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू असून या पावसाने अद्यापही उसंत घेतलेली नाही. थांबून-थांबून पावसाच्या सरी बरसत असल्याने आता बस्... पाऊस नको, असे अनेक नागरिक बोलून दाखवित आहेत. या पावसाने भारी धान पिकाला फायदा होत असला तरी इतर पिकांसाठी धोक्याची घंटा आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक पावसामुळे चिंतेत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस लांबण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांची धडधड वाढली आहे. पाटबंधारे विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार जिल्ह्यातील सात धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. तर गेल्या २४ तासात जिल्ह्यात २६.२८ च्या सरासरीने ३९४.३ मिमी पावसाची नोंद झाली. तर १ जूनपासून आजपर्यंत १३३३.४६ च्या सरासरीने २०००१.९ मिमी पाऊस झाला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)पावसाने घर कोसळलेबाखर्डी : सततच्या पावसाने घर पडल्याची घटना कोरपना तालुक्यातील निमणी येथे घडली. यात भाऊराव ढावस यांचे मातीचे घर कोसळल्याने मोठे नुकसान झाले आहे. या घटनेत शेजारचे बोबडे व ढवस यांचेही मोठे नुकसान झाले असून तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. ब्रह्मपुरी तहसील कार्यालयावर कोसळली वीज ब्रह्मपुरी : सोमवारी दुपारी मेघगर्जनेसह झालेल्या वादळी पावसात येथील तहसील कार्यालयावर वीज कोसळल्याची घटना घडली. यात संगणक व इतर साहित्य जळाल्याने चार ते पाच लाखांचे नुकसान झाले आहे. विजेच्या कडकडाटाने तहसील कार्यालय परिसर हादरून गेला. कार्यालयाजवळील टॉवरवर वीज कोसळल्याने सुरू असलेले तहसील कार्यालयाचे ११ संगणक, इंटरनेट मोडम, प्रिंटर्स, वायरिंग व इतर साहित्य जळून खाक झाले. यात चार ते पाच लाखांचे नुकसान झाल्याची माहिती विद्याधर चव्हाण यांनी दिली आहे.