शहरं
Join us  
Trending Stories
1
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
2
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
3
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
4
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
5
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
6
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
7
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
8
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
9
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
10
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
11
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
12
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल
13
"अजित पवार यांनी लाडकी बहीण योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या’’, सुनिल तटकरेंचा दावा   
14
मुंबईत शिवसेना-मनसेची ताकद जास्त, राज ठाकरेंचा दावा; CM फडणवीस म्हणाले...
15
War 2 Review: ॲक्शनच्या नादात कथेवर फेरलं पाणी, कसा आहे हृतिक रोशन-ज्यु. एनटीआरचा 'वॉर २'?
16
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
17
अर्जुन तेंडुलकर संदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
18
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
19
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
20
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार

ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 22:41 IST

शासकीय व अन्य कोणत्याही खासगी यंत्रणेमध्ये ग्राहकांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची सोडवणूक करण्याकडे प्राथमिकतेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले.

ठळक मुद्देराजेंद्र मिस्कीन : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शासकीय व अन्य कोणत्याही खासगी यंत्रणेमध्ये ग्राहकांचे हित सर्वोच्च असले पाहिजे. नागरिकांच्या हक्काचे जतन करण्यासाठी झटणाऱ्या ग्राहक संरक्षण परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त केलेल्या आक्षेपांची सोडवणूक करण्याकडे प्राथमिकतेने लक्ष द्यावे, असे प्रतिपादन जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मंगळवारी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीत बोलत होते. यावेळी अशासकीय सदस्य प्रिती बैतुले, सदाशिव सुकारे, वामन नामपल्लीवार, दत्तात्रय गुंडावार, राजेश कावलकर, समीर बारई, मनिष व्यवहारे, जी. आर. बैस, कल्पना बगुलकर, उमीदया धोटे, संगीता लोखंडे, जगदिश रायगठ्ठा, डॉ. विनोद गोरंटीवार व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.या बैठकीमध्ये उपस्थित सदस्यांनी वेगवेगळ्या शासकीय यंत्रणांकडून योग्य प्रमाणात सुविधा मिळत नसल्याच्या तक्रारी नोंदविल्या. काही तक्रारीवर संबंधित विभागाने ताकीद देणारे पत्र काढावे, अशी सुचनाही केली. तहसील कार्यालयामध्ये स्टॅम्पपेपर मिळत नाही, पैशाची अतिरिक्त मागणी केली जाते. त्यामुळे वेंडरची सखोल चौकशी करावी, स्टॅम्पपेपर वितरण करणाºयांनी ग्राहकांना पावती दिली पाहिजे, अशा सूचना करण्यात आल्या. रासायनिक पदार्थ, फळ, दुधाची भेसळ व दुधाची साठवणूक याच्यासाठी भरारी पथक नेमावे.मागील काही महिन्यात केलेल्या कारवाईचा अहवाल बैठकीला सादर करावी, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यातील बससेवेमध्ये वेळा पाळल्या जात नाही. गर्दीच्यावेळी प्रवाशांना सुविधा देण्यासाठी अतिरिक्त बस सोडावी, अनेक ठिकाणी थांबा असूनही वाहन पुढे नेल्या जाते. अनेक रस्त्यांवर बसेसची कमरता आहे. बसेस लागणाऱ्या रस्त्यांवर अधिक फेऱ्या कराव्यात, वरिष्ठ अशी सूचना एसटी महामंडळाला करण्यात आली. या सुचनांची दखल घेण्यात आल्याची माहिती मिस्कीन यांनी दिली.सदस्यांनी समस्यांकडे वेधले लक्षरस्त्याचे काम सुरू असताना दुचाकी वाहने चालू शकतील, असे नियोजन व्हावे. बंगाली कॅम्प व अन्य शहरातील अतिक्रमण, विद्युत मंडळाकडून जोडणी देताना आकारला जाणारा अतिरिक्त शुल्क, पीक विमा योजनेतील रक्कम, बीएसएनल कंपनीकडून ब्रॉडबॅन्ड सुरू न होणे, खासगी वाहतूक, आदी समस्यांकडे अशासकीय सदस्यांनी या बैठकीत लक्ष वेधले.