शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

तेलंगण सीमेलगत कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: January 2, 2017 00:57 IST

सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत

नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका : परजिल्ह्यातील दलालांचा गावागावांत शिरकाव नांदाफाटा : सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात नोटाबंदीमुळे कापसाची ४००० ते ४२०० रुपयात दलालांकडून खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. बँकामार्फत अधिक रक्कम मिळत नसल्याने याचा फायदा घेत गावांमध्ये शेतकऱ्यांशी दलालांमार्फत नगदी व्यवहार केला जात आहे. यात ५२०० ते ५३०० रुपयांपर्यंत विकला जाणारा कापूस ४ हजार ते ४२०० रुपयात गरजेपोटी शेतकरी देत आहे. वर्धा, हिंगणघाट,यवतमाळ या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील व्यापाऱ्यांचे दलालही या खरेदीत गुंतले आहे. गावात पहाटे येऊन शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार नाही. चेकद्वारे पैसे दिल्यास अधिक वेळ लागेल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांच्या घरी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधींना पाठवून शेतकऱ्यांचे मन वळवून कापूस विक्री करण्यास भाग पाडत असल्याचेही समजते. यात परिसरातील काही जण आपली पोळी शेकताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरपना, जिवती, राजुरा या तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऐन पिके हाती आल्यानंतर नोटाबंदी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे. जिल्हा सहकारी बँकामार्फत शेतकऱ्यांना अधिक पैसे काढता येत नाही तर दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा सहकारी बँकेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कौटुंबिक गरज भागविताना वणवण करावी लागत आहे. अनेकांकडे मुलींचे लग्न जुळले असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशातच बँकांकडून पैसे मिळत नसल्याने नाईलाजास्तव दलालांमार्फत कापसाची विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटल मागे १ हजार ते १५०० रुपयांची लूट होत असून मोठा फटका बसत आहे. इतर कापूस खरेदी केंद्रावर काही व्यापारी चेकद्वारे पैसे देत आहे. मात्र बँकामार्फत पैसे निघत नसल्यानेही शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. तेव्हा अशा दलालांवर कारवाई करण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) कापूस संकलन केंद्राचा अभाव ४कापूस संकलन केंद्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही शेतकरी मुकटबन, वणी, हिंगणघाट येथे कापसाची विक्री करतात. तर वाहतुकीचा खर्च अधिक येत असल्याने अनेक शेतकरी गावातच व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत करतात. मात्र भल्या पहाटे येऊन आज भाव एवढाच असल्याचे सांगून दलाल कापसांची खरेदी तेलंगणा सीमेलगतच्या गावातून करीत आहे. नगदी पैसा येतोय कुठून ? बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा दिली असताना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पैसे असल्याचे दिसून येत आहे. हा पैसा येतोय कुठून, असा सवालही आता नागरिक करीत आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडे नवीन नोटांचा भरणा अधिक आहे. नागरिक चलनटंचाईमुळे गेल्या ५० दिवसांपासून भरडले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना कोणती बँक पैसे विड्राल करून देते, याचाही शोध घेणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.