शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगण सीमेलगत कापसाची कवडीमोल भावात विक्री

By admin | Updated: January 2, 2017 00:57 IST

सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत

नोटाबंदीचा शेतकऱ्यांना फटका : परजिल्ह्यातील दलालांचा गावागावांत शिरकाव नांदाफाटा : सध्या तेलंगणा सीमेलगत असलेल्या कोरपना तालुक्यातील काही गावामध्ये कापूस खरेदी दलालामार्फत मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यात नोटाबंदीमुळे कापसाची ४००० ते ४२०० रुपयात दलालांकडून खरेदी सुरू असल्याने शेतकऱ्यांची लूट होत आहे. बँकामार्फत अधिक रक्कम मिळत नसल्याने याचा फायदा घेत गावांमध्ये शेतकऱ्यांशी दलालांमार्फत नगदी व्यवहार केला जात आहे. यात ५२०० ते ५३०० रुपयांपर्यंत विकला जाणारा कापूस ४ हजार ते ४२०० रुपयात गरजेपोटी शेतकरी देत आहे. वर्धा, हिंगणघाट,यवतमाळ या जिल्ह्यातील व्यापाऱ्यांसह तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथील व्यापाऱ्यांचे दलालही या खरेदीत गुंतले आहे. गावात पहाटे येऊन शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळणार नाही. चेकद्वारे पैसे दिल्यास अधिक वेळ लागेल, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांची गरज ओळखून त्यांच्या घरी व्यापाऱ्यांचे प्रतिनिधींना पाठवून शेतकऱ्यांचे मन वळवून कापूस विक्री करण्यास भाग पाडत असल्याचेही समजते. यात परिसरातील काही जण आपली पोळी शेकताना दिसत आहे. जिल्ह्यात कोरपना, जिवती, राजुरा या तालुक्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते. ऐन पिके हाती आल्यानंतर नोटाबंदी झाल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर विरजण पडले आहे. जिल्हा सहकारी बँकामार्फत शेतकऱ्यांना अधिक पैसे काढता येत नाही तर दुसरीकडे बहुतांश शेतकऱ्यांचे खाते हे जिल्हा सहकारी बँकेत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कौटुंबिक गरज भागविताना वणवण करावी लागत आहे. अनेकांकडे मुलींचे लग्न जुळले असून शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. अशातच बँकांकडून पैसे मिळत नसल्याने नाईलाजास्तव दलालांमार्फत कापसाची विक्री करावी लागत आहे. यात शेतकऱ्यांची क्विंटल मागे १ हजार ते १५०० रुपयांची लूट होत असून मोठा फटका बसत आहे. इतर कापूस खरेदी केंद्रावर काही व्यापारी चेकद्वारे पैसे देत आहे. मात्र बँकामार्फत पैसे निघत नसल्यानेही शेतकऱ्यांची पंचायत झाली आहे. तेव्हा अशा दलालांवर कारवाई करण्याची गरज नागरिकांद्वारे व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर) कापूस संकलन केंद्राचा अभाव ४कापूस संकलन केंद्र यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे काही शेतकरी मुकटबन, वणी, हिंगणघाट येथे कापसाची विक्री करतात. तर वाहतुकीचा खर्च अधिक येत असल्याने अनेक शेतकरी गावातच व्यापाऱ्यांना कापूस देणे पसंत करतात. मात्र भल्या पहाटे येऊन आज भाव एवढाच असल्याचे सांगून दलाल कापसांची खरेदी तेलंगणा सीमेलगतच्या गावातून करीत आहे. नगदी पैसा येतोय कुठून ? बँकांमधून पैसे काढण्याची मर्यादा दिली असताना कापूस खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पैसे असल्याचे दिसून येत आहे. हा पैसा येतोय कुठून, असा सवालही आता नागरिक करीत आहे. विशेष म्हणजे, व्यापाऱ्यांकडे नवीन नोटांचा भरणा अधिक आहे. नागरिक चलनटंचाईमुळे गेल्या ५० दिवसांपासून भरडले जात असताना एवढ्या मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांना कोणती बँक पैसे विड्राल करून देते, याचाही शोध घेणे यानिमित्ताने गरजेचे झाले आहे.