शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
2
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
3
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
4
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
5
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
6
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
7
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
8
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
9
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
10
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
11
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
12
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
13
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
14
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
15
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
16
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
17
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
18
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
19
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
20
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत

सरस महोत्सवात सेल्फी विथ अमिताभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 22:23 IST

स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.

ठळक मुद्देस्वच्छ भारत मिशन : जनजागृतीचा अभिनव उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्मार्ट फोनच्या वापरामुळे गेल्या तीन वर्षात सेल्फीची नवीन पद्धत जनमानसात रुढ झाली आहे. चांदा कल्ब ग्राऊंडवर सुरू असलेल्या सरस महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता सेल्फी विथ अमिताभ बच्चन हा सेल्फी पॉर्इंट महोत्सवाचे आकर्षण ठरला आहे.खेड्यापासून शहरापर्यंत आज सर्वच क्षेत्रातील मंडळी स्मार्ट फोनचा वापर करतात. यामुळे सेल्फीची क्रेझ दिवसागनिक वाढत चालली आहे. सेल्फी पॉर्इंटचा जहिरात क्षेत्रात वापर केला जात आहे. याच प्रकारे चंद्रपूरच्या चांदा कल्ब ग्राऊंडमध्ये ११ जानेवारी ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत महिला बचत गटांच्या उत्पादित मालाच्या विक्रीकरिता सरस महोत्सवाचे आयोजन केलेले आहे. या महोत्सवास दररोज जिल्ह्यातील हजारो नागरिक भेट देत असून महोत्सवात येणारा प्रत्येक व्यक्ती स्वच्छ भारत मिशनच्या जनजागृतीकरिता उभारलेल्या सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पाईटला भेट देऊन अभिनयाचा बादशहा अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या प्रतिकृतीसोबत सेल्फी फोटो काढण्याचा मनमुराद आंनद घेत आहे. महोत्सवात येणारे छोट्यापासून तर मोठे मंडळीसुध्दा या सेल्फी पॉर्इंटचा आनंद घेत आहे. सेल्फी पॉर्इंट स्वच्छ भारत मिशनच्या व्यापक जनजागृतीकरिता उभारला असून याद्वारा महोत्सावात येणाऱ्या ग्रामस्थांमध्ये शाश्वत स्वच्छतेचा संदेश देण्याचे काम केले जात आहे.सीईओंची संकल्पनाया महोत्सवात स्वच्छ भारत मिशनच्या प्रचार प्रसिध्दीचा अनोखा व लोकांना आकर्षण ठरेल, असा अभिनव उपक्रम सेल्फी पॉर्इंट असावा, ही संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सूचवली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) ओमप्रकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतेच्या जनजागृतीचा मजेदार सेल्फी पॉर्इंट तयार करण्यात आला आहे. सरस महोत्सवात येणारा प्रत्येकजण सेल्फीविथ अमिताभ बच्चन या सेल्फी पॉर्इंटचा मनमुराद आनंद घेत आहे.स्वच्छ भारत मिशन ग्रामीणच्या जनजागृतीसाठी सेल्फी पॉर्इंट सरस महोत्सवात उभारला असून महिला बचत गटांच्या वस्तु खरेदीसह ‘सेल्फीविथ अमिताभ बच्चन’ आस्वाद घेत असल्यामुळे शाश्वत स्वच्छतेचा संदेश लोकांपर्यंत पोहचण्यास या सेल्फी पॉर्इंटची मदत झाली आहे. महोत्सवाच आकर्षण सेल्फी पॉईट ठरत आहे.- जितेंद्र पापळकर,मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद, चंद्रपूर.