शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

रेशीमगाठी व्यवसायातून महिला झाल्या आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:59 IST

‘रक्षाबंधन’ अर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आपुलकी व पे्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण. या सणाला पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प आदिवासी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला

ठळक मुद्देआदिवासी बचत गटाचा उपक्रम : वनमंत्र्यांचे योगदान, बांबुराखीला मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबल्लारपूर : ‘रक्षाबंधन’ अर्थात राखी भाऊ-बहिणीच्या जिव्हाळ्याचा सण. औक्षण करून बहीण भावाच्या हातावर राखी बांधते. आपुलकी व पे्रेमाच्या धाग्यातून रक्षणाची जबाबदारी मागते. हळव्या मनातील साद, प्रेमाचा ओलावा निर्माण करणारा राखी सण. या सणाला पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प आदिवासी महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. बांबूपासून तयार केलेल्या राखीला महिलांनी पसंती दिली. यामुळे ‘रेशीमगाठी’ व्यवसायातून महिलांनी आत्मनिर्भरतेचा मार्ग शोधला आहे.महाराष्टÑ बांबू विकास मंडळ, बांबु संशोधन व प्रशिक्षण केंद्र चिचपल्ली व महिला आर्थिक विकास महामंडळ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यामाने आदिवासी महिला बचत गटांना आत्मनिर्भर करण्याचा संकल्प केला. यासाठी राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मोठे योगदान दिले. त्यांच्याच कल्पकतेतून ‘रेशीमगाठी’ व्यवसायासाठी महिला पुढे आल्या. याचा प्रत्यय शुक्रवारी येथील प्रशासकीस भवनाच्या प्रवेशव्दारासमोर लावण्यात आलेल्या राखी स्टॉलवरून दिसून आला. बांबुपासून तयार केलेल्या पर्यावरणपुरक राख्या आकर्षक, कलात्मक व अप्रतिम असल्याने महिलांच्या पसंतीला चांगल्याच उतरल्या आहे.राखी सण एक दिवसावर येऊन ठेपला आहे. ‘रेशीमगाठी’ भाऊरायाच्या हातावर बांधून दीपज्योतीने औक्षण करण्यासाठी बहीण आतूर झाली आहे. अशातच पोंभूर्णा येथील रोहणी नैताम व हर्षा कामडवार या बचत गटांच्या महिलांनी येथील तहसील कार्यालय परिसरात स्टॉल लावला. उपविभागीय अधिकारी क्रांती डांबे व तहसीलदार विकास अहीर यांनी प्रोत्साहन दिले. शेकडो महिला बचत गट चिचपल्ली येथील बांबु संशोधन प्रशिक्षण केंद्रात बांबु कलेचे प्रशिक्षण घेत आहेत. विविध वस्तु साकारत आहेत.राज्याचे अर्थ, नियोजन व वनमंत्री सुधीर मुगनंटीवार यांच्या प्रयत्नामुळे पोंभुर्णा येथील प्रशिक्षण केंद्रात बांबुपासुन राख्या तयार केल्या. राखी विक्रीचे पहिलेच वर्ष आहे. बांबुपासून विविध वस्तू तयार केले जात आहेत. कुटुंबाला हातभार लावण्यासाठी व आत्मोन्नती साधण्यासाठी रोजगाराचे दालन मिळल्याचा आनंद आहे.- रोहिणी नैताम,राखी विक्रेती,आदिवासी महिला बचत गट पोंभूर्णा