शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

टी-१२ वाघिणीसह सेल्फी पार्इंट सेवेत

By admin | Updated: July 14, 2017 00:16 IST

वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे.

सुधीर मुनगंटीवार : वाघ हे पराक्रमाचे प्रतीकलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वाघ हे पराक्रमाचे प्रतीक आहे. ताडोबाच्या रुपाने हा जीवंत पराक्रम आमच्यासोबत आहे. त्यामुळे ताडोबाला येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला येथील वाघ व उपलब्ध जीवसृष्टीतील अन्य प्राण्यांची ओळख, माहिती आणि महत्व पटवून देण्यासाठी त्यांच्या प्रतिकृती लवकरच उभारल्या जाईल. लोकप्रिय टी-१२ वाघीण व छाव्यांची प्रतिकृती त्यांची सुरुवात असल्याची माहिती राज्याचे वित्त, नियोजन, वनेमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. आज गुरुवारी सायंकाळी मोहुर्ली येथील ताडोबा प्रवेशव्दारावर त्यांनी ताडोबातील लोकप्रिय टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांच्या प्रतिकृतीचे वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, वनकर्मचारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत अनावरण केले.ताडोबाची ओळख जागतिकस्तरावर होत आहे. त्यामुळे मोठया प्रमाणात पर्यटक पराक्रमाचे प्रतिक असणाऱ्या वाघाला बघायला ताडोबामध्ये येत आहेत. अशा पर्यटकांना वाघासोबतच अन्य प्राण्यांचीही माहिती या ठिकाणी उपलब्ध करावी, असा आपला मानस आहे. त्यादृष्टीने टी-१२ वाघीण व तिच्या छाव्यांची प्रतिकृती आज लोकार्पित केली. ही सुरुवात आहे. ताडोबा जंगल जैवविविध सृष्टीने नटले असल्यामुळे अन्य प्राण्यांची प्रतिकृतीदेखील उभारण्यात यावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.यावेळी उपस्थित वन भागातील गावकऱ्यांशी ना. मुनगंटीवार यांनी संवाद साधला. तसेच या भागात आगीच्या भक्षस्थानी सापडलेल्या गावातील लोकांना वनविभागातर्फे सानुग्रह निधीचे वाटपही त्यांनी केले. याशिवाय वाघाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेले मंगलदास चौधरी यांच्या पत्नीला सानुग्रह निधी म्हणून एक लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दिला. यावेळी त्यांनी ताडोबा भागातील उर्वरित तीन गावांचे पुनर्वसन करताना सर्व शासकीय योजनांचा माणुसकीच्या दृष्टीने लाभ देण्याचे आवाहन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना केले. यावेळी मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, उपवनसंरक्षक किशोर मानकर यांनीही संबोधित केले. कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे, ताडोबा-अंधारी प्रकल्पाचे क्षेत्र संचालक तथा मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, जि.प.सभापती ब्रिजभुषण पाझारे, संतोष तंगडपल्लीवार, उपवनसरंक्षक किशोर मानकर, उपसंचालक जी.पी.नरवणे आणि नगरसेवक रामपाल सिंग उपस्थित होते.बांबूवर आधारित उद्योगांना चालनागेल्या वर्षी ‘चला माझ्या ताडोबाला’ या अभियानातंर्गत जिल्हयातील गरीब शाळकरी मुलांना ताडोबाची भेट घडवून आणली होती. सहा हजार ४६६ विद्यार्थ्यांना याचा लाभ घेता आला. यापुढेही योजना सुरु ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. जंगलात व जंगल परिसरात राहणाऱ्या प्रत्येकाच्या हाताला मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध व्हावा याकरिता अगरबत्ती उद्योग मोठया प्रमाणात सुरु करण्यासाठी आपण प्रयत्नात असल्याचे त्यांनी सांगितले. अगरबत्ती उद्योगाला बांबूपासून काडया उपलब्ध व्हाव्यात, यासाठी त्याच प्रतिच्या बांबूची लागवड करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्हयात बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्र सुरु करण्यात आले असून बांबूपासून विविध वस्तुंचे निर्माण या ठिकाणी होणार आहे. यामध्ये मोठया प्रमाणात या परिसरातील युवकांना प्रशिक्षित केले जाणार आहे. रेल्वे विभागात आता मोठया प्रमाणात बांबू प्रशिक्षण व संशोधन केंद्रातील फर्निचर ठेवण्याबाबत आपली रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्याशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.