शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
2
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
3
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
4
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर सुविधा, कडेकोड सुरक्षा; प्रशासन सज्ज
5
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
6
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
7
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
8
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
9
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
10
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
11
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
12
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
13
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
14
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
15
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
16
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
17
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
18
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
19
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
20
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड

By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST

आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.

चंद्रपूर : आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. येत्या डिसेंबर-२०१५ अखेर यंदा निवड झालेल्या २१८ गावांमध्ये काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिलहाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी जलयुक्त हे अभियान आहे. संपूर्ण राज्यामध्ये ते राबविले जात असून चंद्रपूर जिल्ह्यातील २१८ गावांची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. त्यापैकी ६६ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे.गावांची निवड करताना टंचाईग्रस्तता, आणेवारीतील घट आणि नागरिकांची मागणी या तीन बाबी लक्षात घेतल्याचे सांगून ते म्हणाले, ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवायची असून आगामी पाच वर्षांचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी निधीचीही तरतुद झाली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक आमदारांकडून ५० लाख रूपयांचा निधी या कामी दिला जाणार असून त्यातून तीन ते चार कोटी रूपये मिळणार आहेत. या योजनेमध्ये सरकारच्या आठ यंत्रणा सहभागी असून त्यात जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना, सामाजिक वनिकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. मामा तलाव, सिमेंट फ्लग बंधारे आणि शेततळ्यांच्या निर्मीतीचेही उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने डोळयापुढे ठेवले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत एक हजार शेततळयांची निर्मीती होणार असून ५५४ माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. १३८ सिमेंट फ्लग बंधाऱ्यांचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने आखले होते. मात्र ९८ बंधारे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याने या कामाचे नियोजन झाले आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व जीवती या पाच तालुक्यांखेरिज अन्य १० तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली आहे. यात मूल तालुका आघाडीवर आहे. तेथील १९ गावांमध्ये ३२ पैकी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ पोंभुर्णा तालुक्याचा क्रमांक आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. अदमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)