शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

जलयुक्त शिवार परिसरासाठी २१८ गावांची निवड

By admin | Updated: March 6, 2015 01:12 IST

आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे.

चंद्रपूर : आगामी पाच वर्षात जिल्ह्यातील संपूर्ण गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियान योजना पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. येत्या डिसेंबर-२०१५ अखेर यंदा निवड झालेल्या २१८ गावांमध्ये काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती जिलहाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यात सुरू असलेल्या जलयुक्त शिवार अभियानासंदर्भात माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी जलयुक्त हे अभियान आहे. संपूर्ण राज्यामध्ये ते राबविले जात असून चंद्रपूर जिल्ह्यातील २१८ गावांची निवड पहिल्या टप्प्यात झाली आहे. त्यापैकी ६६ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे.गावांची निवड करताना टंचाईग्रस्तता, आणेवारीतील घट आणि नागरिकांची मागणी या तीन बाबी लक्षात घेतल्याचे सांगून ते म्हणाले, ही योजना संपूर्ण जिल्ह्यात राबवायची असून आगामी पाच वर्षांचे उद्दीष्ट ठेवले आहे. त्यासाठी निधीचीही तरतुद झाली आहे. या व्यतिरिक्त प्रत्येक आमदारांकडून ५० लाख रूपयांचा निधी या कामी दिला जाणार असून त्यातून तीन ते चार कोटी रूपये मिळणार आहेत. या योजनेमध्ये सरकारच्या आठ यंत्रणा सहभागी असून त्यात जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना, सामाजिक वनिकरण आदींचा प्रामुख्याने समावेश आहे. मामा तलाव, सिमेंट फ्लग बंधारे आणि शेततळ्यांच्या निर्मीतीचेही उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने डोळयापुढे ठेवले आहे. येत्या मार्च अखेरपर्यंत एक हजार शेततळयांची निर्मीती होणार असून ५५४ माजी मालगुजारी तलावांच्या दुरूस्तीचा आराखडाही तयार करण्यात आला आहे. १३८ सिमेंट फ्लग बंधाऱ्यांचे उद्दीष्ट जिल्हा प्रशासनाने आखले होते. मात्र ९८ बंधारे तांत्रिकदृष्ट्या शक्य असल्याने या कामाचे नियोजन झाले आहे. चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, कोरपना व जीवती या पाच तालुक्यांखेरिज अन्य १० तालुक्यांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची सुरूवात झाली आहे. यात मूल तालुका आघाडीवर आहे. तेथील १९ गावांमध्ये ३२ पैकी सर्व कामे पूर्ण झाली आहेत. त्यापाठोपाठ पोंभुर्णा तालुक्याचा क्रमांक आहे. पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील, उपविभागीय अधिकारी संजय दैने, जिल्हा कृषी अधिक्षक डॉ. अदमाने आदी प्रामुख्याने उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)