शहरं
Join us  
Trending Stories
1
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
2
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
3
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
4
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
5
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
6
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
7
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
8
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
9
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
10
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
11
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
12
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
13
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
14
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
15
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
16
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
17
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
18
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
19
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
20
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीनुसार कापूस बियाणे निवडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:53 IST

मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देखरीपाची तयारी : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, माती परीक्षणाचे निष्कर्ष समजून घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्यायचे त्यामध्ये नत्र आणि स्फूरदचे प्रमाण कसे आहे, हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकºयांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.कापूस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्याची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.खतांचे प्रमाण योग्य ठेवावेकापूस पिकाला रासायनिक खते स्फूरद व पालाश खताची अर्धी मात्रा उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची अर्धा मात्रा दिल्यास पीक चांगले वाढते. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकºयांकडून माहिती द्यावी.लागवडीप्रसंगी नत्रयुक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रण करणे आवश्यककोरडवाहू वाण लागवडीपूर्वी शेतातील तणांचे निरीक्षण करावे, रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन सुरुवातीच्या काळातच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.कोरडवाहूचे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून असतात. पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस कापूस पिकाच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.उगवणीपूर्वी वापरण्यासाठी तणनाशक अहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड प्रामुख्याने कोरडवाहू लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पन्न व पिकांची कमी वाढ या दोन समस्येने ग्रस्त असते.कोरडवाहू लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाणाची नवीन जात विकसीत केली पाहिजे. कोरडवाहू कापासापासून उत्पादन मिळविण्यासाठी शेतकºयांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कमी पावसाता येऊ शकेल अशाच वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसाचा असावा, जेणेकरुन चांगला पाऊस राहिल्यास त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्चता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.

टॅग्स :cottonकापूस