शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

जमिनीनुसार कापूस बियाणे निवडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:53 IST

मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देखरीपाची तयारी : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, माती परीक्षणाचे निष्कर्ष समजून घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्यायचे त्यामध्ये नत्र आणि स्फूरदचे प्रमाण कसे आहे, हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकºयांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.कापूस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्याची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.खतांचे प्रमाण योग्य ठेवावेकापूस पिकाला रासायनिक खते स्फूरद व पालाश खताची अर्धी मात्रा उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची अर्धा मात्रा दिल्यास पीक चांगले वाढते. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकºयांकडून माहिती द्यावी.लागवडीप्रसंगी नत्रयुक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रण करणे आवश्यककोरडवाहू वाण लागवडीपूर्वी शेतातील तणांचे निरीक्षण करावे, रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन सुरुवातीच्या काळातच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.कोरडवाहूचे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून असतात. पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस कापूस पिकाच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.उगवणीपूर्वी वापरण्यासाठी तणनाशक अहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड प्रामुख्याने कोरडवाहू लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पन्न व पिकांची कमी वाढ या दोन समस्येने ग्रस्त असते.कोरडवाहू लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाणाची नवीन जात विकसीत केली पाहिजे. कोरडवाहू कापासापासून उत्पादन मिळविण्यासाठी शेतकºयांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कमी पावसाता येऊ शकेल अशाच वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसाचा असावा, जेणेकरुन चांगला पाऊस राहिल्यास त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्चता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.

टॅग्स :cottonकापूस