शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

जमिनीनुसार कापूस बियाणे निवडावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:53 IST

मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

ठळक मुद्देखरीपाची तयारी : कृषी विभागाचा शेतकऱ्यांना सल्ला, माती परीक्षणाचे निष्कर्ष समजून घेणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मागील काही वर्षांपासून कापूस लागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. त्या तुलनेमध्ये पिकांची उत्पादकता समाधानकारक नाही. बहुतांश शेतकरी जमिनीचा पोत लक्षात घेऊन पिकांची निवड करीत नाहीत. परिणामी नुकसानीला सामोरे जावे लागते. यावर पर्याय म्हणून शेतकऱ्यांनी जमिनीला अनुकूल असेल तेच बियाणे निवडावे, असे कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.कोणतेही पीक घेण्यासाठी माती परिक्षणाचे निष्कर्ष महत्त्वाचे आहेत. ज्या जमिनीवर पीक घ्यायचे त्यामध्ये नत्र आणि स्फूरदचे प्रमाण कसे आहे, हे तपासले पाहिजे. जमिनीतील सेंद्रीय कर्बाचे प्रमाण समजून घेण्यासाठी शेतकºयांनी तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.कापूस पिकाची मुळे जमिनीत खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील अन्नद्रव्ये जास्त प्रमाणात शोषली जातात. कापूस लागवड मध्यम खोल व उथळ जमिनीत करावी जमिनीच्या प्रकारानुसार कापूस बियाण्याची निवड केल्यास उत्पन्नात वाढ होईल, असे मत कृषितज्ज्ञांनी व्यक्त केले.खतांचे प्रमाण योग्य ठेवावेकापूस पिकाला रासायनिक खते स्फूरद व पालाश खताची अर्धी मात्रा उगवण झाल्यानंतर नत्रयुक्त खतांची अर्धा मात्रा दिल्यास पीक चांगले वाढते. रोप उगवण झाल्यानंतर नत्राची मात्रा देताना अनुभवी शेतकºयांकडून माहिती द्यावी.लागवडीप्रसंगी नत्रयुक्त खते दिल्याने रोप उगवून येईपर्यंत त्यातील बरचेसे नत्र वाया जाते. पिकाला फारसा उपयोग होत नाही. स्फुरद व पालाश व नत्रयुक्त खतांची गरज असली तरी प्रमाणापेक्षा अधिक नको.उगवणीपूर्वीचे तणनियंत्रण करणे आवश्यककोरडवाहू वाण लागवडीपूर्वी शेतातील तणांचे निरीक्षण करावे, रोप उगवणीपूर्वी वापरण्यायोग्य तणनाशके वापरुन सुरुवातीच्या काळातच तण नियंत्रण करणे गरजेचे आहे.कोरडवाहूचे शेतकरी पूर्णत: पावसावर अवलंबून असतात. पेरणीनंतर पाऊस लागून राहिल्यास बरेच दिवस कापूस पिकाच्या वाढीवर याचे दुष्परिणाम होतात.उगवणीपूर्वी वापरण्यासाठी तणनाशक अहे. हे तणनाशक पेरणीच्या १४० दिवस आधी व पेरणीच्या ७ ते १० दिवसाआधी वापरता येते.लागवडीसाठी घ्यावयाची काळजीकापूस पिकाची लागवड प्रामुख्याने कोरडवाहू लागवड पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. काही शेतकरी बागायती लागवड करतात. या काळातील तापमानात बरीच तफावत राहते. पावसाच्या पाण्यावर होणारी लागवड ही बहुतांशपणे कमी उत्पन्न व पिकांची कमी वाढ या दोन समस्येने ग्रस्त असते.कोरडवाहू लागवडीच्या कापसाची वाढ ही पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असते. कृषी विद्यापीठांनी अशा भागासाठी कापूस बियाणाची नवीन जात विकसीत केली पाहिजे. कोरडवाहू कापासापासून उत्पादन मिळविण्यासाठी शेतकºयांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.कमी पावसाता येऊ शकेल अशाच वाणांचा कालावधी हा कमी ते मध्यम दिवसाचा असावा, जेणेकरुन चांगला पाऊस राहिल्यास त्या काळात कापसाला फुले येऊन जमिनीत असलेल्या ओलाव्यावर कापूस बोंडाची पक्चता मिळेल. अधिक कालावधीचे वाण लावल्यास त्यापासून उत्पादन मिळत नाही.

टॅग्स :cottonकापूस