शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
2
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
3
Max Life पेन्शन फंडाचा परवाना रद्द; लोकांच्या पैशाचं काय होणार? जाणून घ्या
4
“PM मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करावी”: वडेट्टीवार
5
शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा यांना दिलासा नाही! ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणी अडचणी वाढल्या; न्यायालयाने दिले हे आदेश
6
शेतकऱ्याने तहसील कार्यालयात घेतले विष, खासदार प्रतिभा धानोरकरांवर गंभीर आरोप; मृतदेह स्वीकारण्यास नकार
7
“ठाकरेंची बाजू अतिशय भक्कम, ज्यांची कमकुवत ते प्रकरण पुढे ढकलायचा प्रयत्न करतात”: असीम सरोदे
8
आजपासून पिनसोबतच चेहरा अन् बोटांचे ठसे वापरूनही करा यूपीआयवरून व्यवहार; फसवणुकीला आळा बसणार
9
नात्याला काळीमा! सासूच्या प्रेमात वेडा झाला जावई; पत्नीची केली हत्या, प्रायव्हेट फोटो व्हायरल
10
'डिजिटल अरेस्ट' पासून कसे वाचायचे? समन्स खरे की खोटे असे ओळखा; ईडीने सगळीच माहिती सांगितली
11
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
12
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
13
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
14
भारतासोबतच्या संघर्षादरम्यान मोठी घडामोड; अमेरिका पाकिस्तानला देणार अत्याधुनिक क्षेपणास्त्रे!
15
इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांच्याविरुद्ध आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला दाखल; गाझाशी आहे कनेक्शन
16
IND vs WI 2nd Test: बुमराहला संघाबाहेर ठेवणार? Playing XI मध्ये 'हे' २ बदल होण्याची शक्यता
17
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
18
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
19
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
20
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...

पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेत काँग्रेसला निवडा - चव्हाण

By admin | Updated: October 10, 2016 00:39 IST

कोरपना तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वनसडी आणि गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दोन्ही महिला सरपंचानी...

दोन महिला सरपंच कॉंग्रेसमध्ये : राजुरा येथे कॉंग्रेसचा मेळावाराजुरा : कोरपना तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत वनसडी आणि गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन येथील दोन्ही महिला सरपंचानी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. याप्रसंगी शेतकरी संघटना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. आगामी पालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत काँग्रेसला पसंती देण्याचे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केले.राजुरा विधानसभा कॉँग्रेस व युवक कॉँग्रेसच्या वतीने शनिवारी स्थानिक ज्योतिबा फुले शाळेच्या पटांगणावर भव्य शेतकरी, शेतमजुर, मजुर, महिला व युवक मेळावा पार पडला. या मेळाव्याचे उद्घाटन खा. चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री मुकुल वासनिक होते. तर विशेष अतिथी म्हणून विधानपरिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, प्रमुख अतिथी विधिमंडळाचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, जिल्हा निरीक्षक एस. क्यू. जमा, अनंतराव घारड, नाना गावंडे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, बाबुराव तिडके, जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, डॉ. नामदेव उसेंडी, प्रकाश मारकवार, प्रमोद तितरमारे, युवक कॉँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष शिवा राव, महिला कॉंग्रेस अध्यक्ष अश्विनी खोब्रागडे, आसावरी देवतळे व जिल्यातील अनेक नेते उपस्थित होते.प्रस्ताविकातून माजी आमदार सुभाष धोटे यांनी विधानसभा क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. धोटे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर कॉंग्रेसच्या काळात सुरु झालेल्या राजुरा-बल्लारपूर उड्डाण पुलाचे काम बंद झाले असून भाजपा सरकार दुर्लक्ष करीत आहे. वनहक्क कायद्यामुळे जिवती तालुक्यातील हजारो कुटुंब बेघर होणार असून तालुक्यातील जनता दहशतीत आहे. जिल्ह्यात सोयाबीनच्या वाळलेल्या शेंगा फुटून नव्याने अंकुर उगवले आहे. मात्र शासनाने अजूनपर्यंत ओला दुष्काळ जाहीर केला नाही. कापूस पिकाला भाव नाही. विधानसभा क्षेत्रातील एकही रस्ता बरोबर नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी विधिमंडळाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांनी जिल्ह्यातील दोन्ही मंत्र्यांवर कडाडून टीका केली. मेळाव्यातील गर्दी पाहून ‘कुठे गेले अच्छे दिन’ म्हणत लोकांना प्रश्न विचारून आतातरी खोट्या आश्वासनाला बळी पडू नका, असे त्यांनी आवाहन केले. माजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मुकुल वासनिक यांनी माजी आमदार सुभाष धोटे यांच्या कार्याची प्रशंसा केली. सुभाष धोटे आमदार असताना राजुरा विधानसभा क्षेत्राचा ज्या पद्धतीने विकास झाला, आता विकास पूर्णत: थांबला असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच जनसामान्याला तारणारा पक्ष असल्याचे त्यांनी सांगितले.संचालन युवक कॉंग्रेसचे महासचिव सचिन फुलझेले यांनी केले. आभार राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष देरकर यांनी मानले. मेळाव्याला राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील हजारो नागरिकांची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)विकासकामांचे श्रेय सुभाष धोटेंना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, सुभाष धोटे आमदार असताना मी मुख्यमंत्री होतो. राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांसाठी सुभाष धोटे तळमळीने झटत होते. त्यांच्या हातात नेहमी पाठपुरावा करण्यासाठी १५-२० पत्र असायचे. गत निवडणुकीत अशा लढवय्या नेत्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. मात्र, त्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्राचे प्रचंड नुकसान झाले आहे. या विधानसभा क्षेत्रात ५०० कोटींची कामे केल्यामुळे राजुरा विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचे श्रेय सुभाष धोटे यांनाच जात असल्याचे ते म्हणाले.