शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

शेतकऱ्यांना हवी एकरी ३० हजारांची मदत

By admin | Updated: March 6, 2015 01:16 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे.

चंद्रपूर : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी केली आहे.यंदाच्या हंगामात सुरुवातीला उशिरा हजेरी लावल्याने आणि ऐन पीक कापण्याच्या वेळेस झालेल्या अति पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्पसे उत्पादन आले आहे. त्यातही शासनाकडून योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करीत रब्बी पीक चांगले येईल, या आशेत बळीराजा होता. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे चना, गहू, ज्वारी, फळबाग या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वच काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३० हजार रुपये आर्थिक मदत आणि जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुरेश रामगुंडे यांच्यासह डी.के. आरीकर, संजय पिंंपळकर, रवी शर्मा आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)