शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना हवी एकरी ३० हजारांची मदत

By admin | Updated: March 6, 2015 01:16 IST

फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे.

चंद्रपूर : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यातील रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांचे या पावसाने कंबरडे मोडले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून एकरी ३० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष सुरेश रामगुंडे यांनी केली आहे.यंदाच्या हंगामात सुरुवातीला उशिरा हजेरी लावल्याने आणि ऐन पीक कापण्याच्या वेळेस झालेल्या अति पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात अल्पसे उत्पादन आले आहे. त्यातही शासनाकडून योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. या संकटावर मात करीत रब्बी पीक चांगले येईल, या आशेत बळीराजा होता. परंतु, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी आणि मार्च महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पावसाने कहर केला. यामुळे चना, गहू, ज्वारी, फळबाग या रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने जिल्ह्यातील नुकसानीचे सर्वच काम सुरू केले आहे. त्यामुळे शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ३० हजार रुपये आर्थिक मदत आणि जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सुरेश रामगुंडे यांच्यासह डी.के. आरीकर, संजय पिंंपळकर, रवी शर्मा आदींचा समावेश होता. (शहर प्रतिनिधी)