शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

आठ लाखांच्या भ्रष्टाचारावर शिक्कामोर्तब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 00:42 IST

गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या ...

नांदा येथील अंगणवाडीचे बांधकाम: सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांच्या संगनमतातून गैरप्रकार चंद्रपूर : गेल्या साडेतीन वर्षांपासून नांदा येथील अंगणवाडी भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली वारंवार अपात्रतेच्या कार्यवाही सापडलेल्या सरपंच पूजा मडावी, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून सात लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करून तिघांवरही फौजदारी गुन्हा दाखल करणे योग्य होईल, असा अभिप्राय जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी चौकशी अहवालात दिला आहे.असे असले तरी हात दिवस उलटूनही जिल्हा परीषद प्रशासनाने फौजदारी गुन्हा दाखल न केल्याने प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तत्कालिन मुख्य कार्यकारी अधिकारी आशुतोष सलील व डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी ३९/१ ची कारवाई नियमानुसार न केल्याने राज्यमंत्र्याच्या अपात्रतेच्या आदेशाला नागपूर उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढून नव्याने चौकशी करण्याचे आदेश दिले होते. तब्बल साडेतीन वर्षे भ्रष्टाचाराविरुद्ध लढत असताना सरपंचपदाचा कार्यकाळ संपत आला तरी जनतेच्या लाखो रुपयांचा हिशेब जनतेला मिळाला नाही. भ्रष्टाचार सिद्ध झाला असताना अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घातले असल्याचा आरोप तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी केला आहे.अंगणवाडी बांधकामासाठी वितरीत करण्यात आलेल्या निधीपैकी अफरातफर करण्यात आलेल्या रकमेपैकी सरपंच पूजा ज्ञानेश्वर मडावी यांच्याकडून तीन लाख ९३ हजार ९७ रुपये, तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार यांच्याकडून एक लाख ६३ हजार ५५६ व तत्कालिन ग्रामविकास अधिकारी भडके यांच्याकडून २ लाख २९ हजार ५४२ अशी एकूण ७ लाख ८६ हजार १९५ रुपये वसूल करण्यात येणार आहे. तसेच तत्कालिन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ बोपनवार व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी भडके यांची विभागीय चौकशी करून प्रशासकीय कारवाई करण्यात येणार असल्याचे चौकशी अभिप्रायात म्हटले आहे. यामुळे संबंधित पदाधिकारी व ग्रामसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता बळावत असली तरी प्रशासकीय पातळीवर मात्र कारवाईसाठी चालढकल केली जात असल्याने गावकऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (प्रतिनिधी)१० जूनला मुंडण आंदोलनलहान मुलांसाठी अंगणवाडीचे तब्बल आठ लाख रुपये घशात घालून बालकांच्या हक्काची शाळा हिरावून घेणाऱ्या सरपंच व ग्रामविकास अधिकाऱ्यांना पाठीशी घालणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नांदा ग्रामवासियांवर अन्याय केला आहे. सतत साडेतीन वर्षांपासून भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवता-उठवता सरपंचपदाचा कार्यकाल संपला तरी कारवाई न झाल्याने दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा व भ्रष्टाचार करून हडलेल्या निधीची वसुली करावी, अंगणवाड्यांचे उर्वरित बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, या मागणीसाठी येत्या १० जूनला जिल्हा परिषदेसमोर नांदा गावातील नागरिक मुंडण आंदोलन करणार असल्याबाबत निवेदन दिल्याचे तक्रारकर्ते हारून सिद्दिकी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.राजकीय दबावातून कारवाईसदर चौकशी ही राजकीय दबावातून करण्यात आली असून मी कोणताही भ्रष्टाचार केला नाही. निवडणुकीच्या तोंडावर मला फसविण्याचा प्रयत्न होत आहे. -पूजा मडावी, सरपंच, नांदा